शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

कवठेएकंदला कायद्याच्या चौकटीतच आतषबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:01 IST

कवठेएकंद : यात्रेचा उत्सव लोकांच्या भावना आणि श्रध्देसाठी आहे. लोकांना सोबत घेऊनच उत्सव साजरा करताना, काहीबाबतीत भावनांना मुरड घालावी. ...

कवठेएकंद : यात्रेचा उत्सव लोकांच्या भावना आणि श्रध्देसाठी आहे. लोकांना सोबत घेऊनच उत्सव साजरा करताना, काहीबाबतीत भावनांना मुरड घालावी. शासनाचे नियम लोककल्याणासाठीच आहेत. तरी नियमांच्या चाकोरीतच यात्रा व्हावी, यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी कवठेएकंद येथे दसरा बैठकीत बोलताना केले.कवठेएकंद येथे विजयादशमीला ग्रामदैवत श्री बिºहाडसिध्द देवस्थानचा पालखी सोहळा व त्यानिमित्ताने होणाऱ्या आतषबाजीसाठीची नियोजन बैठक प्रशासनाच्यावतीने सिद्धराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक बनकर, तहसीलदार दीपक वजाळे, पोलीस निरीक्षक अजय शिंदकर, सरपंच राजश्री पावसे आदी मान्यवर उपस्थित होते.डॉ. खरात म्हणाले की, आतषबाजी करताना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी प्रत्येक ग्रामस्थाने घ्यावी. रितसर परवाने घेऊनच आतषबाजी करा. लाकडी शिंगटे सादरीकरण एकाचठिकाणी गतवर्षीप्रमाणे करावे. धोकादायक प्रकार वगळून दारूकाम करून लोकांनी सहकार्य करावे. प्रशासन आपल्याबरोबर असेलच. उपाययोजना, बंधने ही आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत. नियमात राहून उत्सव साजरा केला जावा. उल्लंघन करणाºयांवर कारवाई होईल, असेही ते म्हणाले. सर्वच विभागांच्या अधिकाºयांना, कामात कसूर करू नका, अशा सूचनाही त्यांनी केल्या. नियमानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी करा, असे सांगून, सामाजिक भान ठेवून यात्रा अधिक चांगल्याप्रकारे करण्यासाठी ग्रामस्थ, यात्रा कमिटी, भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.तहसीलदार दीपक वजाळे, पोलीस अधिकारी अशोक बनकर, मनोज पाटील, रामचंद्र थोरात, देवस्थान ट्रस्टचे सदस्य, यात्रा कमिटी, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्तीचे अध्यक्ष, सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.दसºयाच्या पार्श्वभूमीवर लाकडी शिंगटे पोखरणे, दारूकाम कच्चे साहित्य जमवणे, अशा पूर्वतयारीला गती मिळाली आहे.दसरा कामाला गती...प्रशासनाच्या नेमक्या भूमिकेनंतर ठिकठिकाणच्या दारूशोभा मंडळांच्या प्राथमिक कामाला सुरुवात झाली. प्रशासनाच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चा होती. परंतु शासनाने कडक धोरण न स्वीकारता ‘गोड औषधी भूमिका’ घेऊन ग्रामस्थ व शासन असा एकत्रितपणे आतषबाजीचा उत्सव सुरक्षित, शांततेत पार पाडण्यात सहकार्य करा, असे आवाहन करून नागरिकांनीच शासनाचे काम करावे, अशी भूमिका मांडली.