शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उपसा बंदीच्या विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा

By admin | Updated: May 31, 2016 00:31 IST

बंदी न उठविल्यास जिल्हा बंद : कोयनेतून सोडलेल्या पाण्याचे योग्य नियोजन नसल्याबद्दल संताप

सांगली : कोयनेतून सोडण्यात आलेल्या पाण्याचे योग्य नियोजन न करता उलट नदीकाठी उपसाबंदीचा आदेश लागू केल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. इतर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी एक न्याय व सांगली जिल्ह्यास एक न्याय देणाऱ्या प्रशासनाने, पिके वाळून चालल्याने तातडीने उपसाबंदी उठवावी, यासह इतर मागण्यांसाठी इरिगेशन फेडरेशनच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. उपसाबंदी उठवावी, अन्यथा रोषाला सामोरे जावे, असा इशाराच यावेळी आंदोलकांनी दिला. यंदा झालेले कमी पाऊसमान व धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे पाटबंधारे विभागाच्यावतीने सुरू केलेल्या उपसाबंदीच्या विरोधात जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्यावतीने क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात कडेगाव, पलूस, वाळवा, मिरज तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चास आमराईपासून सुरूवात झाली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. उपसाबंदी उठविण्यात यावी, या प्रमुख मागणीसह कोयनेच्या पाण्यातून वीज निर्मिती बंद करून सर्व पाणी शेतीसाठी व पिण्यासाठी ठेवण्यात यावे, बहे बंधारा ते नागठाणे बंधारा उपसाबंदी उठविण्यात यावी, जून महिन्यात पाऊस सुरू होईपर्यंत सर्व ठिकाणी समान पाणी वाटप करण्यात यावे, चांदोलीचे पाणी मिरजेपासून पुढे देण्यात यावे आदी मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. यावेळी अरूण लाड म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीमुळे संपूर्ण जिल्ह्यातीलच शेतकरी अडचणीत आहेत. शेतीमालाच्या उत्पादनात लक्षणीय घट जाणवत आहे. आज शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आली आहे. मात्र पाण्याचे समान न्याय हक्काने वाटप झाले असते, तर ही वेळच आली नसती. यंदा पाऊसमान समाधानकारक असल्याचे सांगण्यात येत असल्याने, प्रशासनाने मान्सून सक्रिय होईपर्यंत उपसाबंदी लादू नये. प्रशासनाला जागे करण्यासाठी सनदशीर मार्गाचा अवलंब करण्यात येत असून, तरीही उपसाबंदी लादल्यास, रस्त्यावर उतरून आंदोलन करत जिल्हा बंद करू. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत, आंदोलनातील पदाधिकाऱ्यांनी उपसाबंदीचा निर्णय आणि शेतकऱ्यांचे होणारे हाल यावर आपली भूमिका मांडली. शासनाकडून उपसाबंदी लागूच ठेवल्यास आंदोलन तीव्र करणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अरुण लाड, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, जे. पी. लाड, दिलीप पाटील, विजय महाडिक, पोपट फडतरे, के. बी. पाटील, अनिल लाड, विश्वनाथ मिरजकर, विजय पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)बंदी उठविण्यासाठी प्रयत्न : गायकवाडजिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असल्याने सध्या लागू करण्यात आलेली उपसाबंदी उठविण्यात यावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. उपसा बंदीचा निर्णय पुढे न वाढवता अन्य पर्यायांवर पाटबंधारे विभागाशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.बंदी उठविण्यासाठी प्रयत्न : गायकवाडजिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत असल्याने सध्या लागू करण्यात आलेली उपसाबंदी उठविण्यात यावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. उपसा बंदीचा निर्णय पुढे न वाढवता अन्य पर्यायांवर पाटबंधारे विभागाशी चर्चा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.शिवरायांच्या वंशजांनी जिल्ह्याचे नव्हे, तर सर्वांचे नेते व्हावे!जिल्ह्यातील शेतकरी पाण्याअभावी अडचणीत आला असताना, जिल्ह्यातील एकाही नेत्याने याविरोधात आवाज उठवला नाही. याउलट सातारा जिल्ह्यात पाणी मिळत नसल्याने शिवरायांचे वंशज असलेल्या उदयनराजेंनी तंबी दिली आहे. मात्र, त्यांनी, तुम्ही शिवरायांचे वंशज आहात, हे ध्यानात ठेवत केवळ जिल्ह्याचे नेतृत्व न करता सर्वांचे नेतृत्व करावे, असे आवाहन यावेळी अरुण लाड यांनी केले.सांगलीत झालेल्या बैठकीतील निर्णयमोर्चानंतर आंदोलक व जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत, मध्यंतरी वादळामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने ४८ तासांची उपसाबंदी वाढविण्यात येणार, उद्या (मंगळवार) पासून उपसाबंदी उठविण्यात येणार, उपसाबंदीबाबत अनियमितता असणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याचे व कोयनेतील वीजनिर्मिती बंद करून पाण्याचा शेतीसाठी व पिण्यासाठी वापर करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.