शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

‘स्वाभिमानी’चे रविवारपासून शेतकरी जागृती अभियान

By admin | Updated: December 15, 2015 00:42 IST

वासुंबेतून सुरुवात : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांच्या मदतीसाठी पुढाकार--लोकमतचा प्रभाव

तासगाव : तासगाव तालुक्यात यापुढे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊच नयेत, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कंबर कसली आहे. शेतकऱ्यांच्या जागृतीसाठी रविवारपासून (ता. २०) गावा-गावात अभियान राबविण्यात येणार आहे. त्याची सुरुवात वासुंबे गावातून होणार आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला मदतीसाठी संघटना पुढाकार घेणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.तालुक्यात विदर्भाप्रमाणे दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. शासनाचे चुकीचे धोरण हेच यामागचे मुख्य कारण आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी, कर्ज वसुलीचा तगादा मागे लावणाऱ्यांचीच हत्या करावी. कोणाकडून कर्ज वसुलीचा तगादा लावला जात असल्यास यापुढे स्वाभिमानी संघटनेशी संपर्क साधावा. संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील. कर्जबाजारीपणामुळे यापुढे तालुक्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होऊ नये, यासाठी स्वाभिमानी संघटना २० तारखेपासून गावा-गावात जनजागृती अभियान राबविणार आहे. याच अभियानांतर्गत लोकांकडून आर्थिक मदत गोळा करुन, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याची माहितीही खराडे यांनी दिली.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, शेतकऱ्यांच्या बाबतीतले जाचक निकष बदलावेत, यासह अन्य मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही यावेळी खराडे यांनी दिला. शेतकऱ्यांच्यामदतीसाठी स्वाभिमानी संघटनेकडून हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहे. अडचणीत किंवा नैराश्येत असलेल्या शेतकऱ्यांनी हेल्पलाईनशी संपर्क साधल्यास, संघटनेकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष अशोक खाडे, सनत पाटील, गुलाबराव यादव, शरद शेळके, अर्जुन थोरात, सचिन पाटील, विशाल शिंंदे उपस्थित होते. (वार्ताहर)‘लोकमत’च्या बातमीने संघटना सरसावल्या ‘लोकमत’मधून तासगाव तालुक्यात होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत तीन दिवस प्रकाशझोत टाकण्यात आला होता. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे भीषण वास्तव मांडण्यात आले होते. या बातम्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह अन्य संघटनाही शेतकऱ्यांसाठी सरसावल्या आहेत. तालुक्याचे राजकीय नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे मात्र अद्यापही या घटनेकडे दुर्लक्ष आहे.