शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

वाळवा-शिराळ्यामध्ये काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात नेत्यांचीही वानवा : पदाधिकारीही केवळ नावापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:05 IST

वाळवा-शिराळ्यात काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस कमीच होत चालली आहे. गेल्या १0 वर्षांची अवस्था पाहता, कार्यकर्ते तर सोडाच, पण नेत्यांचीही वानवा आहे. जे हाताच्या

ठळक मुद्देसर्वसामान्य कार्यकर्त्यांची फरफट

अशोक पाटील ।इस्लामपूर : वाळवा-शिराळ्यात काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस कमीच होत चालली आहे. गेल्या १0 वर्षांची अवस्था पाहता, कार्यकर्ते तर सोडाच, पण नेत्यांचीही वानवा आहे. जे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नेते आहेत, तेही फक्त पदापुरतेच आहेत. हातकणंगलेच्या मैदानात राजू शेट्टी, धैर्यशील माने यांची एन्ट्री झाली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेही तयारीत होते, त्यामुळे तेही चर्चेत आहेत. यामध्ये काँग्रेस कुठे दिसत नाही.

इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ताकद अबाधित आहे. त्यांनी काँग्रेसला कधीच उर्जितावस्था येऊ दिली नाही. उलट त्यांचा वापरच करुन घेतला आहे. आता तर काँग्रेस—राष्ट्रवादी व इतर मित्रपक्षांची आघाडी झाल्याने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र पाटील, जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस प्रभारी अध्यक्षा अ‍ॅड. मनीषा रोटे, माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील केवळ पदापुरतेच आहेत. काँग्रेसने जाहीर केलेली आंदोलने करण्यापुरतेच हे चेहरे रस्त्यावर दिसतात. आघाडी झाल्यामुळे या सर्व काँग्रेसजनांना स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी आणि आ. जयंत पाटील यांचा प्रचार करावा लागणार आहे.

वाळव्यापेक्षा जरा बरी स्थिती शिराळा मतदारसंघाची आहे. येथे विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला आहे. परंतु दोन्ही काँग्रेसच्या राज्य पातळीवरील निर्णयामुळे या मतदार संघात काँग्रेसला कधीच उभारी मिळालेली नाही. आता तर भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक आणि महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांच्या एन्ट्रीने मतांची आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात विभागणी होणार आहे. यामुळे याही मतदार संघात काँग्रेसची ताकद कमीच होण्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली