शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

शेतकऱ्यांनी मैदान सोडलेलेच नाही! अजित नवले : सांगलीत किसान सभेचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:41 IST

सांगली : महामुक्काम आंदोलन, तिरडी मोर्चा, शेतकरी संप, लाँग मार्चनंतर राज्यातील भाजप सरकारने शेतकºयांच्या मागण्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

सांगली : महामुक्काम आंदोलन, तिरडी मोर्चा, शेतकरी संप, लाँग मार्चनंतर राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पण आता दोन महिने उलटले तरी, या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. भाजपने पुन्हा आपला रंग दाखविण्यास सुरूवात केली असली तरी, शेतकऱ्यांच्या पोरांनी अजून मैदान सोडलेले नाही, अशा शब्दात सरकारवर हल्ला चढवत, शेतकरी संपाच्या वर्षपूर्ती दिनापासून पुन्हा आंदोलन हाती घेत असल्याचे किसान सभेचे राज्य सरचिटणीस अ‍ॅड. अजित नवले यांनी सोमवारी सांगितले.

सांगलीत मराठा सेवा संघाच्या सभागृहात किसान सभेचा मेळावा झाला, यावेळी नवले बोलत होते. या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, राज्य सचिव दिगंबर कांबळे, कमिटी सदस्य सुभाष निकम, अरुण माने उपस्थित होते.नवले म्हणाले की, भाजपने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकरी संप व लाँग मार्चवेळी सरकारने शेतकºयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी दीड महिन्याचा कालावधीही मागून घेतला. पण आता दोन महिने झाले तरी आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. कर्जमाफीच्या निकषात बदल केले, पण सरसकट कर्जमाफीचा प्रश्न निकाली निघालेला नाही. अजून २०१७ मधील थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुणांना नोकºया नाहीत. शेती परवडत नाही, म्हणून तोही आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांची ही हतबलता संपवून, त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, यासाठी किसान सभेने लढा हाती घेतला. सरकारच्या धोरणाचीच तिरडी उचलण्याचे आंदोलन केले. ४० हजार शेतकºयांनी लॉँग मार्चमध्ये सहभाग घेत एल्गार पुकारला, तेव्हा कुठे सरकारला जाग आली. पण आंदोलन थंडावताच पुन्हा सरकारने रंग दाखविण्यास सुरूवात केली आहे. शेतकºयांचा विश्वासघात करणाºया सरकारविरोधात पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकºयांच्या पोरांनी अजून मैदानातून पळ काढलेला नाही. येत्या १ जूनला शेतकरी संपाला वर्ष पूर्ण होत आहे. संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दूध दर यासह विविध मागण्यांसाठी यादिवशी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाला घेराव घालणार आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्ह्यातील शेतकºयांनी देवस्थान जमिनीचा प्रश्न मांडला. शासनाने या जमिनी काढून घेण्याचा डाव आखला असून त्याविरोधात एकत्रित संघर्ष करण्याचा निर्धारही मेळाव्यात केला. या मेळाव्याला खंडेराव वाघचौरे, गुलाब मुलाणी, गवस शिरोळकर, सुदर्शन घेरडे, रियाज जमादार, सुधीर गावडे, कुमार सकळे आदी उपस्थित होते.लबाडांना : ग्लास भरून दूधदुधाला लिटरमागे २७ रुपये दर मिळावा, यासाठी ३ ते ९ मेदरम्यान मोफत दुधाचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गुजरातहून मोदी ग्लास मागवावेत. हे ग्लास बाहेरून ५६ इंचाचे दिसत असले तरी, आतमध्ये ५६ थेंबही दूध मावत नाही. या लबाडांना ग्लास भरून दूध दिले तरी ते सुधारणार नाहीत, असा टोलाही नवले यांनी लगाविला.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण