शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

मंत्रिपदाच्या स्वप्नामुळे शेतकऱ्यांचे नेते गायब

By admin | Updated: March 30, 2015 00:15 IST

जयंत पाटील : केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे पश्चिम महाराष्ट्राचा विदर्भ होण्याची भीती

बोरगाव : शेतकऱ्यांचा राजकारणासाठी वापर करणारे नेते आता कुठे गेले? मंत्रिपदाची स्वप्ने पडू लागल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून बाजूला गेलेल्या या नेत्यांना आता शोधण्याची वेळ आली आहे, अशी टीका आ. जयंत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. बोरगाव (ता. वाळवा) येथे आज रविवारी त्यांचा आभार दौरा पार पडला. यावेळी राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे साखर उद्योग व शेतकरी अडचणीत आला आहे. हीच परिस्थिती राहिली, तर पश्चिम महाराष्ट्रातील साखर पट्टा संपुष्टात येऊन विदर्भासारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही. केंद्र शासन व राज्य शासनाने त्वरित निर्णय घेऊन यावर्षी तरी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीप्रमाणे त्यांच्या खात्यावर सबसीडी देऊन वाचवावे व कारखाने वाचवण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन मोलॅसिस निर्यातीचा परवाना द्यावा. सरकारने एफ. आर. पी. मधील फरक कारखान्याकडे न देता संबंधित शेतकऱ्याला त्याच्या खात्यावर द्यावा. कोरड्या वल्गना करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साखरेचा प्रश्न सोडवता येत नाही, ही खंत आहे. सरकारने पक्ष निष्ठा व राजकारण हे न पाहता साखर कारखाने व शेतकरी वाचवण्यासाठी पुढे यायला हवे. जर केंद्र सरकार व राज्य सरकारने कच्च्या साखर निर्यातीचा निर्णय सुरुवातीलाच घेतला असता तर, बऱ्याच कारखान्यांनी नोव्हेंबर पूर्वी कच्ची साखर निर्यात केली असती. परंतु तसे न झाल्याने केवळी तीन ते चारच कारखान्यांनी कच्ची साखर निर्यात केली आहे. आता हंगाम बंद व्हायला अवघा १0 ते १५ दिवसांचा अवधी राहिला आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात शासन यावर तोडगा काढेल. यावेळी माणिकराव पाटील, रवींद्र बर्डे, बी. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रकाश वाटेगावकर यांनी स्वागत केले. विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच केशव वाटेगावकर, रामराव देशमुख, विष्णूपंत शिंदे, शहाजी पाटील, संजय पाटील, माणिक शा. पाटील, अशोकराव पाटील, उल्हास घाडगे, कार्तिक पाटील, उमेश पाटील, सर्जेराव देशमुख, युवराज कांबळे उपस्थित होते. (वार्ताहर)विरोधकांची व्यवस्था करूबोरगावने मला राजकारणाचे धडे दिले. इतर गावांपेक्षा बोरगावचे आणि माझे वेगळे नाते आहे. गावाला भेडसावणारा क्षारपड जमिनीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल. त्यासाठी प्रयत्न केले जातील. गावाने गावातीलच माझ्याविरोधी उमेदवारापेक्षा ८२ मते अधिक दिली यात समाधानी आहे. मी कोणावर नाराज नसून, भविष्यात माझ्याविरोधात या गावातून कोणीही उभारणार नाही, याची व्यवस्था करू, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.