शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

ऊसतोड मजुरांकडून शेतकऱ्यांची लूट

By admin | Updated: April 17, 2015 00:11 IST

तक्रारीची दखल नाही : एकरी दहा हजार आणि कोयत्यामागे एक किलो चिकन!

प्रमोद रावळ - आळसंद -खानापूर तालुक्यातील आळसंदसह परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसतोड मजुरांसह सर्वांनीच लूट सुरू केली आहे. एक एकर ऊस तोडणीसाठी आठ ते दहा हजारासह वाहन एन्ट्रीच्या नावाखाली ५०० रूपये व प्रति कोयता एक किलो चिकनची मागणी केली जात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी साखर कारखाना प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. शेतकरी संघटनासुध्दा शेतकऱ्यांची बाजू मांडताना दिसत नसल्यामुळे तक्रार करायची कुणाकडे?, असा प्रश्न विचारला जात आहे.आळसंदसह बलवडी (भा.), खंबाळे (भा.), वाझर, भाळवणी, कमळापूर, तांदळगाव आदी गावात ताकारी व आरफळ योजनेमुळे उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मागीलवर्षी वसंतदादा कारखान्याने ऊसबिले दिलेली नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले असतानाच, मागील माहिन्यातील अवकाळी पाऊस व त्यातच ऊसतोड मजुरांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीमुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे. साखर कारखान्यांनी चालू वर्षीच्या गळीत हंगामात सुरुवातीला कार्यक्षेत्राबाहेरचा ऊस तोडून आणला. त्यामुळे कार्यक्षेत्रात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिले आहे. कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी संपवून साखर कारखान्यांनी जास्तीत जास्त टोळ्या कार्यक्षेत्रात धाडल्या. सध्या आळसंद व परिसरात क्रांती, सोनहिरा, उदगिरी, केन अ‍ॅग्रो आदीसह कारखान्यांच्या १०० ते १५० ऊसतोड टोळ्यांची संख्या आहे.सध्या साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्पात असून उसाचे शिल्लक क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ऊसतोडीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. त्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी चिटबॉयपासून मुकादम, ऊसतोड मजूर व वाहनचालक यांच्यापुढे हात जोडताना दिसत आहेत. याचाच फायदा ऊसतोड करणाऱ्या लॉबीने घेतला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना मात्र एक एकर उसाच्या तोडणीसाठी ऊसतोड मजुरांना आठ ते दहा हजार रूपये व प्रत्येक कोयत्यामागे एक किलो चिकन, वाहनचालकास ‘एन्ट्री’च्या नावाखाली प्रत्येक खेपेला ५०० रूपये हातावर ठेवल्याशिवाय वाहन फडातून बाहेर निघत नाही. याबाबत शेतकऱ्यांनी साखर कारखाना प्रशासनाकडे तक्रारी देऊनही याची दखल घेतली नाही. तसेच शेतकरी संघटनेचे नेतेही याची दखल घेताना दिसत नाहीत. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची खुलेआम आर्थिक लूट सुरू आहे, यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.नहवालदिल ऊस उत्पादकऊस उत्पादक शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे ठाकले असतानाच ऊसतोड मजुरांकडून होणाऱ्या आर्थिक लुटीमुळे शेतकरी पुरता हैराण झाला असून चिटबॉयपासून मुकादम, ऊसतोड मजूर व वाहनचालक यांच्यापुढे हात जोडताना दिसत आहेत. शेतकऱ्यांना एक एकर उसाच्या तोडणीसाठी मजुरांना आठ ते दहा हजार रूपये व प्रत्येक कोयत्यामागे एक किलो चिकन, वाहनचालकास ‘एन्ट्री’च्या नावाखाली प्रत्येक खेपेला ५०० रूपये हातावर ठेवल्याशिवाय वाहन फडातून बाहेर निघत नाही. कारखाना प्रशासनाकडे शेतकऱ्यांनी तक्रारी देऊनही याची दखल घेतली जात नाही.