शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक वळले आठवडा बाजारांकडे

By admin | Updated: March 17, 2015 00:07 IST

कडेगाव तालुक्यातील स्थिती : शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहतीला घरघर

रजाअली पीरजादे - शाळगाव शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहत जवळजवळ बंद अवस्थेत असल्याने उद्योजक आता आठवडा बाजारांकडे वळले असून, त्यातून चांगल्या प्रकारची कमाई होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहत सुरू झाली तेव्हा लहान-मोठे असे जवळजवळ १०० हून अधिक उद्योग सुरू झाले होते. नंतर याची संख्या वाढत जाऊन ५०० च्या घरात गेली होती. अशा परिस्थितीत शासनाच्यावतीने गारमेंट पार्क, टेक्स्टाईल पार्क सुरू करण्यात आले. हा उद्योग मोठ्याप्रमाणात भरभराटीला आला. परंतु वस्त्रोद्योगाबाबत शासनाची धरसोडवृत्ती, मजुरांचा प्रश्न, वाढती मजुरी, वाढते वीजबिल आणि अशा परिस्थितीत बॅँक आॅफ इंडियाने थकित कर्जापोटी ठोकलेले टाळे या सर्व गोष्टींमुळे येथील उद्योजक मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला. सुमारे १५०० मजूर बेकार झाले. उपासमारीची वेळ आली, साहजिकच अनेक लहान-मोठे उद्योग बंद पडले. लहान उद्योजकांवर संकट कोसळले. यातून मार्ग काढण्यासाठी उद्योजकांनी आणि बेकार मजुरांनी यावर आठवडा बाजार हे प्रभावी शस्त्र बाहेर काढले असून, त्यातून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आता हळूहळू सुटू लागला आहे. असे जरी असले तरी गेली अनेक दिवस येथील औद्योगिक वसाहतीच्या समस्या सुरू असून, याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे ही वसाहत बहरण्याऐवजी हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर दिसून येते.यासाठी नवीन सरकार, स्थानिक नेतेमंडळींनी लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान, उद्योजक व बेकार मजुरांनी आपल्या उपजीविकेसाठी आता आठवडा बाजार सुरू केला असून, त्यातून त्यांची चांगली कमाई होऊन पोटापुरते मिळू लागले आहे. त्यामुळे उद्योजकांत उद्योग सुरू करण्यापेक्षा आठवडा बाजारांवरच अधिक लक्ष केंद्रित करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.शहरातील वस्तू ग्रामीण भागात उपलब्धशहरात मॉल संस्कृती फोफावत असताना त्याच धर्तीवर परंतु वेगळ्या पध्दतीने आता आठवडा बाजार भरताना दिसतात. सर्व व्यवहार रोख असल्याने उद्योजकांनाही परवडते. रोज एक बाजार असा आठवडाभर बाजार चालतो. त्यामुळे बेकारीचा प्रश्न रहात नाही. कमी-अधिक प्रमाणात दररोज पैसे मिळत असतात. पूर्वी कडेगाव तालुक्यात केवळ कडेगाव येथे एकच आठवडा बाजार भरत असे. आता जवळजवळ गावोगावी बाजार सुरू झाले आहेत. कडेपूर, शाळगाव, नेर्ली, देवराष्ट्रे, खेराडे-वांगी, नेवरी, चिंचणी या गावातून आता बाजार भरू लागले आहेत. एक हजारपासून पाच हजारापर्यंत माल असला की बऱ्यापैकी पैसे मिळतात. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांबरोबर आता शहरीकरणामुळे मोठे व्यावसायिकही आठवडा बाजारात उतरले आहेत. त्यामुळे शहरातील वस्तू आता ग्रामीण भागात मिळू लागल्या आहेत. साहजीकच शहराकडे बाजारासाठी जाणारे लोंढे आता कमी झाल्याचे दिसू लागले आहेत.