शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शेतकऱ्यांनी मैदान सोडलेलेच नाही! अजित नवले : सांगलीत किसान सभेचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:41 IST

सांगली : महामुक्काम आंदोलन, तिरडी मोर्चा, शेतकरी संप, लाँग मार्चनंतर राज्यातील भाजप सरकारने शेतकºयांच्या मागण्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

सांगली : महामुक्काम आंदोलन, तिरडी मोर्चा, शेतकरी संप, लाँग मार्चनंतर राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पण आता दोन महिने उलटले तरी, या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. भाजपने पुन्हा आपला रंग दाखविण्यास सुरूवात केली असली तरी, शेतकऱ्यांच्या पोरांनी अजून मैदान सोडलेले नाही, अशा शब्दात सरकारवर हल्ला चढवत, शेतकरी संपाच्या वर्षपूर्ती दिनापासून पुन्हा आंदोलन हाती घेत असल्याचे किसान सभेचे राज्य सरचिटणीस अ‍ॅड. अजित नवले यांनी सोमवारी सांगितले.

सांगलीत मराठा सेवा संघाच्या सभागृहात किसान सभेचा मेळावा झाला, यावेळी नवले बोलत होते. या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, राज्य सचिव दिगंबर कांबळे, कमिटी सदस्य सुभाष निकम, अरुण माने उपस्थित होते.नवले म्हणाले की, भाजपने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकरी संप व लाँग मार्चवेळी सरकारने शेतकºयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी दीड महिन्याचा कालावधीही मागून घेतला. पण आता दोन महिने झाले तरी आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. कर्जमाफीच्या निकषात बदल केले, पण सरसकट कर्जमाफीचा प्रश्न निकाली निघालेला नाही. अजून २०१७ मधील थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुणांना नोकºया नाहीत. शेती परवडत नाही, म्हणून तोही आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांची ही हतबलता संपवून, त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, यासाठी किसान सभेने लढा हाती घेतला. सरकारच्या धोरणाचीच तिरडी उचलण्याचे आंदोलन केले. ४० हजार शेतकºयांनी लॉँग मार्चमध्ये सहभाग घेत एल्गार पुकारला, तेव्हा कुठे सरकारला जाग आली. पण आंदोलन थंडावताच पुन्हा सरकारने रंग दाखविण्यास सुरूवात केली आहे. शेतकºयांचा विश्वासघात करणाºया सरकारविरोधात पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकºयांच्या पोरांनी अजून मैदानातून पळ काढलेला नाही. येत्या १ जूनला शेतकरी संपाला वर्ष पूर्ण होत आहे. संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दूध दर यासह विविध मागण्यांसाठी यादिवशी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाला घेराव घालणार आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्ह्यातील शेतकºयांनी देवस्थान जमिनीचा प्रश्न मांडला. शासनाने या जमिनी काढून घेण्याचा डाव आखला असून त्याविरोधात एकत्रित संघर्ष करण्याचा निर्धारही मेळाव्यात केला. या मेळाव्याला खंडेराव वाघचौरे, गुलाब मुलाणी, गवस शिरोळकर, सुदर्शन घेरडे, रियाज जमादार, सुधीर गावडे, कुमार सकळे आदी उपस्थित होते.लबाडांना : ग्लास भरून दूधदुधाला लिटरमागे २७ रुपये दर मिळावा, यासाठी ३ ते ९ मेदरम्यान मोफत दुधाचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गुजरातहून मोदी ग्लास मागवावेत. हे ग्लास बाहेरून ५६ इंचाचे दिसत असले तरी, आतमध्ये ५६ थेंबही दूध मावत नाही. या लबाडांना ग्लास भरून दूध दिले तरी ते सुधारणार नाहीत, असा टोलाही नवले यांनी लगाविला.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण