शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना

By अविनाश कोळी | Updated: October 7, 2024 05:13 IST

दिल्लीतील ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली.

अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : साहित्य हे अभिजनांपुरते सीमित आहे की काय, असे वाटत असतानाच संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या वाटेने जाणाऱ्या माझ्यासारख्या महिलेची निवड झाली. लोकसंस्कृतीवरचा अडाणीपणाचा शिक्का या माध्यमातून पुसला गेला, याचा आनंद वाटतो, अशी भावना लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली. 

त्या म्हणाल्या, आदिमावस्थेपासून आधुनिक काळापर्यंतचा मानवी जीवनाचा प्रवास लोकपरंपरेतच प्रतिबिंबित झाला आहे. मराठी साहित्य संमेलनाने माझ्या निवडीतून जात्यावर दळण दळणाऱ्या भगिनी ते विविध लोककलावंतांचा सन्मान केला आहे. जन्मभूमी पुणे व कर्मभूमी सांगलीचे माझ्या जडणघडणीत योगदान आहे. नाशिकमध्ये अभ्यासाची रुजवण झाली. 

कुसुमाग्रजांसारखे पाठराखण करणारे दिग्गज साहित्यिक लाभले. सांगलीत विष्णुदास भावेंच्या नाटकांचा अभ्यास करताना कर्नाटक व त्यानंतर कोकण, गोवा, तामिळनाडू असा प्रवास सांगताना त्या म्हणाल्या, 'हम चलते रहे, और कारवाँ बनता गया...'

सहाव्या महिला अध्यक्ष

दिल्लीतील ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली. त्या संमेलनाच्या सहाव्या महिला अध्यक्ष ठरल्या. याआधी, कुसुमावती देशपांडे (ग्वाल्हेर, १९६१), दुर्गा भागवत (कन्हाड, १९७५), शांता शेळके (आळंदी, १९९६), विजया राजाध्यक्ष (इंदूर, २००१) व अरुणा ढेरे (यवतमाळ, २०१९) यांना हा मान मिळाला आहे.

अगदीच तिन्हीसांजेला नको 

आयुष्याच्या सायंकाळी हा सन्मान मिळला असे वाटते का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, उमेदीच्या काळात साहित्यिकांना मान मिळायला हवा. आयुष्याच्या सायंकाळीही चालेल; पण अगदीच तिन्हीसांजेला नको.

पूर्वी संस्कृतला, आज इंग्रजीला महत्त्व : पूर्वी संस्कृतला मोठेपणा मिळत होता. ज्ञानेश्वर, एकनाथांनी प्राकृत भाषेला महत्त्व मिळवून दिले. आता इंग्रजी सर्वश्रेष्ठ भाषा मानली जाते. मात्र, प्राकृतची अस्मिता जपायला हवी. ती जोपर्यंत जपली जाईल, तोपर्यंत लोकसाहित्य अन् भाषाही टिकेल. 

टॅग्स :Sangliसांगली