शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
3
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
4
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
5
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
6
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
7
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
8
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
9
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
10
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
11
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
12
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
13
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
14
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
15
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
16
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
17
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
18
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
19
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
20
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा

‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’बाबत खोटा प्रचार; एजंटांचा पैसा कमविण्याचा खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 23:57 IST

गोटखिंडी (ता. वाळवा) परिसरात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेतून दोन लाख रुपये मिळणार, या नव्या प्रचाराने धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसात गोटखिंडी पोस्टातून ६०० पेक्षा

ठळक मुद्देफसव्या योजना : वाळवा तालुक्यात धुमाकूळ बंदोबस्त करण्याची मागणी

प्रतापसिंह माने ।गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) परिसरात ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेतून दोन लाख रुपये मिळणार, या नव्या प्रचाराने धुमाकूळ घातला आहे. गेल्या चार दिवसात गोटखिंडी पोस्टातून ६०० पेक्षा जास्त अर्ज पाठविले गेले आहेत.

पोस्टाकडे व कोणत्याही शासकीय विभागाकडे या योजनेबाबत माहिती नसल्याचे सांगूनसुध्दा, काही एजंटांचा पैसे मिळविण्याचा उद्योग जोमात सुरू आहे. गोटखिंडीत गत महिन्यात पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत ५०० वर मोफत गॅस कनेक्शन्स मिळाली. तोपर्यंत ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना’ सुरू होऊन काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार रुपये जमा झाले. याचा फायदा घेत आॅनलाईन बिनव्याजी कर्ज मिळविण्याचा फंडा सुरू झाला. त्यासाठी दोनशे ते पाचशे रुपयांची मागणी करून अर्ज जमा करुन घेतले गेले. काही एजंटांकरवी हे सुरू असतानाच, गेल्या चार दिवसांपासून पंतप्रधान ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेंतर्गत कुटुंबाला दोन लाख मिळणार, हा प्रचार सुरू झाला.

यासाठी एक अर्ज असून त्यावर कुटुंबाची माहिती, आधार क्रमांक, बँक खाते नंबर भरून मुलीचे छायाचित्र लावले जाते. हा अर्ज केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाच्या पत्त्यावर पाठविण्यासाठी पोस्टात गर्दी होऊ लागली आहे. हा अर्ज पाठविण्यासाठी प्रत्येकास ५० रुपये खर्च आहे. बँक खाते काढण्यासाठी धावपळ व पैसे खर्च होऊ लागले आहेत. याबाबत सरपंचही अनभिज्ञ असून येणाऱ्या प्रत्येक अर्जावर ते सही करत आहेत. आजूबाजूच्या गावांतील मुली व पालकही गोटखिंडीत अर्ज देत आहेत.योजनाच नसल्याचा खुलासाचार दिवसांपासून या परिसरात पंतप्रधान ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेंतर्गत दोन लाख रुपये मिळणार म्हणून, अर्ज करणाऱ्यांची गर्दी वाढू लागल्याने, त्याची खात्री करण्यासाठी पोस्ट अधिकारी, शासकीय अधिकारी, कार्यालये यांच्याशी संपर्क साधला असता, या योजनेबाबत कोणताही आदेश नाही व माहिती नसल्याचे सांगितले गेले. त्या अर्जावर खाली नमूद असलेल्या बेबसाईटवर पाहिले असता, योजनाच नसल्याचे दिसून आले. 

ग्रामस्थांनी सत्यता जाणावीमहिला व बालविकास मंत्रालयाचे अप्पर सचिव श्रीवास्तव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, ही योजना नसल्याचे सांगितले. काहीजण पैशाच्या लोभापोटी एजंटामार्फत अशा योजना पसरवत असून, अशा योजनांबाबत ग्रामस्थांनी सत्यता जाणून घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीgovernment schemeसरकारी योजनाfraudधोकेबाजी