शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करणार

By admin | Updated: October 5, 2015 00:06 IST

जे. पी. धनगर : सांगलीत धनगर समाज मेळावा; हिवाळी अधिवेशनापर्यंत अल्टीमेटम

सांगली : केंद्रात व राज्यात भाजपचे शासन येऊन वर्षभराचा कालावधि लोटला तरी, शासनाकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या निर्णयाकडे दुर्लक्ष होत असून, येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी समाजाला आरक्षण न मिळाल्यास आरक्षणाचा लढा तीव्र करणार असल्याचा इशारा धनगर समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. धनगर यांनी दिला. दरम्यान, येत्या ७ डिसेंबरपासून नागपूर येथून आंदोलनास सुरूवात करणार असल्याचे त्यांनी सांगितले.सांगलीत रविवारी धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात ते बोलत होते. धनगर म्हणाले, सत्तेवर येताच पंधरा दिवसात आरक्षणाचा प्रश्न निकाली काढून धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याचे आश्वासन लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने दिले होते. मात्र, आता भाजपचे शासन केंद्रात येऊन दीड वर्ष, तर राज्यातील शासनास एक वर्ष पूर्ण झाले, तरीही शासनाकडून अजूनही आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. भाजप सरकार सत्तेवर येण्यामध्ये धनगर समाजाने मोठी भूमिका बजावली होती. मात्र, या समाजाच्या प्रश्नाकडे शासनाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष होत आहे. समाजाच्या आरक्षणाकडे दुर्लक्ष होत असले तरी, शासनाला डिसेंबरपर्यंतची मुदत आम्ही देत आहोत. त्यापूर्वी आरक्षण घोषित न झाल्यास नागपूर येथून आम्ही तीव्र आंदोलनास सुरूवात करणार आहे. हा लढा पूर्णपणे राजकारणविरहित असणार आहे. शासनाकडून आरक्षणाचा निर्णय न झाल्यास राज्यभर उपोषण, धरणे आंदोलन करून आरक्षणाचा लढा तीव्र करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.निवृत्त आय.पी.एस. अधिकारी मधुकर शिंदे म्हणाले, महाराणी अहिल्यादेवी होळकर समाजप्रबोधन मंचच्यावतीने धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू असून शासनाला ३०० पानांचे निवेदन सादर केले आहे. यात धनगड ही जातच अस्तित्वात नसल्याबाबतचे पुरावे सादर केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी पाच अहवाल सादर केले असून, शासनाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न मिळाल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यावेळी डॉ. जे. पी. बघेल, एम. ए. पाचपोल, गोपीचंद पडळकर, प्रकाशअण्णा शेंडगे, प्रा. विष्णू कावळे, नगरसेवक विष्णू माने, डॉ. विकास महात्मे, दादासाहेब दुधाळ, भारत दुधाळ यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)राजकारणविरहीत लढाईसत्तेवर येणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाने केवळ धनगर समाजाच्या मतपेटीवर लक्ष ठेवून आरक्षणाचे आश्वासन दिले; मात्र प्रत्यक्षात आरक्षण देण्यास टाळाटाळ केली आहे. तर समाजातील काहींनी समाजाच्या एकजुटीचा फायदा घेत राजकारण केले, त्यामुळे आता धनगर समाज सजग झाला असून, यापुढे आरक्षणाचा लढा राजकारणविरहीत ठेवणार असल्याचे वक्त्यांनी यावेळी सांगितले. यामुळेच देशपातळीवर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या जे. पी. धनगर यांना मेळाव्यासाठी आमंत्रित केल्याचे सांगत भाजप शासनाने धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास यापुढे कोणत्याही निवडणुकीत समाज भाजपच्या पाठीशी उभा राहणार संघटनेच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले.