शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
11
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
12
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
13
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
14
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
15
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
17
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
18
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
19
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त
20
दीड लाख जागांसाठी अवघे ५० हजार प्रवेश; आयटीआयच्या दुसऱ्या फेरीतही विद्यार्थ्यांचा अल्प प्रतिसाद

जयंतरावांच्या महत्त्वाकांक्षेमुळे शेतकरी वेठीस

By admin | Updated: October 9, 2015 23:08 IST

पृथ्वीराज पवार : रक्कम कपातीस विरोध; कायदेशीर लढाईचा इशारा

सांगली : राजारामबापू कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या रकमेतून प्रति टन १४३ रूपये इतर प्रकल्पांच्या नावाखाली कपात केली जात आहे. केवळ जयंत पाटील यांच्या महत्त्वाकांक्षेसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार बैठकीत केला. या कपातीचा सर्वोदय कारखान्याच्या सभासदांना कसलाही लाभ होणार नाही. त्यामुळे याविरोधात जिल्हाधिकारी व साखर आयुक्तांकडे तक्रार करणार असून वेळप्रसंगी कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.ते म्हणाले, राजारामबापू कारखान्याने को-जनरेशन, नक्त मूल्यच्या नावाखाली ऊस उत्पादकांकडून प्रति टनामागे १४३ रूपये कपात केले आहेत. याचा लाभ ‘राजारामबापू’च्या सभासदांना होणार आहे. ‘सर्वाेदय’चे १४ हजार व जत येथील डफळे कारखान्याचे २६ हजार सभासदांना, ते राजारामबापू कारखान्याचे सभासद नसल्याने कोणताही लाभ होणार नाही. उलट ही रक्कम कपात केल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.एफआरपीतून कसलीही रक्कम कारखान्याला कपात करता येत नाही. याविरोधात आवाज उठविल्यानंतर कारखान्याने संबंधित शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी न घेण्याची धमकी दिली आहे. आ. जयंत पाटील यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जपण्यासाठी तर आफ्रिकेतील गुंतवणुकीच्या फॅन्टसीमुळे शेतकरी भरडला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. ही रक्कम कपात न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा पवार यांनी दिला. (प्रतिनिधी)‘सर्वाेदय’च्या सभासदांना ३०० रुपयांचा तोटाराजारामबापू कारखान्याच्यावतीने साखराळे, वाटेगाव, जत व सर्वोदय ही युनिट चालविली जातात. साखराळे येथे साखर उतारा १२.८५ टक्के, वाटेगावचा १२.८५, जतचा ११.७५, तर सर्वाेदय कारखान्याचा उतारा १३.0३ टक्के आहे. ‘सर्वोदय’ने स्वतंत्र गाळप केले असते, तर शेतकऱ्यांना सध्याच्या दरात प्रति टन २०० रूपये जादा दर मिळाला असता. मात्र चार युनिटचा सरासरी उतारा कमी निघत असल्याने सर्वाेदय कारखान्याच्या सभासदांना प्रतिटन ३०० रूपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.