शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सांगली बाजार समितीत नेत्यांची फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 14:54 IST

शासनाच्या या धोरणानुसार आता पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमधून निवडलेले ११, ग्रामपंचायत सदस्यांमधून ४, अशा एकूण १५ शेतकरी प्रतिनिधींची निवड करण्याची तरतूद कायम ठेवण्यात येईल. या १५ सदस्यांबरोबर व्यापारी गटातून दोन आणि हमाल व तोलाईदार गटातून एक उमेदवार असणार आहे.

ठळक मुद्दे२०१५ च्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन आघाडी केली होती.

सांगली : बाजार समितीसाठी शेतकऱ्यांना दिलेला मतदानाचा हक्क महाविकास आघाडीच्या सरकारने हटविल्यामुळे ग्रामपंचायत, सोसायटीचे सदस्य, व्यापारी, हमाल-तोलाईदारच मतदार असतील. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जूनमध्ये होणार आहे. पण, या निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. जत, कवठेमहांकाळ आणि मिरज हे तीन तालुके बाजार समितीचे कार्यक्षेत्र आहे.कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी भाजप सरकारने २०१७ मध्ये केलेली सुधारणा महाविकास आघाडीच्या सरकारने रद्द करून पूर्वीप्रमाणेच निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनाच्या या धोरणानुसार आता पूर्वीप्रमाणेच विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या व बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांमधून निवडलेले ११, ग्रामपंचायत सदस्यांमधून ४, अशा एकूण १५ शेतकरी प्रतिनिधींची निवड करण्याची तरतूद कायम ठेवण्यात येईल. या १५ सदस्यांबरोबर व्यापारी गटातून दोन आणि हमाल व तोलाईदार गटातून एक उमेदवार असणार आहे.

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालकांचा कार्यकाल जून २०२० मध्ये संपत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधील काही नेत्यांमध्ये राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. २०१५ च्या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन आघाडी केली होती. माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि माजी खा. राजू शेट्टी असे एक पॅनेल, तर विरोधी गटात जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार संजयकाका पाटील, माजी आ. विलासराव जगताप, माजी मंत्री मदनभाऊ पाटील होते. पतंगराव कदम गटाला बहुमत मिळाल्यामुळे बाजार समितीवर त्यांचेच वर्चस्व होते. कालांतराने अनेक राजकीय समीकरणे बदलली आणि बाजार समिती खासदार संजयकाका पाटील गटाच्या ताब्यात गेली.

कदम, घोरपडे गटाने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. या बदलत्या राजकारणाचा विचार करुनच जून २०२० मध्ये होणाºया निवडणुकीत आघाड्यांची गणिते मांडली जाणार आहेत. संजयकाका यांचा सध्या भाजपचे माजी आ. विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्याशी काही प्रमाणात दुरावा निर्माण झाला आहे. हे दोन नेते येत्या बाजार समितीच्या निवडणुकीत काय भूमिका घेणार याची आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली आहे.यामध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आणि कदम गट, मदनभाऊ गटाची काय भूमिका असणार, हेही तेवढेच महत्त्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीMarketबाजार