शहरं
Join us  
Trending Stories
1
बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
4
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
5
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
6
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
7
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
8
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
9
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
10
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
11
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
12
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
13
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
14
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
15
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
17
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
18
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
19
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
20
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  

उद्योजक वळले आठवडा बाजारांकडे

By admin | Updated: March 17, 2015 00:07 IST

कडेगाव तालुक्यातील स्थिती : शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहतीला घरघर

रजाअली पीरजादे - शाळगाव शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहत जवळजवळ बंद अवस्थेत असल्याने उद्योजक आता आठवडा बाजारांकडे वळले असून, त्यातून चांगल्या प्रकारची कमाई होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहत सुरू झाली तेव्हा लहान-मोठे असे जवळजवळ १०० हून अधिक उद्योग सुरू झाले होते. नंतर याची संख्या वाढत जाऊन ५०० च्या घरात गेली होती. अशा परिस्थितीत शासनाच्यावतीने गारमेंट पार्क, टेक्स्टाईल पार्क सुरू करण्यात आले. हा उद्योग मोठ्याप्रमाणात भरभराटीला आला. परंतु वस्त्रोद्योगाबाबत शासनाची धरसोडवृत्ती, मजुरांचा प्रश्न, वाढती मजुरी, वाढते वीजबिल आणि अशा परिस्थितीत बॅँक आॅफ इंडियाने थकित कर्जापोटी ठोकलेले टाळे या सर्व गोष्टींमुळे येथील उद्योजक मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला. सुमारे १५०० मजूर बेकार झाले. उपासमारीची वेळ आली, साहजिकच अनेक लहान-मोठे उद्योग बंद पडले. लहान उद्योजकांवर संकट कोसळले. यातून मार्ग काढण्यासाठी उद्योजकांनी आणि बेकार मजुरांनी यावर आठवडा बाजार हे प्रभावी शस्त्र बाहेर काढले असून, त्यातून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आता हळूहळू सुटू लागला आहे. असे जरी असले तरी गेली अनेक दिवस येथील औद्योगिक वसाहतीच्या समस्या सुरू असून, याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे ही वसाहत बहरण्याऐवजी हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर दिसून येते.यासाठी नवीन सरकार, स्थानिक नेतेमंडळींनी लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान, उद्योजक व बेकार मजुरांनी आपल्या उपजीविकेसाठी आता आठवडा बाजार सुरू केला असून, त्यातून त्यांची चांगली कमाई होऊन पोटापुरते मिळू लागले आहे. त्यामुळे उद्योजकांत उद्योग सुरू करण्यापेक्षा आठवडा बाजारांवरच अधिक लक्ष केंद्रित करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.शहरातील वस्तू ग्रामीण भागात उपलब्धशहरात मॉल संस्कृती फोफावत असताना त्याच धर्तीवर परंतु वेगळ्या पध्दतीने आता आठवडा बाजार भरताना दिसतात. सर्व व्यवहार रोख असल्याने उद्योजकांनाही परवडते. रोज एक बाजार असा आठवडाभर बाजार चालतो. त्यामुळे बेकारीचा प्रश्न रहात नाही. कमी-अधिक प्रमाणात दररोज पैसे मिळत असतात. पूर्वी कडेगाव तालुक्यात केवळ कडेगाव येथे एकच आठवडा बाजार भरत असे. आता जवळजवळ गावोगावी बाजार सुरू झाले आहेत. कडेपूर, शाळगाव, नेर्ली, देवराष्ट्रे, खेराडे-वांगी, नेवरी, चिंचणी या गावातून आता बाजार भरू लागले आहेत. एक हजारपासून पाच हजारापर्यंत माल असला की बऱ्यापैकी पैसे मिळतात. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांबरोबर आता शहरीकरणामुळे मोठे व्यावसायिकही आठवडा बाजारात उतरले आहेत. त्यामुळे शहरातील वस्तू आता ग्रामीण भागात मिळू लागल्या आहेत. साहजीकच शहराकडे बाजारासाठी जाणारे लोंढे आता कमी झाल्याचे दिसू लागले आहेत.