शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लोकसंस्कृतीवरील अडाणीपणाचा शिक्का पुसला; तारा भवाळकर यांनी व्यक्त केली भावना

By अविनाश कोळी | Updated: October 7, 2024 05:13 IST

दिल्लीतील ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली.

अविनाश कोळी, लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : साहित्य हे अभिजनांपुरते सीमित आहे की काय, असे वाटत असतानाच संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसाहित्याच्या वाटेने जाणाऱ्या माझ्यासारख्या महिलेची निवड झाली. लोकसंस्कृतीवरचा अडाणीपणाचा शिक्का या माध्यमातून पुसला गेला, याचा आनंद वाटतो, अशी भावना लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केली. 

त्या म्हणाल्या, आदिमावस्थेपासून आधुनिक काळापर्यंतचा मानवी जीवनाचा प्रवास लोकपरंपरेतच प्रतिबिंबित झाला आहे. मराठी साहित्य संमेलनाने माझ्या निवडीतून जात्यावर दळण दळणाऱ्या भगिनी ते विविध लोककलावंतांचा सन्मान केला आहे. जन्मभूमी पुणे व कर्मभूमी सांगलीचे माझ्या जडणघडणीत योगदान आहे. नाशिकमध्ये अभ्यासाची रुजवण झाली. 

कुसुमाग्रजांसारखे पाठराखण करणारे दिग्गज साहित्यिक लाभले. सांगलीत विष्णुदास भावेंच्या नाटकांचा अभ्यास करताना कर्नाटक व त्यानंतर कोकण, गोवा, तामिळनाडू असा प्रवास सांगताना त्या म्हणाल्या, 'हम चलते रहे, और कारवाँ बनता गया...'

सहाव्या महिला अध्यक्ष

दिल्लीतील ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लोकसंस्कृती, संत साहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड झाली. त्या संमेलनाच्या सहाव्या महिला अध्यक्ष ठरल्या. याआधी, कुसुमावती देशपांडे (ग्वाल्हेर, १९६१), दुर्गा भागवत (कन्हाड, १९७५), शांता शेळके (आळंदी, १९९६), विजया राजाध्यक्ष (इंदूर, २००१) व अरुणा ढेरे (यवतमाळ, २०१९) यांना हा मान मिळाला आहे.

अगदीच तिन्हीसांजेला नको 

आयुष्याच्या सायंकाळी हा सन्मान मिळला असे वाटते का, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, उमेदीच्या काळात साहित्यिकांना मान मिळायला हवा. आयुष्याच्या सायंकाळीही चालेल; पण अगदीच तिन्हीसांजेला नको.

पूर्वी संस्कृतला, आज इंग्रजीला महत्त्व : पूर्वी संस्कृतला मोठेपणा मिळत होता. ज्ञानेश्वर, एकनाथांनी प्राकृत भाषेला महत्त्व मिळवून दिले. आता इंग्रजी सर्वश्रेष्ठ भाषा मानली जाते. मात्र, प्राकृतची अस्मिता जपायला हवी. ती जोपर्यंत जपली जाईल, तोपर्यंत लोकसाहित्य अन् भाषाही टिकेल. 

टॅग्स :Sangliसांगली