शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

पाण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ !

By admin | Updated: April 20, 2015 00:02 IST

पलूस तालुक्यातील स्थिती : द्राक्ष, ऊस हंगाम अंतिम टप्प्यात

किर्लोस्करवाडी : पलूस तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून काही भागात शेतीसाठी पाण्याची कमतरता जाणवू लागली आहे. यामुळे पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांचे आटोकाट प्रयत्न सुरु असून पाणी उपलब्ध करण्यासाठी धावपळ सुरू आहे. तालुक्यात ऊस व द्राक्ष हंगाम जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे.पलूस तालुका सधन तालुका म्हणून ओळखला जातो. कृष्णा नदीमुळे काही अपवाद वगळता सर्वच गावात सहकारी पाणीपुरवठा योजना आहेत, तर येरळा काठावरील गावांना आरफळचे पाणी मिळू लागले आहे. पाण्याची बऱ्यापैकी सोय असल्याने शेतीचे उत्पन्नही चांगले मिळते.एकूण २७ हजार ४४६ हेक्टरपैकी २४ हजार ६९४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तालुक्यात ऊस हे प्रमुख पीक आहे. कृष्णाकाठावर तर संपूर्ण उसाचीच शेती केली जाते. उसापाठोपाठ द्राक्षबागांचे क्षेत्रही आहे. पलूस, आंधळी, मोराळे, बांबवडे, कुंडल, आमणापूर, सांडगेवाडी, सावंतपूर, गोंदीलवाडी, शिवाजीनगर, घोगाव आदी गावांमध्ये द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. अलीकडे द्राक्षबागांमधील अडचणी लक्षात घेऊन काही द्राक्ष बागायतदार केळी, डाळिंब उत्पादनाकडे वळल्याचे पाहावयास मिळते. शेतीला जोडव्यवसाय म्हणून म्हैस, गाय, शेळीपालन, कुक्कुटपालन व्यवसाय येथील शेतकरी करीत आहेत. सध्या पलूस तालुक्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे. कूपनलिकांच्या तसेच विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. उन्हामुळे पिकांना जास्त पाणी लागत आहे. वीजकपात व वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा यामुळे शेतीला वेळेत पाणी मिळत नाही. तसेच ऊस हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. जास्तीचे क्षेत्र व उशिरा सुरू झालेला गळीत हंगाम यामुळे ऊस शिल्लक आहे. ऊस तोडणी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कारखान्याकडे हेलपाटे घालावे लागत आहेत. (वार्ताहर)