शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

इथेनॉल बंदीचा कारखानदारांनी बाऊ करू नये, शरद जोशी संघटनेची मागणी 

By अशोक डोंबाळे | Updated: December 11, 2023 18:50 IST

राज्यात उसाला गुजरातप्रमाणे दर द्या

सांगली : इथेनॉल खरेदीचे दर फार जास्त आहेत. त्याचा बाऊ करत आंदोलन करू नये. इथेनॉल निर्मिती मर्यादेने व साखर उत्पादनाने कारखान्यांचे फार नुकसान होणार नाही. इथेनॉलबाबतच्या आदेशाचे भांडवल करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन शेतकरी संघटना सहकार आघाडी प्रमुख संजय कोले यांनी केले. दरम्यान, इथेनॉल उत्पादन कमी केल्याने सरकारने कारखानदारांना आर्थिक दिलासा देण्याची मागणीही त्यांनी केली.संजय कोले म्हणाले, भारतात सर्वाधिक २७० लाख टन साखरेचा वापर होत आहे. म्हणजे साखरेचा भारत हाच मोठा ग्राहक आहे. त्यामुळे साखर निर्यात व इथेनॉल, अल्कोहोल, स्पिरीट उत्पादनास मर्यादा येतात. अतिवृष्टीमुळे उत्तर प्रदेश, तर दुष्काळी स्थितीमुळे महाराष्ट्र, कर्नाटक राज्यात ऊस व साखर उत्पादन घटणार असल्याची भीती सरकारला आहे. त्यामुळेच केंद्र सरकारने देशातील साखर उत्पादन, विक्री व साठा लक्षात घेता उसाचा रस, सिरपपासून इथेनॉल उत्पादनावर बंदी घातली आहे. मात्र, बी-हेवी मोलासिसपासून बनणाऱ्या इथेनॉल निर्मितीसाठी बंदी घातलेली नाही. अतिरिक्त साखर इथेनॉलकडे वळवून साखरेचे दर घसरू न देणे. उसाचे पैसे देताना कारखान्यांना अडचणी येऊ नयेत असे हे धोरण आहे. साखरेचे दर घसरू लागल्यास इथेनॉल उत्पादन वाढवून साखर उत्पादन कमी करणे. साखरेचे दर अव्वाच्या सव्वा वाढू लागल्यास साखर उत्पादनावर भर देणे, अशी ब्राझीलसारखी लवचिकता ठेवण्याचे धोरण कारखानदारांनाही माहीत आहे. मात्र, ते याबाबत बोलत नाहीत. कारखानदार केवळ राजकीय डाव टाकत पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.राज्यात उसाला गुजरातप्रमाणे दर द्याचार वर्षांपूर्वी साखर दर कोसळल्यावर सलग दोन वर्षे उसाची बिले देण्यासाठी सरकारने प्रति क्विंटल निर्यात साखरेला एक हजार १०० व ६०० रुपये मदत केली होती. आजचे संकटही तसेच निसर्गाने तयार केले आहे. सरकारने इथेनॉल प्रकल्पासाठी आर्थिक मदत द्यावी. तसेच, राज्यातील कारखान्यांनी गुजरातच्या कारखान्याप्रमाणे ऊस दर द्यावा, अशी मागणीही कोले यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखाने