शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

निर्यातीची किटली थंड; दरवाढीने चहा वाफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST

अविनाश कोळी लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : वाफाळलेल्या गरमागरम चहाचा आस्वाद घेण्याची परंपरा अबाधित असल्याने जगभरात चहाचा बाजार स्थिर ...

अविनाश कोळी

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : वाफाळलेल्या गरमागरम चहाचा आस्वाद घेण्याची परंपरा अबाधित असल्याने जगभरात चहाचा बाजार स्थिर आहे. गतवर्षाच्या तुलनेत यंदा ५ टक्के निर्यात घटल्यानंतरही दराच्या तेजीमुळे भारतीय निर्यातदारांना १२ टक्के अधिक लाभ झाला. दुसरीकडे भारतातील चहाचा खप कडक लॉकडाऊन असतानाही कायम राहिला आहे.

देशातील चहा उत्पादनात यावेळी वाढ झाली आहे. द युनायटेड प्लँटर्स असोसिएशन ऑफ सदर्न इंडिया (उपासी) ने दिलेल्या अहवालानुसार जानेवारी ते मे २०२० मध्ये भारतातील चहा उत्पादन २१० मिलियन किलो इतके झाले होते. यावर्षी याच काळात २७५ मिलियन किलो उत्पादन झाले आहे. म्हणजेच ३० टक्के उत्पादन वाढ दिसत आहे. दुसरीकडे कोरोनामुळे निर्यातीवर थोडा परिणाम जाणवत आहे.

टी बोर्ड ऑफ इंडियाने दिलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल २०२० च्या तुलनेत यंदा याच चौमाहीत भारतीय चहाची निर्यात ५.१७ टक्क्यांनी घटली आहे, मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात चहाच्या दरात तेजी असल्याने १२ टक्क्यांनी उत्पन्न वाढले आहे. निर्यातीमधून भारतास जानेवारी ते एप्रिल या काळात १ हजार ४८० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. २०२० मध्ये या काळात चहाचा दर २१४.९१ रुपये किलो होता. यंदा तो २५५ च्या घरात आहे. दरात जवळपास १८.८१ टक्के वाढ झाली आहे.

चौकट

‘ग्रीन टी’चा कप गरमच

देशात, विदेशात ‘ग्रीन टी’ची मागणी गतवर्षाच्या कोरोना काळात वाढली होती. यावर्षीही ती कायम आहे. अन्य चहाप्रमाणे याचीही निर्यात कमी झाली असली, तरी दरात ९.७० टक्के वाढ झाली आहे. ‘ग्रीन टी’चे देशांतर्गत वार्षिक उत्पादन २० ते २५ मिलियन किलो इतके असते. मागील जानेवारीच्या तुलनेत जानेवारी २०२१ मध्ये ग्रीन टीचे उत्पादन किंचीतसे घटले होते, मात्र फेब्रुवारी व मार्च महिन्यात तुलनेत उत्पादनात वाढ झाली आहे.

कोट

लॉकडाऊन असला तरी देशातील चहाचा वापर कमी झालेला नाही. मागणीत वाढ होत आहे. ब्रँडेड व विशेषत: पॉलिपॅकमधील चहाला अधिक मागणी आहे. ‘ग्रीन टी’ला कोरोना काळात वाढलेली पसंतीही टिकून आहे.

- राजेशभाई शहा, चहा उद्योजक, सांगली