शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
3
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
4
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
5
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
6
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
7
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
8
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
9
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
10
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
11
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
12
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
13
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
14
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
15
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
16
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
17
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
18
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
19
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
20
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी

वाळवा-शिराळ्यामध्ये काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात नेत्यांचीही वानवा : पदाधिकारीही केवळ नावापुरतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 00:05 IST

वाळवा-शिराळ्यात काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस कमीच होत चालली आहे. गेल्या १0 वर्षांची अवस्था पाहता, कार्यकर्ते तर सोडाच, पण नेत्यांचीही वानवा आहे. जे हाताच्या

ठळक मुद्देसर्वसामान्य कार्यकर्त्यांची फरफट

अशोक पाटील ।इस्लामपूर : वाळवा-शिराळ्यात काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस कमीच होत चालली आहे. गेल्या १0 वर्षांची अवस्था पाहता, कार्यकर्ते तर सोडाच, पण नेत्यांचीही वानवा आहे. जे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नेते आहेत, तेही फक्त पदापुरतेच आहेत. हातकणंगलेच्या मैदानात राजू शेट्टी, धैर्यशील माने यांची एन्ट्री झाली आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हेही तयारीत होते, त्यामुळे तेही चर्चेत आहेत. यामध्ये काँग्रेस कुठे दिसत नाही.

इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ताकद अबाधित आहे. त्यांनी काँग्रेसला कधीच उर्जितावस्था येऊ दिली नाही. उलट त्यांचा वापरच करुन घेतला आहे. आता तर काँग्रेस—राष्ट्रवादी व इतर मित्रपक्षांची आघाडी झाल्याने काँग्रेसचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे सदस्य जितेंद्र पाटील, जिल्हा ग्रामीण महिला काँग्रेस प्रभारी अध्यक्षा अ‍ॅड. मनीषा रोटे, माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील केवळ पदापुरतेच आहेत. काँग्रेसने जाहीर केलेली आंदोलने करण्यापुरतेच हे चेहरे रस्त्यावर दिसतात. आघाडी झाल्यामुळे या सर्व काँग्रेसजनांना स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी आणि आ. जयंत पाटील यांचा प्रचार करावा लागणार आहे.

वाळव्यापेक्षा जरा बरी स्थिती शिराळा मतदारसंघाची आहे. येथे विधानपरिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, त्यांचे पुत्र सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसचा झेंडा फडकवत ठेवला आहे. परंतु दोन्ही काँग्रेसच्या राज्य पातळीवरील निर्णयामुळे या मतदार संघात काँग्रेसला कधीच उभारी मिळालेली नाही. आता तर भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक, राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक आणि महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांच्या एन्ट्रीने मतांची आणि कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात विभागणी होणार आहे. यामुळे याही मतदार संघात काँग्रेसची ताकद कमीच होण्याचे संकेत मिळत आहेत.

टॅग्स :PoliticsराजकारणSangliसांगली