शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
3
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
4
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
5
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
6
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
7
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
8
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
9
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
10
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
11
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
12
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
13
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
14
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
15
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
16
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
17
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
18
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
19
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
20
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...

सांगली जिल्ह्यात ४० आयटी कंपन्या, देश-विदेशात सॉफ्टवेअरची निर्यात

By संतोष भिसे | Updated: December 30, 2024 12:46 IST

टीसीएस, इन्फोसिस सुविधाअंभावी थबकल्या

संतोष भिसेसांगली : सांगलीत आयटी पार्कचा विचार सुरू होण्यापूर्वीच अनेक व्यावसायिकांनी स्वत:पुरते स्वतंत्र व्यवसाय सुरू केले होते. आजमितीला सांगली, मिरजेत ४० हून अधिक आयटी व्यवसाय पाय रोवून आहेत. देशांतर्गत कंपन्यांसोबतच विदेशातही सॉफ्टवेअरची निर्यात करत आहेत.केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार कोल्हापुरातून झालेली निर्यातही लक्षवेधी आहे. तेथील सॉफ्टवेअर व्यावसायिकांनी २०१९-२० मध्ये १२८ कोटी रुपयांची निर्यात केली होती. ती २०२३-२४ मध्ये ५० टक्क्यांनी वाढून १८९ कोटी रुपयांवर पोहोचली.सध्या कोल्हापूर व परिसरात ३५० आयटी कंपन्या कार्यरत आहेत, त्या तुलनेत सांगलीत या व्यवसायाचा विस्तार खूपच छोटा आहे. तो वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. सांगली जिल्ह्यातील ४० हून अधिक आयटी कंपन्यांनी सांगली-मिरज आयटी असोसिएशनच्या स्थापना केली आहे. पण, संघटना म्हणून या क्षेत्राच्या विकासासाठी फारच कमी काम होते. प्रत्येक व्यावसायिक स्वबळावर व्यवसायाचा विस्तार करत आहे. सॉफ्टवेअर निर्यात करत आहे.

सांगलीचे टॅलेंट कॅनडा, ऑस्ट्रियालासांगलीतील आयटी कंपन्यांमधून कॅनडा, ऑस्ट्रिया, नेदरलॅंड, आफ्रिका, फ्रान्स आदी देशांत साॅफ्टवेअरची निर्यात केली जाते. स्वत:ची बुद्धिमत्ता आणि क्षमता दाखवत या कंपन्यांनी तेथील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. या साखळीतून आणखी काही कंपन्या सांगलीतून सॉफ्टवेअर घेण्यास उत्सुक आहेत.

टीसीएस, इन्फोसिस सुविधाअंभावी थबकल्यासांगलीतून आयटी सेक्टरचे शिक्षण घेऊन नोकरीसाठी पुण्या-मुंबईची वाट धरणाऱ्या तरुणांना सांगलीतच थांबवायला हवे. हे ब्रेन ड्रेन रोखायला हवे. त्यासाठी एखादी मदर इंडस्ट्री स्वरूपाची आयटी कंपनी येथे येणे आवश्यक आहे. यासंदर्भात सांगली-मिरज आयटी असोसिएशनने इन्फोसिस, टीसीएस अशा काही दिग्गज कंपन्यांशी संपर्क केला होता. पण सांगलीत पायाभूत सुविधा नसल्याने त्या थबकल्या.

वर्षाला दीड हजारांवर पदवीधरसांगली जिल्ह्यात १७ हून अधिक महाविद्यालयांत आयटीविषयक अभ्यासक्रम शिकविले जातात. त्यातून वर्षाला दीड हजारांवर पदवीधर बाहेर पडतात. यापैकी बहुतांशी तरुण मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरु, चेन्नई आदी शहरांची वाट धरतात. त्यामुळे जिल्ह्यात बुद्धिमान विद्यार्थ्यांची कमी नाही हे स्पष्ट होते. हे तरुण सांगलीतच थांबल्यास जिल्ह्याचा जीडीपी वाढण्यास हातभार लावतील हे निश्चित.

टॅग्स :SangliसांगलीITमाहिती तंत्रज्ञान