शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

हैद्राबादच्या निर्भयाची हत्या गोवंश हत्या बंदीच्या विरोधामुळे ! --: शिवाजीराव नांदखिले यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 20:36 IST

हैद्राबाद येथील निर्भयावरील आत्याचार व तिची केलेली हत्या यामागे वेगळे कारण आहे. ही घटना गोवंश हत्या बंदीतून झाली आहे. तिने गोवंश हत्या बंदीवर आवाज उठवला होता. त्यातून तिच्यावर आत्याचार करून खून करण्यात आला.

ठळक मुद्देसांगलीत शेतकरी हुतात्मा स्मृती परिषदही घटना गोवंश हत्या बंदीतून झाली आहे. तिने गोवंश हत्या बंदीवर आवाज उठवला होता.

सांगली : हैद्राबाद येथील निर्भयावरील आत्याचार व तिची केलेली हत्या यामागे वेगळे कारण आहे. ही घटना गोवंश हत्या बंदीतून झाली आहे. तिने गोवंश हत्या बंदीवर आवाज उठवला होता. त्यातून तिच्यावर आत्याचार करून खून करण्यात आला. यातील आरोपी हे त्या मागे असणा-या सुत्रधाराची नावे सांगणार होते, म्हणून त्याचा एन्काऊंटर केला गेला, असा खळबळजनक आरोप क्रांतिसिंह नाना पाटील ब्रिगेडचे अध्यक्ष शिवाजीराव  नांदखिले यांनी गुरुवारी हुतात्मा शेतकरी परिषदेत केला.

हुतात्मा बाबू गेनू व शेतकरी नेते शरद जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथे शेतकरी हुतात्मा स्मृती परिषद पार पडली. यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांच्यासह शिवाजीराव नांदखिले, कालिदास आपेट, धनंजय ठाकडे, बंडा सोळंकी, अजित काळे, गणेश घुगे आदी उपस्थित होते.

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून शेतक-यांच्या डोईवरील कर्जाचा बोजा नैसर्गिक संकटांमुळे वाढत आहे. त्यातच शेतक-यांच्या हिताविरोधात सरकारी निर्णय होत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील सरकार शेतकºयांची बाजू घेण्याच्या मनस्थितीत नाही.

गतवर्षी देशात ३ लाख ९८ हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. वाढती महागाई आणि कायम राहिलेला कर्जाचा बोजा यामुळे शेतकरी पिचून निघाला आहे. त्यामुळे शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली पाहिजे. गुजरातमधील कारखान्यांनी दोन वर्षांपूर्वीच ४ हजार ७०० रुपये दर दिला. उत्तरप्रदेशात यावेळी ३ हजार २५० इतका दर जाहीर झाला आहे. आपल्याच राज्यात योग्य दर का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राजू शेट्टींनी एफआरपी अधिक मागितलेला दर एकदाही मिळालेला नाही. सरकार आणि कारखानदारांचे सर्व समर्थक आहेत. देशात, राज्यात कोणतेही सरकार आले तरी, कारखान्यांच्या बाजूचेच धोरण राबवते. ऊसदराच्या समस्येवर उपाय म्हणून दोन कारखान्यांतील अंतराची अट काढून टाकायलाच हवी. केंद्रात, राज्यात भाजप सत्तेत असतानाही हे शक्य झाले नाही. टनाला ४ हजार दर मिळाला नाही, तर चालू झालेले कारखाने आम्ही बंद पाडू, असे ते म्हणाले.

शिवाजीराव नांदखिले म्हणाले, कच्चा माल स्वस्त घेऊन पक्का माल देशात आणून चढ्या भावाने विक्रीच्या विरोधात लढताना हुतात्मा झालेले बाबू गेनू व शेतक-यांचे पंचप्राण शरद जोशी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ही परिषद होत आहे. केंद्र आणि राज्यातील सरकार हे शेतकरी विरोधी आहे, त्यामुळे शेतक-यांना न्याय मिळण्याबाबत साशंकता असून, शेतकरी विरोधी कायदे न बदलल्यास तीव्र आंदोलन छेडू.

टॅग्स :FarmerशेतकरीNirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपMurderखून