शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

‘स्वाभिमानी’चे रविवारपासून शेतकरी जागृती अभियान

By admin | Updated: December 15, 2015 00:42 IST

वासुंबेतून सुरुवात : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार--लोकमतचा प्रभाव

तासगाव : तासगाव तालुक्यात यापुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नयेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कंबर कसली आहे. शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी रविवारपासून (ता. २०) गावा-गावात अभियान राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात वासुंबे गावातून होणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदतीसाठी संघटना पुढाकार घेणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.तालुक्यात विदर्भाप्रमाणे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शासनाचे चुकीचे धोरण हेच यामागचे मुख्य कारण आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी, कर्ज वसुलीचा तगादा मागे लावणाऱ्यांचीच हत्या करावी. कोणाकडून कर्ज वसुलीचा तगादा लावला जात असल्यास यापुढे स्वाभिमानी संघटनेशी संपर्क साधावा. संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. कर्जबाजारीपणामुळे यापुढे तालुक्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये, यासाठी स्वाभिमानी संघटना २० तारखेपासून गावा-गावात जनजागृती अभियान राबविणार आहे. याच अभियानांतर्गत लोकांकडून आर्थिक मदत गोळा करुन, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहितीही खराडे यांनी दिली.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, शेतकऱ्यांच्या बाबतीतले जाचक निकष बदलावेत, यासह अन्य मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी खराडे यांनी दिला. शेतकऱ्यांच्यामदतीसाठी स्वाभिमानी संघटनेकडून हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. अडचणीत किंवा नैराश्येत असलेल्या शेतकऱ्यांनी हेल्पलाईनशी संपर्क साधल्यास, संघटनेकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक खाडे, सनत पाटील, गुलाबराव यादव, शरद शेळके, अर्जुन थोरात, सचिन पाटील, विशाल शिंंदे उपस्थित होते. (वार्ताहर)‘लोकमत’च्या बातमीने संघटना सरसावल्या ‘लोकमत’मधून तासगाव तालुक्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत तीन दिवस प्रकाशझोत टाकण्यात आला होता. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे भीषण वास्तव मांडण्यात आले होते. या बातम्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनाही शेतकऱ्यांसाठी सरसावल्या आहेत. तालुक्याचे राजकीय नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे मात्र अद्यापही या घटनेकडे दुर्लक्ष आहे.