शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सांगली बाजार समितीत नेत्यांची फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 14:54 IST

शासनाच्या या धोरणानुसार आता पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमधून निवडलेले ११, ग्रामपंचायत सदस्यांमधून ४, अशा एकूण १५ शेतकरी प्रतिनिधींची निवड करण्याची तरतूद कायम ठेवण्यात येईल. या १५ सदस्यांबरोबर व्यापारी गटातून दोन आणि हमाल व तोलाईदार गटातून एक उमेदवार असणार आहे.

ठळक मुद्दे२०१५ च्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन आघाडी केली होती.

सांगली : बाजार समितीसाठी शेतकऱ्यांना दिलेला मतदानाचा हक्क महाविकास आघाडीच्या सरकारने हटविल्यामुळे ग्रामपंचायत, सोसायटीचे सदस्य, व्यापारी, हमाल-तोलाईदारच मतदार असतील. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जूनमध्ये होणार आहे. पण, या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. जत, कवठेमहांकाळ आणि मिरज हे तीन तालुके बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी भाजप सरकारने २०१७ मध्ये केलेली सुधारणा महाविकास आघाडीच्या सरकारने रद्द करून पूर्वीप्रमाणेच निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाच्या या धोरणानुसार आता पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमधून निवडलेले ११, ग्रामपंचायत सदस्यांमधून ४, अशा एकूण १५ शेतकरी प्रतिनिधींची निवड करण्याची तरतूद कायम ठेवण्यात येईल. या १५ सदस्यांबरोबर व्यापारी गटातून दोन आणि हमाल व तोलाईदार गटातून एक उमेदवार असणार आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांचा कार्यकाल जून २०२० मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील काही नेत्यांमध्ये राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. २०१५ च्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन आघाडी केली होती. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खा. राजू शेट्टी असे एक पॅनेल, तर विरोधी गटात जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, माजी आ. विलासराव जगताप, माजी मंत्री मदनभाऊ पाटील होते. पतंगराव कदम गटाला बहुमत मिळाल्यामुळे बाजार समितीवर त्यांचेच वर्चस्व होते. कालांतराने अनेक राजकीय समीकरणे बदलली आणि बाजार समिती खासदार संजयकाका पाटील गटाच्या ताब्यात गेली.

कदम, घोरपडे गटाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. या बदलत्या राजकारणाचा विचार करुनच जून २०२० मध्ये होणाºया निवडणुकीत आघाड्यांची गणिते मांडली जाणार आहेत. संजयकाका यांचा सध्या भाजपचे माजी आ. विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी काही प्रमाणात दुरावा निर्माण झाला आहे. हे दोन नेते येत्या बाजार समितीच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार याची आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.यामध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि कदम गट, मदनभाऊ गटाची काय भूमिका असणार, हेही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजार