शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करणार

By admin | Updated: October 5, 2015 00:06 IST

जे. पी. धनगर : सांगलीत धनगर समाज मेळावा; हिवाळी अधिवेशनापर्यंत अल्टीमेटम

सांगली : केंद्रात व राज्यात भाजपचे शासन येऊन वर्षभराचा कालावधि लोटला तरी, शासनाकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या निर्णयाकडे दुर्लक्ष होत असून, येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी समाजाला आरक्षण न मिळाल्यास आरक्षणाचा लढा तीव्र करणार असल्याचा इशारा धनगर समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. धनगर यांनी दिला. दरम्यान, येत्या ७ डिसेंबरपासून नागपूर येथून आंदोलनास सुरूवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.सांगलीत रविवारी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. धनगर म्हणाले, सत्तेवर येताच पंधरा दिवसात आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दिले होते. मात्र, आता भाजपचे शासन केंद्रात येऊन दीड वर्ष, तर राज्यातील शासनास एक वर्ष पूर्ण झाले, तरीही शासनाकडून अजूनही आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. भाजप सरकार सत्तेवर येण्यामध्ये धनगर समाजाने मोठी भूमिका बजावली होती. मात्र, या समाजाच्या प्रश्नाकडे शासनाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे. समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष होत असले तरी, शासनाला डिसेंबरपर्यंतची मुदत आम्ही देत आहोत. त्यापूर्वी आरक्षण घोषित न झाल्यास नागपूर येथून आम्ही तीव्र आंदोलनास सुरूवात करणार आहे. हा लढा पूर्णपणे राजकारणविरहित असणार आहे. शासनाकडून आरक्षणाचा निर्णय न झाल्यास राज्यभर उपोषण, धरणे आंदोलन करून आरक्षणाचा लढा तीव्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.निवृत्त आय.पी.एस. अधिकारी मधुकर शिंदे म्हणाले, महाराणी अहिल्यादेवी होळकर समाजप्रबोधन मंचच्यावतीने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू असून शासनाला ३०० पानांचे निवेदन सादर केले आहे. यात धनगड ही जातच अस्तित्वात नसल्याबाबतचे पुरावे सादर केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाच अहवाल सादर केले असून, शासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यावेळी डॉ. जे. पी. बघेल, एम. ए. पाचपोल, गोपीचंद पडळकर, प्रकाशअण्णा शेंडगे, प्रा. विष्णू कावळे, नगरसेवक विष्णू माने, डॉ. विकास महात्मे, दादासाहेब दुधाळ, भारत दुधाळ यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)राजकारणविरहीत लढाईसत्तेवर येणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाने केवळ धनगर समाजाच्या मतपेटीवर लक्ष ठेवून आरक्षणाचे आश्वासन दिले; मात्र प्रत्यक्षात आरक्षण देण्यास टाळाटाळ केली आहे. तर समाजातील काहींनी समाजाच्या एकजुटीचा फायदा घेत राजकारण केले, त्यामुळे आता धनगर समाज सजग झाला असून, यापुढे आरक्षणाचा लढा राजकारणविरहीत ठेवणार असल्याचे वक्त्यांनी यावेळी सांगितले. यामुळेच देशपातळीवर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या जे. पी. धनगर यांना मेळाव्यासाठी आमंत्रित केल्याचे सांगत भाजप शासनाने धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास यापुढे कोणत्याही निवडणुकीत समाज भाजपच्या पाठीशी उभा राहणार संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले.