शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ !

By admin | Updated: April 20, 2015 00:02 IST

पलूस तालुक्यातील स्थिती : द्राक्ष, ऊस हंगाम अंतिम टप्प्यात

किर्लोस्करवाडी : पलूस तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून काही भागात शेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. यामुळे पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचे आटोकाट प्रयत्न सुरु असून पाणी उपलब्ध करण्यासाठी धावपळ सुरू आहे. तालुक्यात ऊस व द्राक्ष हंगाम जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे.पलूस तालुका सधन तालुका म्हणून ओळखला जातो. कृष्णा नदीमुळे काही अपवाद वगळता सर्वच गावात सहकारी पाणीपुरवठा योजना आहेत, तर येरळा काठावरील गावांना आरफळचे पाणी मिळू लागले आहे. पाण्याची बऱ्यापैकी सोय असल्याने शेतीचे उत्पन्नही चांगले मिळते.एकूण २७ हजार ४४६ हेक्टरपैकी २४ हजार ६९४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तालुक्यात ऊस हे प्रमुख पीक आहे. कृष्णाकाठावर तर संपूर्ण उसाचीच शेती केली जाते. उसापाठोपाठ द्राक्षबागांचे क्षेत्रही आहे. पलूस, आंधळी, मोराळे, बांबवडे, कुंडल, आमणापूर, सांडगेवाडी, सावंतपूर, गोंदीलवाडी, शिवाजीनगर, घोगाव आदी गावांमध्ये द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. अलीकडे द्राक्षबागांमधील अडचणी लक्षात घेऊन काही द्राक्ष बागायतदार केळी, डाळिंब उत्पादनाकडे वळल्याचे पाहावयास मिळते. शेतीला जोडव्यवसाय म्हणून म्हैस, गाय, शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय येथील शेतकरी करीत आहेत. सध्या पलूस तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. कूपनलिकांच्या तसेच विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. उन्हामुळे पिकांना जास्त पाणी लागत आहे. वीजकपात व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे शेतीला वेळेत पाणी मिळत नाही. तसेच ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. जास्तीचे क्षेत्र व उशिरा सुरू झालेला गळीत हंगाम यामुळे ऊस शिल्लक आहे. ऊस तोडणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कारखान्याकडे हेलपाटे घालावे लागत आहेत. (वार्ताहर)