शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जयंतरावांच्या महत्त्वाकांक्षेमुळे शेतकरी वेठीस

By admin | Updated: October 9, 2015 23:08 IST

पृथ्वीराज पवार : रक्कम कपातीस विरोध; कायदेशीर लढाईचा इशारा

सांगली : राजारामबापू कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या एफआरपीच्या रकमेतून प्रति टन १४३ रूपये इतर प्रकल्पांच्या नावाखाली कपात केली जात आहे. केवळ जयंत पाटील यांच्या महत्त्वाकांक्षेसाठी शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप सर्वोदय साखर कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार बैठकीत केला. या कपातीचा सर्वोदय कारखान्याच्या सभासदांना कसलाही लाभ होणार नाही. त्यामुळे याविरोधात जिल्हाधिकारी व साखर आयुक्तांकडे तक्रार करणार असून वेळप्रसंगी कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिला.ते म्हणाले, राजारामबापू कारखान्याने को-जनरेशन, नक्त मूल्यच्या नावाखाली ऊस उत्पादकांकडून प्रति टनामागे १४३ रूपये कपात केले आहेत. याचा लाभ ‘राजारामबापू’च्या सभासदांना होणार आहे. ‘सर्वाेदय’चे १४ हजार व जत येथील डफळे कारखान्याचे २६ हजार सभासदांना, ते राजारामबापू कारखान्याचे सभासद नसल्याने कोणताही लाभ होणार नाही. उलट ही रक्कम कपात केल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे.एफआरपीतून कसलीही रक्कम कारखान्याला कपात करता येत नाही. याविरोधात आवाज उठविल्यानंतर कारखान्याने संबंधित शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी न घेण्याची धमकी दिली आहे. आ. जयंत पाटील यांची राजकीय महत्त्वाकांक्षा जपण्यासाठी तर आफ्रिकेतील गुंतवणुकीच्या फॅन्टसीमुळे शेतकरी भरडला जात असल्याचा आरोप पवार यांनी केला. ही रक्कम कपात न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा पवार यांनी दिला. (प्रतिनिधी)‘सर्वाेदय’च्या सभासदांना ३०० रुपयांचा तोटाराजारामबापू कारखान्याच्यावतीने साखराळे, वाटेगाव, जत व सर्वोदय ही युनिट चालविली जातात. साखराळे येथे साखर उतारा १२.८५ टक्के, वाटेगावचा १२.८५, जतचा ११.७५, तर सर्वाेदय कारखान्याचा उतारा १३.0३ टक्के आहे. ‘सर्वोदय’ने स्वतंत्र गाळप केले असते, तर शेतकऱ्यांना सध्याच्या दरात प्रति टन २०० रूपये जादा दर मिळाला असता. मात्र चार युनिटचा सरासरी उतारा कमी निघत असल्याने सर्वाेदय कारखान्याच्या सभासदांना प्रतिटन ३०० रूपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले.