शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

जत तालुक्यातील शेतकरी ‘म्हैसाळ’च्या पाण्याच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जत : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरीही जत तालुक्याच्या सीमेवरील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जत : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू होऊन पंधरा दिवस उलटले तरीही जत तालुक्याच्या सीमेवरील एक-दोन गावातच पाणी आले आहे. तालुक्यात पाणी पाेहाेचताच पाण्याचा वेग कमी झाल्याने उर्वरित भागात अद्याप पाणी आलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी म्हैसाळ योजनेच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

म्हैसाळ योजनेच्या पाण्यातून तालुक्यातील तेवीस गावांतील दहा टक्के क्षेत्र ओलिताखाली आले आहे. आवर्तन सुरू झाल्यानंतर प्रतापूर ते डोर्लीदरम्यान पाणी आले. यानंतर आपोआप पाण्याचा वेग कमी होत असल्यामुळे डोर्लीच्या पुढे पाणी सरकत नाही. त्यामुळे तालुक्याच्या उत्तर भागातील बनाळी, अचकनहळ्ळी, शेगाव, जत, कोसारी, कुंभारी, वायफळ, तिप्पेहळ्ळी या भागातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

सध्या उन्हाळी मका, ऊस, कापूस, भुईमूग आदी पिकांची लागण सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे विहिरी व विंधन विहिरीतील पाण्याची पातळी वेगाने खालावत आहे. ओढे - नाले व तलावांतील पाण्याचा साठा कमी होऊ लागला आहे. यामुळे म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू झाल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या, परंतु कालव्यातून येणाऱ्या पाण्याचा वेग कमी असल्यामुळे पाणी पुढे सरकत नाही. डोर्लीपर्यंत पाणी आल्यानंतर पाठीमागून आपोआप पाणी बंद होते. यासंदर्भात या भागातील शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, पाण्याचा वेग वाढवू, असे सांगण्यात आले आहे.

चौकट

आजपासून पाण्याचा वेग वाढणार : विक्रम सावंत

म्हैसाळ योजनेच्या पाण्याचा वेग वाढविण्याची सूचना म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. सध्या कमी प्रमाणात पाणी साेडण्यात येत असल्यामुळे प्रतापूर ते डोर्लीपर्यंत पाणी येऊन ते बंद होते. त्यापुढे पाणी अद्याप आले नाही. बुधवार दि. ३१ मार्चपासून पाणी उपसा वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार विक्रम सावंत यांनी दिली.