शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू तरीही जिल्ह्यात एसटीच्या २३०० फेऱ्या रद्दच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:31 IST

राज्य शासनाने नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवी असे वर्ग सुरू केले आहेत. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांची वर्गातील ...

राज्य शासनाने नववी ते बारावी आणि आता पाचवी ते आठवी असे वर्ग सुरू केले आहेत. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती जवळपास ७२ टक्केपर्यंत आहे. शहरातच ५२ टक्क्यांपर्यंत विद्यार्थ्यांची उपस्थिती असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाण्यासाठी एसटीचा एकमेव आधार आहे; पण सध्या कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतरही जिल्ह्यातील बसच्या दोन हजार ३०० फेऱ्या बंदच आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.

चौकट

तीन गावांकडे एसटी फिरकलीच नाही

आटपाडी तालुक्यातील लेंगरेवाडी, माळेवाडी, हितवड या गावांमध्ये कोरोनापूर्वी एसटी येत होती. त्यामुळे या गावातील विद्यार्थ्यांना आटपाडी, करगणी येथे शाळा, कॉलेजमध्ये शिक्षणासाठी जाण्याची सोय होती; परंतु सध्या येथे येणारी एसटी बंद झाल्यामुळे येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी बस सुरू करण्याची एसटी प्रशासनाकडे मागणी केली आहे.

चौकट

शाळा सुरू संख्या : १४८३

चौकट

पहिली ते आठवी : १२१५२०

नववी ते बारावी : १५५४२१

कोट

कोरोनापूर्वी ५ हजार ५०० बसच्या फेऱ्या होत होत्या. त्यापैकी सध्या ३ हजार २०० फेऱ्या सुरू झाल्या आहेत. २ हजार ३०० फेऱ्या होत नाहीत. मुंबईला गेलेल्या ५० बस आल्यानंतर सर्व मार्गावर बस सोडण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील बहुतांशी मार्गावरील बसची वाहतूक सुरू असल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर केली आहे.

-आलम देसाई, प्रभारी विभागीय वाहतूक अधिकारी.

कोट

मी कॉलेजला तासगावला जातो. पूर्वी कॉलेजच्या वेळेत तीन ते चार बस होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत नव्हती; पण सध्या एक बस असूनही तीही कॉलेजच्या वेळेत नसल्यामुळे दोन तास लवकर जावे लागते. माझ्याप्रमाणे अन्य विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत आहे.

-प्रमोद पाटील, विद्यार्थी.

चौकट

कोरोनात ४४ बसच्या झाल्या मालगाड्या

कोरोनापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये एसटीकडे ९०४ बस होत्या. त्यापैकी कोरोनात बस वाहतूक थांबल्यामुळे ४४ बसच्या माल वाहतूक गाड्या तयार केल्या आहेत. तसेच १०० कालबाह्य बस स्क्रॅप केल्या आहेत. सध्या मुंबईची लोकल बंद असल्यामुळे ५० बस आणि शंभर चालक, शंभर वाहक आजही मुंबईकरांच्या सेवेसाठी आहेत. यामुळे सध्या जिल्ह्यातील दहा आगारांकडे केवळ ७१० बस कार्यरत आहेत. बसची संख्या कमी असल्यामुळे दोन हजार ३०० फेऱ्या एसटी प्रशासनास रद्द कराव्या लागत आहेत.