शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
4
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
5
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
6
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
7
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
8
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
9
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
10
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
11
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
12
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
13
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
14
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
15
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
16
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
17
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
18
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
19
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!

वाईट बोलण्याने हृदयावर ताण पडत असल्याने प्रत्येकाने गोड बोलत रहावे : रविकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:47 IST

खूप चांगली परंपरा आपल्याला लाभली आहे. संक्रांतीच्या माध्यमातून जो संदेश आपण एकमेकांना देतो, तो खूपच आरोग्यदायी आहे. वाईट बोलण्याने हृदयावर ताण पडत असल्याने प्रत्येकाने गोड बोलत रहावे, असे मत

ठळक मुद्देकटुतेमुळे घातक हार्मोन्स कार्यरत होतात

सांगली : खूप चांगली परंपरा आपल्याला लाभली आहे. संक्रांतीच्या माध्यमातून जो संदेश आपण एकमेकांना देतो, तो खूपच आरोग्यदायी आहे. वाईट बोलण्याने हृदयावर ताण पडत असल्याने प्रत्येकाने गोड बोलत रहावे, असे मत मिरजेतील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रविकांत पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

ते म्हणाले की, कटू बोलण्याने कटुता वाढत जाते. एकमेकांशी विसंवाद झाला तर मने दुखावली जातात. दुखावलेल्या मनांमुळे पुन्हा नकारात्मक मानसिकता वाढीस लागते. वैद्यकीयदृष्टीने आपण याची समीक्षा केली तर वाईट बोलण्याचा परिणाम हा शरीरावर वाईटच होत असल्याचे सिद्ध झाले आहे. जेव्हा आपण एखाद्याला वाईट बोलतो, रागावतो, तेव्हा त्याचे परिणाम आपल्या मनावरही होत असतात. अशा वाईट गोष्टींमुळे शरीरातील वाईट हार्मोन्स कार्यरत होतात. चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे हार्मोन्स प्रत्येकाच्या शरीरात असतात. जेव्हा आपण चांगले बोलतो तेव्हा चांगले हार्मोन्स कार्यरत होऊन हृदयावरचा ताण कमी होतो आणि माणसाला आनंदी वाटत असते. अशी व्यक्ती हृदयरोगापासून स्वत:ला दूर ठेवू शकते.

एखादी व्यक्ती रागाच्या भरात दुसऱ्या व्यक्तीला काही कटू बोलते तेव्हा वाईट हार्मोन्सचा दुष्परिणाम सुरू होतो. हृदयाकडे जाणाºया वाहिन्यांवर ताण येतो आणि हृदयाच्या आजारांना आपण निमंत्रण देण्यास सुरुवात करतो. वास्तविक एका छोट्याशा चुकीच्या कृतीतून आपल्या शरीरावर इतके मोठे दुष्परिणाम होत असतात, याची कल्पना कदाचित अनेकांना नसते. त्यामुळे ते या गोष्टींचे भान ठेवत नाहीत.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात गोड बोलत राहण्याची सवय अंगीकारली पाहिजे. चांगले शरीर, चांगले हृदय, चांगले आरोग्य आपल्याला हवे असेल तर गोड बोलावेच लागेल. कितीही कटू प्रसंग आले तरी रागावर नियंत्रण ठेवायला हवे. हे नियंत्रण तुमच्या फायद्याचेच ठरणार आहे. याउलट कसल्याही प्रकारचा राग हा शरीरासाठी घातकच ठरू शकतो.सकारात्मक समाज आणि आरोग्यदायी समाजाची निर्मिती करताना आपण सर्वांनी त्याला गोड बोलून, सुसंवाद साधून हातभार लावायला हवा. यामाध्यमातून आपण समाजाचीही सेवा करू शकतो.‘लोकमत’ने सुरू केलेले हे अभियान अत्यंत चांगले आहे. पुरातन काळापासून जो गोड बोलण्याचा संदेश दिला जात आहे, तो आरोग्यदृष्ट्या प्रत्येकाला व समाजालाही तितकाच लाभदायी आहे. याचा स्वीकार केवळ एका दिवसापुरता नव्हे, तर आयुष्यभर करायला हवा, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :Sangliसांगली