शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मुलांनो, स्वत:पुरते पाहणे थांबवा!

By admin | Updated: September 3, 2016 01:04 IST

अमर हबीब : शेतकरी संघटनेचा सांगलीत मेळावा

सांगली : आज शेतकऱ्यांची मुले शिकून गाव सोडून शहरात राहण्यास जात असून, त्यांनी स्वत:चे विश्व तयार केले आहे. याच्या बाहेर पाहण्यास ते तयार नसल्यानेच शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांनी आपल्यापुरताच विचार न करता शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करावा, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे मार्गदर्शक अमर हबीब यांनी शुक्रवारी येथे केले. शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. प्रकाशराव जाधव होते. हबीब म्हणाले की, सरकारविरोधात आणि शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या धोरणाविरोधात लढा देण्याचे बळ शरद जोशी यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांना दिले. महात्मा फुले यांनी, बहुजनांची मुले शिकली तर ती नक्कीच समाजाचे ऋण फेडतील, असा विचार मांडला होता. मात्र, असे होताना दिसत नाही. शेतकऱ्यांची मुले शिकून मोठी झाली, पण ती शेतकऱ्यांना विसरली आहेत. शहरात राहणारा हा वर्ग संघटनेच्या पाठीशी राहिला, तरच शेतकऱ्यांचे दुखणे कमी होणार आहे. सिलिंग, अत्यावश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहण कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे. मूलभूत अधिकारातून मालमत्तेचा अधिकार काढून टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. देशात वाढलेला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी लोकपाल कायद्याची आवश्यकता नाही, तर शासनाने निर्माण केलेल्या अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द केला, तर ९० टक्के भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होणार असल्याचेही अमर हबीब यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, छायाचित्रकार यांना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले. संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील, शेतकरी सेनेचे बाळासाहेब कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकर गोडसे, जयपाल फराटे, अच्युत गंगणे, पुंडलिकराव जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची ‘व्होट बँक’ अशक्यशेतकऱ्यांची ‘व्होट बँक’ करण्याविषयी अनेकजण मत व्यक्त करत असले तरी, ते आता शक्य नाही. कारण मतदार संघाच्या पुनर्रचनेमुळे नागरी मतदारांत वाढ झाली आहे. त्यामुळे शिवरायांच्या गनिमी काव्यानुसार आता संघटनेला शहरात घुसावे लागणार आहे व नागरी मतदारांसमोर समस्या व हेतू मांडावा लागणार असल्याचेही हबीब यांनी सांगितले.सरकार हे शत्रूच!सरकार हे शेतकऱ्यांचे शत्रू असते. अशी शिकवण शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली होती. त्यामुळेच कार्यकर्ते शासकीय धोरणाच्या विरोधात पोटतिडकीने लढा उभारून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतात, असे हबीब म्हणाले.