शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शेतकऱ्यांच्या मुलांनो, स्वत:पुरते पाहणे थांबवा!

By admin | Updated: September 3, 2016 01:04 IST

अमर हबीब : शेतकरी संघटनेचा सांगलीत मेळावा

सांगली : आज शेतकऱ्यांची मुले शिकून गाव सोडून शहरात राहण्यास जात असून, त्यांनी स्वत:चे विश्व तयार केले आहे. याच्या बाहेर पाहण्यास ते तयार नसल्यानेच शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांनी आपल्यापुरताच विचार न करता शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करावा, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे मार्गदर्शक अमर हबीब यांनी शुक्रवारी येथे केले. शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. प्रकाशराव जाधव होते. हबीब म्हणाले की, सरकारविरोधात आणि शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या धोरणाविरोधात लढा देण्याचे बळ शरद जोशी यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांना दिले. महात्मा फुले यांनी, बहुजनांची मुले शिकली तर ती नक्कीच समाजाचे ऋण फेडतील, असा विचार मांडला होता. मात्र, असे होताना दिसत नाही. शेतकऱ्यांची मुले शिकून मोठी झाली, पण ती शेतकऱ्यांना विसरली आहेत. शहरात राहणारा हा वर्ग संघटनेच्या पाठीशी राहिला, तरच शेतकऱ्यांचे दुखणे कमी होणार आहे. सिलिंग, अत्यावश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहण कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे. मूलभूत अधिकारातून मालमत्तेचा अधिकार काढून टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. देशात वाढलेला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी लोकपाल कायद्याची आवश्यकता नाही, तर शासनाने निर्माण केलेल्या अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द केला, तर ९० टक्के भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होणार असल्याचेही अमर हबीब यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, छायाचित्रकार यांना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले. संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील, शेतकरी सेनेचे बाळासाहेब कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकर गोडसे, जयपाल फराटे, अच्युत गंगणे, पुंडलिकराव जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची ‘व्होट बँक’ अशक्यशेतकऱ्यांची ‘व्होट बँक’ करण्याविषयी अनेकजण मत व्यक्त करत असले तरी, ते आता शक्य नाही. कारण मतदार संघाच्या पुनर्रचनेमुळे नागरी मतदारांत वाढ झाली आहे. त्यामुळे शिवरायांच्या गनिमी काव्यानुसार आता संघटनेला शहरात घुसावे लागणार आहे व नागरी मतदारांसमोर समस्या व हेतू मांडावा लागणार असल्याचेही हबीब यांनी सांगितले.सरकार हे शत्रूच!सरकार हे शेतकऱ्यांचे शत्रू असते. अशी शिकवण शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली होती. त्यामुळेच कार्यकर्ते शासकीय धोरणाच्या विरोधात पोटतिडकीने लढा उभारून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतात, असे हबीब म्हणाले.