शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

जयंतरावांच्या महत्त्वाकांक्षेमुळे शेतकरी वेठीस

By admin | Updated: October 9, 2015 23:08 IST

पृथ्वीराज पवार : रक्कम कपातीस विरोध; कायदेशीर लढाईचा इशारा

सांगली : राजारामबापू कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या रकमेतून प्रति टन १४३ रूपये इतर प्रकल्पांच्या नावाखाली कपात केली जात आहे. केवळ जयंत पाटील यांच्या महत्त्वाकांक्षेसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार बैठकीत केला. या कपातीचा सर्वोदय कारखान्याच्या सभासदांना कसलाही लाभ होणार नाही. त्यामुळे याविरोधात जिल्हाधिकारी व साखर आयुक्तांकडे तक्रार करणार असून वेळप्रसंगी कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.ते म्हणाले, राजारामबापू कारखान्याने को-जनरेशन, नक्त मूल्यच्या नावाखाली ऊस उत्पादकांकडून प्रति टनामागे १४३ रूपये कपात केले आहेत. याचा लाभ ‘राजारामबापू’च्या सभासदांना होणार आहे. ‘सर्वाेदय’चे १४ हजार व जत येथील डफळे कारखान्याचे २६ हजार सभासदांना, ते राजारामबापू कारखान्याचे सभासद नसल्याने कोणताही लाभ होणार नाही. उलट ही रक्कम कपात केल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.एफआरपीतून कसलीही रक्कम कारखान्याला कपात करता येत नाही. याविरोधात आवाज उठविल्यानंतर कारखान्याने संबंधित शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी न घेण्याची धमकी दिली आहे. आ. जयंत पाटील यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जपण्यासाठी तर आफ्रिकेतील गुंतवणुकीच्या फॅन्टसीमुळे शेतकरी भरडला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. ही रक्कम कपात न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा पवार यांनी दिला. (प्रतिनिधी)‘सर्वाेदय’च्या सभासदांना ३०० रुपयांचा तोटाराजारामबापू कारखान्याच्यावतीने साखराळे, वाटेगाव, जत व सर्वोदय ही युनिट चालविली जातात. साखराळे येथे साखर उतारा १२.८५ टक्के, वाटेगावचा १२.८५, जतचा ११.७५, तर सर्वाेदय कारखान्याचा उतारा १३.0३ टक्के आहे. ‘सर्वोदय’ने स्वतंत्र गाळप केले असते, तर शेतकऱ्यांना सध्याच्या दरात प्रति टन २०० रूपये जादा दर मिळाला असता. मात्र चार युनिटचा सरासरी उतारा कमी निघत असल्याने सर्वाेदय कारखान्याच्या सभासदांना प्रतिटन ३०० रूपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.