शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मुलांनो, स्वत:पुरते पाहणे थांबवा!

By admin | Updated: September 3, 2016 01:04 IST

अमर हबीब : शेतकरी संघटनेचा सांगलीत मेळावा

सांगली : आज शेतकऱ्यांची मुले शिकून गाव सोडून शहरात राहण्यास जात असून, त्यांनी स्वत:चे विश्व तयार केले आहे. याच्या बाहेर पाहण्यास ते तयार नसल्यानेच शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यांनी आपल्यापुरताच विचार न करता शेतकऱ्यांच्या कल्याणाचा विचार करावा, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे मार्गदर्शक अमर हबीब यांनी शुक्रवारी येथे केले. शरद जोशी यांच्या जयंतीनिमित्त शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. प्रकाशराव जाधव होते. हबीब म्हणाले की, सरकारविरोधात आणि शेतकऱ्यांना अडचणीत आणणाऱ्या धोरणाविरोधात लढा देण्याचे बळ शरद जोशी यांनी प्रत्येक कार्यकर्त्यांना दिले. महात्मा फुले यांनी, बहुजनांची मुले शिकली तर ती नक्कीच समाजाचे ऋण फेडतील, असा विचार मांडला होता. मात्र, असे होताना दिसत नाही. शेतकऱ्यांची मुले शिकून मोठी झाली, पण ती शेतकऱ्यांना विसरली आहेत. शहरात राहणारा हा वर्ग संघटनेच्या पाठीशी राहिला, तरच शेतकऱ्यांचे दुखणे कमी होणार आहे. सिलिंग, अत्यावश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहण कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे. मूलभूत अधिकारातून मालमत्तेचा अधिकार काढून टाकण्यात आल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. देशात वाढलेला भ्रष्टाचार कमी करण्यासाठी लोकपाल कायद्याची आवश्यकता नाही, तर शासनाने निर्माण केलेल्या अत्यावश्यक वस्तू कायदा रद्द केला, तर ९० टक्के भ्रष्टाचार कमी होण्यास मदत होणार असल्याचेही अमर हबीब यांनी सांगितले. यावेळी संघटनेच्यावतीने सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, छायाचित्रकार यांना योध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले. संघटनेच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पाटील, शेतकरी सेनेचे बाळासाहेब कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकर गोडसे, जयपाल फराटे, अच्युत गंगणे, पुंडलिकराव जाधव आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची ‘व्होट बँक’ अशक्यशेतकऱ्यांची ‘व्होट बँक’ करण्याविषयी अनेकजण मत व्यक्त करत असले तरी, ते आता शक्य नाही. कारण मतदार संघाच्या पुनर्रचनेमुळे नागरी मतदारांत वाढ झाली आहे. त्यामुळे शिवरायांच्या गनिमी काव्यानुसार आता संघटनेला शहरात घुसावे लागणार आहे व नागरी मतदारांसमोर समस्या व हेतू मांडावा लागणार असल्याचेही हबीब यांनी सांगितले.सरकार हे शत्रूच!सरकार हे शेतकऱ्यांचे शत्रू असते. अशी शिकवण शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली होती. त्यामुळेच कार्यकर्ते शासकीय धोरणाच्या विरोधात पोटतिडकीने लढा उभारून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडतात, असे हबीब म्हणाले.