शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

तीन लाखावर शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे संरक्षण

By अशोक डोंबाळे | Updated: August 5, 2023 17:48 IST

नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, वादळ या काळात शेतकऱ्यांच्या शेतात लावलेल्या पिकाचे मोठे आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळे शेतात लावलेले पीक वाया जाते.

सांगली : राज्य शासनाने यंदा शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा दिला आहे. सांगली जिल्ह्यात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील तीन लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ८१७ टक्क्यांनी यात वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या नियोजनबद्ध कामामुळे होती. जिल्ह्यात पीकविमा मोठ्या प्रमाणात काढण्यात यश आले आहे.

नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, वादळ या काळात शेतकऱ्यांच्या शेतात लावलेल्या पिकाचे मोठे आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळे शेतात लावलेले पीक वाया जाते. शेतकऱ्याने आपल्या पिकाचा विमा काढला असेल तर त्यांना विमा कंपनीतर्फे विम्याच्या रूपात नुकसानभरपाई मिळते. शेतकऱ्याचे होणारे नुकसान यंदा फक्त एक रुपया भरून शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण मिळणार आहे. जिल्ह्यात विमा कंपनीद्वारे पीकविमा दिला जाणार आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना पीकविम्याबाबत आवाहन करून ठिकठिकाणी शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे ३ लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी शासनाच्या पीकविमा योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

जिल्ह्यात खरीप २०२२ मध्ये कर्जदार शेतकरी आणि बिगरकर्जदार शेतकरी मिळून २५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला हाेता. यावर्षी एक रुपयात पीक वीमा असल्यामुळे विक्रमी तीन लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले आहेत. जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार १९५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. शेतकऱ्याचे एक रुपयाप्रमाणे ३ लाख ७६ हजार ५३० रुपये जमा झाले आहेत.मोबाइल ॲपद्वारे नोंदणी

कृषी विभागाच्या अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी यांनी गावोगाव सीएससी केंद्र चालकाच्या मदतीने शिबिरे आयोजित केली होती. कृषी विभागाने स्वतः मोबाइल ॲपद्वारे नोंदणी करून घेतली. विमा कंपनीकडेही सतत पाठपुरावा केला. बँकासोबत वेळोवेळी बैठका घेऊन कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांची पीकविमा नोंदणी करून घेतली.कोटएक रुपयात पीक विमा उतरण्यात आला आहे. उर्वरित सर्व रक्कम केंद्र शासन भरणार आहे. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांवर फारसा बोजा शासनाने टाकला नाही. यामुळे जिल्ह्यातील तीन लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी विविध पिकांचा पीक विमा उतरला आहे.- विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

टॅग्स :Sangliसांगली