शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

हैद्राबादच्या निर्भयाची हत्या गोवंश हत्या बंदीच्या विरोधामुळे ! --: शिवाजीराव नांदखिले यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 20:36 IST

हैद्राबाद येथील निर्भयावरील आत्याचार व तिची केलेली हत्या यामागे वेगळे कारण आहे. ही घटना गोवंश हत्या बंदीतून झाली आहे. तिने गोवंश हत्या बंदीवर आवाज उठवला होता. त्यातून तिच्यावर आत्याचार करून खून करण्यात आला.

ठळक मुद्देसांगलीत शेतकरी हुतात्मा स्मृती परिषदही घटना गोवंश हत्या बंदीतून झाली आहे. तिने गोवंश हत्या बंदीवर आवाज उठवला होता.

सांगली : हैद्राबाद येथील निर्भयावरील आत्याचार व तिची केलेली हत्या यामागे वेगळे कारण आहे. ही घटना गोवंश हत्या बंदीतून झाली आहे. तिने गोवंश हत्या बंदीवर आवाज उठवला होता. त्यातून तिच्यावर आत्याचार करून खून करण्यात आला. यातील आरोपी हे त्या मागे असणा-या सुत्रधाराची नावे सांगणार होते, म्हणून त्याचा एन्काऊंटर केला गेला, असा खळबळजनक आरोप क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव  नांदखिले यांनी गुरुवारी हुतात्मा शेतकरी परिषदेत केला.

हुतात्मा बाबू गेनू व शेतकरी नेते शरद जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथे शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद पार पडली. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्यासह शिवाजीराव नांदखिले, कालिदास आपेट, धनंजय ठाकडे, बंडा सोळंकी, अजित काळे, गणेश घुगे आदी उपस्थित होते.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून शेतक-यांच्या डोईवरील कर्जाचा बोजा नैसर्गिक संकटांमुळे वाढत आहे. त्यातच शेतक-यांच्या हिताविरोधात सरकारी निर्णय होत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील सरकार शेतकºयांची बाजू घेण्याच्या मनस्थितीत नाही.

गतवर्षी देशात ३ लाख ९८ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. वाढती महागाई आणि कायम राहिलेला कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी पिचून निघाला आहे. त्यामुळे शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे. गुजरातमधील कारखान्यांनी दोन वर्षांपूर्वीच ४ हजार ७०० रुपये दर दिला. उत्तरप्रदेशात यावेळी ३ हजार २५० इतका दर जाहीर झाला आहे. आपल्याच राज्यात योग्य दर का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राजू शेट्टींनी एफआरपी अधिक मागितलेला दर एकदाही मिळालेला नाही. सरकार आणि कारखानदारांचे सर्व समर्थक आहेत. देशात, राज्यात कोणतेही सरकार आले तरी, कारखान्यांच्या बाजूचेच धोरण राबवते. ऊसदराच्या समस्येवर उपाय म्हणून दोन कारखान्यांतील अंतराची अट काढून टाकायलाच हवी. केंद्रात, राज्यात भाजप सत्तेत असतानाही हे शक्य झाले नाही. टनाला ४ हजार दर मिळाला नाही, तर चालू झालेले कारखाने आम्ही बंद पाडू, असे ते म्हणाले.

शिवाजीराव नांदखिले म्हणाले, कच्चा माल स्वस्त घेऊन पक्का माल देशात आणून चढ्या भावाने विक्रीच्या विरोधात लढताना हुतात्मा झालेले बाबू गेनू व शेतक-यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही परिषद होत आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार हे शेतकरी विरोधी आहे, त्यामुळे शेतक-यांना न्याय मिळण्याबाबत साशंकता असून, शेतकरी विरोधी कायदे न बदलल्यास तीव्र आंदोलन छेडू.

टॅग्स :FarmerशेतकरीNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपMurderखून