शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
6
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
7
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
8
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
9
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
10
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
12
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
13
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
14
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
15
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
16
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
17
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
18
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
20
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी मैदान सोडलेलेच नाही! अजित नवले : सांगलीत किसान सभेचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 23:41 IST

सांगली : महामुक्काम आंदोलन, तिरडी मोर्चा, शेतकरी संप, लाँग मार्चनंतर राज्यातील भाजप सरकारने शेतकºयांच्या मागण्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

सांगली : महामुक्काम आंदोलन, तिरडी मोर्चा, शेतकरी संप, लाँग मार्चनंतर राज्यातील भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या दीड महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. पण आता दोन महिने उलटले तरी, या मागण्यांची पूर्तता झालेली नाही. भाजपने पुन्हा आपला रंग दाखविण्यास सुरूवात केली असली तरी, शेतकऱ्यांच्या पोरांनी अजून मैदान सोडलेले नाही, अशा शब्दात सरकारवर हल्ला चढवत, शेतकरी संपाच्या वर्षपूर्ती दिनापासून पुन्हा आंदोलन हाती घेत असल्याचे किसान सभेचे राज्य सरचिटणीस अ‍ॅड. अजित नवले यांनी सोमवारी सांगितले.

सांगलीत मराठा सेवा संघाच्या सभागृहात किसान सभेचा मेळावा झाला, यावेळी नवले बोलत होते. या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख, राज्य सचिव दिगंबर कांबळे, कमिटी सदस्य सुभाष निकम, अरुण माने उपस्थित होते.नवले म्हणाले की, भाजपने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. शेतकरी संप व लाँग मार्चवेळी सरकारने शेतकºयांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी दीड महिन्याचा कालावधीही मागून घेतला. पण आता दोन महिने झाले तरी आश्वासनाची पूर्तता केलेली नाही. कर्जमाफीच्या निकषात बदल केले, पण सरसकट कर्जमाफीचा प्रश्न निकाली निघालेला नाही. अजून २०१७ मधील थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. शेतकरी आत्महत्या करीत आहेत. तरुणांना नोकºया नाहीत. शेती परवडत नाही, म्हणून तोही आत्महत्या करीत आहे. शेतकऱ्यांची ही हतबलता संपवून, त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे, यासाठी किसान सभेने लढा हाती घेतला. सरकारच्या धोरणाचीच तिरडी उचलण्याचे आंदोलन केले. ४० हजार शेतकºयांनी लॉँग मार्चमध्ये सहभाग घेत एल्गार पुकारला, तेव्हा कुठे सरकारला जाग आली. पण आंदोलन थंडावताच पुन्हा सरकारने रंग दाखविण्यास सुरूवात केली आहे. शेतकºयांचा विश्वासघात करणाºया सरकारविरोधात पुन्हा मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. शेतकºयांच्या पोरांनी अजून मैदानातून पळ काढलेला नाही. येत्या १ जूनला शेतकरी संपाला वर्ष पूर्ण होत आहे. संपूर्ण कर्जमाफी, स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी, दूध दर यासह विविध मागण्यांसाठी यादिवशी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयाला घेराव घालणार आहोत, असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्ह्यातील शेतकºयांनी देवस्थान जमिनीचा प्रश्न मांडला. शासनाने या जमिनी काढून घेण्याचा डाव आखला असून त्याविरोधात एकत्रित संघर्ष करण्याचा निर्धारही मेळाव्यात केला. या मेळाव्याला खंडेराव वाघचौरे, गुलाब मुलाणी, गवस शिरोळकर, सुदर्शन घेरडे, रियाज जमादार, सुधीर गावडे, कुमार सकळे आदी उपस्थित होते.लबाडांना : ग्लास भरून दूधदुधाला लिटरमागे २७ रुपये दर मिळावा, यासाठी ३ ते ९ मेदरम्यान मोफत दुधाचे वाटप केले जाणार आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी गुजरातहून मोदी ग्लास मागवावेत. हे ग्लास बाहेरून ५६ इंचाचे दिसत असले तरी, आतमध्ये ५६ थेंबही दूध मावत नाही. या लबाडांना ग्लास भरून दूध दिले तरी ते सुधारणार नाहीत, असा टोलाही नवले यांनी लगाविला.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारण