शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हैद्राबादच्या निर्भयाची हत्या गोवंश हत्या बंदीच्या विरोधामुळे ! --: शिवाजीराव नांदखिले यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 20:36 IST

हैद्राबाद येथील निर्भयावरील आत्याचार व तिची केलेली हत्या यामागे वेगळे कारण आहे. ही घटना गोवंश हत्या बंदीतून झाली आहे. तिने गोवंश हत्या बंदीवर आवाज उठवला होता. त्यातून तिच्यावर आत्याचार करून खून करण्यात आला.

ठळक मुद्देसांगलीत शेतकरी हुतात्मा स्मृती परिषदही घटना गोवंश हत्या बंदीतून झाली आहे. तिने गोवंश हत्या बंदीवर आवाज उठवला होता.

सांगली : हैद्राबाद येथील निर्भयावरील आत्याचार व तिची केलेली हत्या यामागे वेगळे कारण आहे. ही घटना गोवंश हत्या बंदीतून झाली आहे. तिने गोवंश हत्या बंदीवर आवाज उठवला होता. त्यातून तिच्यावर आत्याचार करून खून करण्यात आला. यातील आरोपी हे त्या मागे असणा-या सुत्रधाराची नावे सांगणार होते, म्हणून त्याचा एन्काऊंटर केला गेला, असा खळबळजनक आरोप क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव  नांदखिले यांनी गुरुवारी हुतात्मा शेतकरी परिषदेत केला.

हुतात्मा बाबू गेनू व शेतकरी नेते शरद जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथे शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद पार पडली. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्यासह शिवाजीराव नांदखिले, कालिदास आपेट, धनंजय ठाकडे, बंडा सोळंकी, अजित काळे, गणेश घुगे आदी उपस्थित होते.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून शेतक-यांच्या डोईवरील कर्जाचा बोजा नैसर्गिक संकटांमुळे वाढत आहे. त्यातच शेतक-यांच्या हिताविरोधात सरकारी निर्णय होत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील सरकार शेतकºयांची बाजू घेण्याच्या मनस्थितीत नाही.

गतवर्षी देशात ३ लाख ९८ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. वाढती महागाई आणि कायम राहिलेला कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी पिचून निघाला आहे. त्यामुळे शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे. गुजरातमधील कारखान्यांनी दोन वर्षांपूर्वीच ४ हजार ७०० रुपये दर दिला. उत्तरप्रदेशात यावेळी ३ हजार २५० इतका दर जाहीर झाला आहे. आपल्याच राज्यात योग्य दर का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राजू शेट्टींनी एफआरपी अधिक मागितलेला दर एकदाही मिळालेला नाही. सरकार आणि कारखानदारांचे सर्व समर्थक आहेत. देशात, राज्यात कोणतेही सरकार आले तरी, कारखान्यांच्या बाजूचेच धोरण राबवते. ऊसदराच्या समस्येवर उपाय म्हणून दोन कारखान्यांतील अंतराची अट काढून टाकायलाच हवी. केंद्रात, राज्यात भाजप सत्तेत असतानाही हे शक्य झाले नाही. टनाला ४ हजार दर मिळाला नाही, तर चालू झालेले कारखाने आम्ही बंद पाडू, असे ते म्हणाले.

शिवाजीराव नांदखिले म्हणाले, कच्चा माल स्वस्त घेऊन पक्का माल देशात आणून चढ्या भावाने विक्रीच्या विरोधात लढताना हुतात्मा झालेले बाबू गेनू व शेतक-यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही परिषद होत आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार हे शेतकरी विरोधी आहे, त्यामुळे शेतक-यांना न्याय मिळण्याबाबत साशंकता असून, शेतकरी विरोधी कायदे न बदलल्यास तीव्र आंदोलन छेडू.

टॅग्स :FarmerशेतकरीNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपMurderखून