शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तीन लाखावर शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे संरक्षण

By अशोक डोंबाळे | Updated: August 5, 2023 17:48 IST

नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, वादळ या काळात शेतकऱ्यांच्या शेतात लावलेल्या पिकाचे मोठे आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळे शेतात लावलेले पीक वाया जाते.

सांगली : राज्य शासनाने यंदा शेतकऱ्यांना एक रुपया भरून पीकविमा दिला आहे. सांगली जिल्ह्यात पीकविमा योजनेला शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. जिल्ह्यातील तीन लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा ८१७ टक्क्यांनी यात वाढ झाली आहे. कृषी विभागाच्या नियोजनबद्ध कामामुळे होती. जिल्ह्यात पीकविमा मोठ्या प्रमाणात काढण्यात यश आले आहे.

नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, वादळ या काळात शेतकऱ्यांच्या शेतात लावलेल्या पिकाचे मोठे आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळे शेतात लावलेले पीक वाया जाते. शेतकऱ्याने आपल्या पिकाचा विमा काढला असेल तर त्यांना विमा कंपनीतर्फे विम्याच्या रूपात नुकसानभरपाई मिळते. शेतकऱ्याचे होणारे नुकसान यंदा फक्त एक रुपया भरून शेतकऱ्यांना पीकविमा संरक्षण मिळणार आहे. जिल्ह्यात विमा कंपनीद्वारे पीकविमा दिला जाणार आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना पीकविम्याबाबत आवाहन करून ठिकठिकाणी शिबिरे आयोजित केली होती. त्यामुळे ३ लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी शासनाच्या पीकविमा योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.

जिल्ह्यात खरीप २०२२ मध्ये कर्जदार शेतकरी आणि बिगरकर्जदार शेतकरी मिळून २५ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा उतरला हाेता. यावर्षी एक रुपयात पीक वीमा असल्यामुळे विक्रमी तीन लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी पीकविम्यासाठी अर्ज केले आहेत. जिल्ह्यातील १ लाख ९१ हजार १९५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित झाले आहे. शेतकऱ्याचे एक रुपयाप्रमाणे ३ लाख ७६ हजार ५३० रुपये जमा झाले आहेत.मोबाइल ॲपद्वारे नोंदणी

कृषी विभागाच्या अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी यांनी गावोगाव सीएससी केंद्र चालकाच्या मदतीने शिबिरे आयोजित केली होती. कृषी विभागाने स्वतः मोबाइल ॲपद्वारे नोंदणी करून घेतली. विमा कंपनीकडेही सतत पाठपुरावा केला. बँकासोबत वेळोवेळी बैठका घेऊन कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांची पीकविमा नोंदणी करून घेतली.कोटएक रुपयात पीक विमा उतरण्यात आला आहे. उर्वरित सर्व रक्कम केंद्र शासन भरणार आहे. पीक विमा योजनेत शेतकऱ्यांवर फारसा बोजा शासनाने टाकला नाही. यामुळे जिल्ह्यातील तीन लाख ७६ हजार ५३० शेतकऱ्यांनी विविध पिकांचा पीक विमा उतरला आहे.- विवेक कुंभार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सांगली.

टॅग्स :Sangliसांगली