शहरं
Join us  
Trending Stories
1
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
2
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
3
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
4
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
5
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
6
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
7
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
8
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
9
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
10
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
11
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
12
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
13
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
14
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
15
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
16
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
17
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
18
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
19
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
20
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!

पन्नास वर्षांनी शिंगणापूरला कुस्तीचा आखाडा रंगणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 00:34 IST

दहिवडी : महाशिवरात्रीला शंभू महादेवाच्या दारात कुस्ती खेळली म्हणजे त्याचे आशीर्वाद मिळतील या श्रद्धेने शिखर शिंगणापूर येथे महाशिवरात्रीच्या यात्रेत मल्लांची कुस्ती व्हायची. १९७० च्या सुमारास नियोजनाच्या अभावामुळे ही परंपरा खंडित झालेली होती. आता सुमारे पन्नास वर्षांनंतर ही परंपरा तरुणाईच्या पुढाकाराने पुन्हा सुरू होत आहे.यावर्षी ५० वर्षांनंतर प्रथमच शिंगणापूरचे उपसरपंच पैलवान ...

ठळक मुद्देजादा एसटी सोय; शिंगणापुरात भाविक होऊ लागले दाखल

दहिवडी : महाशिवरात्रीला शंभू महादेवाच्या दारात कुस्ती खेळली म्हणजे त्याचे आशीर्वाद मिळतील या श्रद्धेने शिखर शिंगणापूर येथे महाशिवरात्रीच्या यात्रेत मल्लांची कुस्ती व्हायची. १९७० च्या सुमारास नियोजनाच्या अभावामुळे ही परंपरा खंडित झालेली होती. आता सुमारे पन्नास वर्षांनंतर ही परंपरा तरुणाईच्या पुढाकाराने पुन्हा सुरू होत आहे.

यावर्षी ५० वर्षांनंतर प्रथमच शिंगणापूरचे उपसरपंच पैलवान शंकर तांबवे व वीरभद्र कावडे यांनी गावची ही परंपरा पुन्हा एकदा सुरू करण्याचं ठरविलं आहे. एक हजारापासून एक लाखापर्यंत लहान-मोठ्या शंभर कुस्त्या खेळवल्या जाणार आहेत. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांचा ही सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने केला जाणार आहे. महाशिवरात्री यात्रेत शिंगणापूरमध्ये अखेरची कुस्ती झाली ती पाहण्यासाठी परिसरातील सुमारे दोन हजार ग्रामस्थ उपस्थित होते. राज्यातील १२५ मल्लांनी यात हजेरी लावली होती. या स्पर्धेतील विजेत्याला त्यावेळी तीन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. पूर्वी आर्थिक बक्षिसांपेक्षाही शंभू महादेवाच्या आशीर्वादासाठी येथे खेळायला येणाऱ्यांची संख्या मोठी होती.

दरम्यान, हरहर महादेवचा गजर करीत शेकडो मैलाची पायपीठ करीत कावडीसह शिंगणापुरात भाविक दाखल झाले आहेत. रविवार, दि. २५ रोजी सायंकाळी चार वाजता ध्वज बांधण्याचा कार्यक्रम तर रात्री बारा वाजता लग्नसोहळा होणार आहे. या निमित्ताने मराठवाडा, विदर्भ, आंध्र, कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्रातील भाविक कावडी घेऊन शिंगणापुरात दाखल होऊ लागले आहेत.यात्राकाळात दहिवडी, नातेपुते, सातारा, बारामती, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सोलापूर आदी ठिकाणांहून जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत.

लग्न सोहळा झाल्यानंतर मंगळवार, दि.२७ रोजी देवाची लग्नाची वरात निघणार असून, दि. २८ रोजी कावडी मुंगी घाटातून वर चढणार आहेत. त्याच दिवशी रात्री बारा वाजता महादेवाला कावडीसोबत आणलेल्या पाण्याचा अभिषेक धार घातली जाते. 

महाशिवरात्रीच्या यात्रेत शिंगणापूरला मोठा कुस्त्यांचा फड भरत होता. यात्रेसाठी येणारे भाविक कुस्तीचा आखाडा पाहण्यासाठी थांबायचे. आपल्या लाडक्या पैलवानाने कुस्ती जिंकली की फेटा उडवून त्याचं कौतुक करण्याची तेव्हा पद्धत होती. पुन्हा एकदा कुस्तीचा फड सुरू होतोय याचा अभिमान वाटतो.- मोहनराव भोसले-पाटील,माजी पोलीस पाटील.