शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

सांगली जिल्ह्यात ४० आयटी कंपन्या, देश-विदेशात सॉफ्टवेअरची निर्यात

By संतोष भिसे | Updated: December 30, 2024 12:46 IST

टीसीएस, इन्फोसिस सुविधाअंभावी थबकल्या

संतोष भिसेसांगली : सांगलीत आयटी पार्कचा विचार सुरू होण्यापूर्वीच अनेक व्यावसायिकांनी स्वत:पुरते स्वतंत्र व्यवसाय सुरू केले होते. आजमितीला सांगली, मिरजेत ४० हून अधिक आयटी व्यवसाय पाय रोवून आहेत. देशांतर्गत कंपन्यांसोबतच विदेशातही सॉफ्टवेअरची निर्यात करत आहेत.केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार कोल्हापुरातून झालेली निर्यातही लक्षवेधी आहे. तेथील सॉफ्टवेअर व्यावसायिकांनी २०१९-२० मध्ये १२८ कोटी रुपयांची निर्यात केली होती. ती २०२३-२४ मध्ये ५० टक्क्यांनी वाढून १८९ कोटी रुपयांवर पोहोचली.सध्या कोल्हापूर व परिसरात ३५० आयटी कंपन्या कार्यरत आहेत, त्या तुलनेत सांगलीत या व्यवसायाचा विस्तार खूपच छोटा आहे. तो वाढविण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. सांगली जिल्ह्यातील ४० हून अधिक आयटी कंपन्यांनी सांगली-मिरज आयटी असोसिएशनच्या स्थापना केली आहे. पण, संघटना म्हणून या क्षेत्राच्या विकासासाठी फारच कमी काम होते. प्रत्येक व्यावसायिक स्वबळावर व्यवसायाचा विस्तार करत आहे. सॉफ्टवेअर निर्यात करत आहे.

सांगलीचे टॅलेंट कॅनडा, ऑस्ट्रियालासांगलीतील आयटी कंपन्यांमधून कॅनडा, ऑस्ट्रिया, नेदरलॅंड, आफ्रिका, फ्रान्स आदी देशांत साॅफ्टवेअरची निर्यात केली जाते. स्वत:ची बुद्धिमत्ता आणि क्षमता दाखवत या कंपन्यांनी तेथील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. या साखळीतून आणखी काही कंपन्या सांगलीतून सॉफ्टवेअर घेण्यास उत्सुक आहेत.

टीसीएस, इन्फोसिस सुविधाअंभावी थबकल्यासांगलीतून आयटी सेक्टरचे शिक्षण घेऊन नोकरीसाठी पुण्या-मुंबईची वाट धरणाऱ्या तरुणांना सांगलीतच थांबवायला हवे. हे ब्रेन ड्रेन रोखायला हवे. त्यासाठी एखादी मदर इंडस्ट्री स्वरूपाची आयटी कंपनी येथे येणे आवश्यक आहे. यासंदर्भात सांगली-मिरज आयटी असोसिएशनने इन्फोसिस, टीसीएस अशा काही दिग्गज कंपन्यांशी संपर्क केला होता. पण सांगलीत पायाभूत सुविधा नसल्याने त्या थबकल्या.

वर्षाला दीड हजारांवर पदवीधरसांगली जिल्ह्यात १७ हून अधिक महाविद्यालयांत आयटीविषयक अभ्यासक्रम शिकविले जातात. त्यातून वर्षाला दीड हजारांवर पदवीधर बाहेर पडतात. यापैकी बहुतांशी तरुण मुंबई, पुणे, हैदराबाद, बेंगळुरु, चेन्नई आदी शहरांची वाट धरतात. त्यामुळे जिल्ह्यात बुद्धिमान विद्यार्थ्यांची कमी नाही हे स्पष्ट होते. हे तरुण सांगलीतच थांबल्यास जिल्ह्याचा जीडीपी वाढण्यास हातभार लावतील हे निश्चित.

टॅग्स :SangliसांगलीITमाहिती तंत्रज्ञान