शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 23:50 IST

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिवासी बांधवांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

ठळक मुद्देविविध संघटनांचा पाठिंबा : मागण्या पूर्ण करा; अन्यथा आंदोलन तीव्र

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिवासी बांधवांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशीही प्रशासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूर जिल्ह्याला आदिवासी गोंड साम्राज्याचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पंधराशे ते सोळाशे वर्षांची वैभवशाली परंपरा या चंद्रपूर नगरीला असतानासुद्धा आदिवासींच्या इतिहासाकडे मुद्दाम डोळेझाक करून इतिहास पुसण्याचा प्रयत्न होत आहे. आदिवासी समाजातर्फे विविध मागण्यांसाठी जटपुरा गेट येथे १० मार्चला धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर गेल्या दोन वर्षांपासून याच मागण्यांसाठी विविध मोर्चे काढून प्रशासनाला निवेदने दिली आहेत. असे असतानाही अजूनपर्यंत शासन, प्रशासन आदिवासी बांधवांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे आदिवासी नगरीतच आदिवासी बांधवांना नतमस्तक होऊन बेमुदत उपोषण करण्याची वेळ आली आहे.चंद्रपुरातील जटपूरा गेटच्या आतील बाजूस राजे बल्लारशहा यांचा भव्य पुतळा बसवण्यात यावा. चंद्रपूर शहरातील चौकान्ाां महाराणी हिराई, राणी दुर्गावती, राजे खांडक्या बल्लाळशाह, भगवान बिरसा मुंडा, शहीद विर बाबूराव शेडमाके यांची नावे देण्यात यावी, आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण शुल्क व शिष्यवृत्ती हीे चालू शैक्षणिक सत्र संपत आले तरीही विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही, ती रक्कम तत्काळ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावी. येथील जिल्हा कारागृह परिसरात असलेल्या झाडाला अटकवून बाबूराव शेडमाके यांना फासावर चढवले होते, त्या जागेत शहीद स्मारक उभारून सौंदर्यीकरण करण्यात यावे आदी मागण्या उपोषणकर्त्यांच्या आहेत. अशोक तुमराम, राजेंद्र धुर्वे, विनोद तोडराम, हरीश उइके, अमर निचत, जितेश कुळमेथे हे उपोषणाला बसले आहेत. जिल्ह्यातील आदिवासी बांधव वारलु मेश्राम, युवराज मेश्राम, जमुना तुमराम, वंदना मेश्राम, संदीप परचाके, बाळू कुळमेथे, कमलेश आत्राम, सतीश सोनटक्के, जयपाल गेडाम, गणेश इचनकर, वैशाली मेश्राम यांनी उपोषणमंडपाला भेट देऊन पाठिंबा दिला आहे.जिल्ह्यातून बऱ्याच आदिवासी बांधव या बेमुदत आमरण उपोषणाला दररोज भेटी देत आहेत. जोपर्यंत आमच्या मागण्या शासन, प्रशासन पूर्ण करणार नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, अशी निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आदिवासी नगरीतील आदिवासींवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी आहे.आज मोर्चामंगळवारी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आदिवासी बांधवांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघेणार आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश माने, दशरथ मडावी व राजू झोडे, शिवसेनेचे किशोर जोरगेवार यांनी उपोषणमंडपाला भेट देऊन मोर्चाला पाठिंबा दर्शविला आहे.