शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

ड्रेनेज ठेकेदाराबद्दल स्थायी समितीत संताप

By admin | Updated: October 29, 2015 00:11 IST

समितीची सभा : काम सुरू झाल्याशिवाय मुदतवाढ नाही

सांगली : सांगली व मिरज शहरातील भुयारी गटार योजनेचे (ड्रेनेज) काम गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून ठेकेदाराने बंद ठेवले आहे. याबाबत बुधवारी स्थायी समिती सभेत सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठेकेदाराने काम सुरू केल्याशिवाय त्याच्या मुदतवाढीवर निर्णय घेतला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना सभापती संतोष पाटील यांनी प्रशासनाला दिली. स्थायी समिती सभेत नगरसेवक दिलीप पाटील, हारुण शिकलगार, शिवाजी दुर्वे, अलका पवार या सदस्यांनी ड्रेनेज कामाचा मुद्दा उपस्थित केला. ठेकेदाराने गेल्या तीन ते चार महिन्यांपासून काम बंद ठेवले असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर. पी. जाधव यांनी ठेकेदाराला मुदतवाढ देण्यात आलेली नाही. ही फाईल प्रलंबित आहे, त्यामुळे त्याने काम बंद ठेवल्याचा खुलासा केला. प्रशासनाच्या उत्तरावर सभापती संतोष पाटील यांनी संताप व्यक्त केला. मुदतवाढ व काम सुरू ठेवणे हे दोन्ही विषय वेगळे आहेत. ठेकेदाराने मध्यंतरी आठ दिवसांत काम सुरू करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार त्याने काम सुरू केल्याशिवाय मुदतवाढीवर चर्चा होणार नाही, असे सुनावले. गुंठेवारीचा निधी काही सदस्य पळवापळवी करतात, असा आरोपही सदस्यांनी केला. ज्या भागात गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रशमन शुल्क व विकास निधी जमा झालेला नाही, तिथेच कामे होत आहे. ठराविक नगरसेवकांच्या प्रभागात जादा निधी खर्च होत असल्याची तक्रार करण्यात आली. त्यावर सभापतींनी सुमारे दोन कोटींच्या कामांच्या फायली थांबविण्याचे आदेश लेखा विभागाला दिले. गुंठेवारी निधीचे समान वाटप सदस्यांत केले जाईल. सध्या कोणत्या प्रभागात किती निधी खर्च झाला, याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विस्तारित भागात निधी खर्च करण्यास प्राधान्य देणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. विश्रामबाग परिसरात चोवीस तास पाणी योजनेतील मीटर हवेवर फिरत असल्याची तक्रार नगरसेवक प्रदीप पाटील यांनी केली. त्यामुळे अडीच हजार नागरिकांनी पाण्याची बिलेच भरलेली नाहीत. आठ दिवसांत अहवाल देऊन बिलांची दुरुस्ती करून वसूल करण्याची सूचनाही सभापतींनी केली. (प्रतिनिधी)...तर दुसरा तलाव झाला असता!मिरजेतील गणेश तलावात सौरऊर्जेवरील दिवे बसविण्यात आले आहेत. सध्या २० दिवे बंद असून, त्यातील बॅटऱ्या चोरीस गेल्या आहेत. त्यामुळे गणेश तलावातील दिवे इलेक्ट्रिकवर सुरू करावेत, अशी मागणी नगरसेवक शिवाजी दुर्वे यांनी केली. त्यावर इतर सदस्यांनी या तलावावर आतापर्यंत किती खर्च झाला, असा प्रतिप्रश्न केला. गणेश तलावावरील खर्चात दुसरा तलाव तयार झाला असता, अशी टिप्पणीही काही सदस्यांनी सभेत केली.