शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
4
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
5
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
6
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
7
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
8
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
9
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
10
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
11
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
12
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
13
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
14
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
15
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
16
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
17
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
18
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
19
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
20
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा

उद्योजक वळले आठवडा बाजारांकडे

By admin | Updated: March 17, 2015 00:07 IST

कडेगाव तालुक्यातील स्थिती : शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहतीला घरघर

रजाअली पीरजादे - शाळगाव शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहत जवळजवळ बंद अवस्थेत असल्याने उद्योजक आता आठवडा बाजारांकडे वळले असून, त्यातून चांगल्या प्रकारची कमाई होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.शिवाजीनगर-कडेगाव औद्योगिक वसाहत सुरू झाली तेव्हा लहान-मोठे असे जवळजवळ १०० हून अधिक उद्योग सुरू झाले होते. नंतर याची संख्या वाढत जाऊन ५०० च्या घरात गेली होती. अशा परिस्थितीत शासनाच्यावतीने गारमेंट पार्क, टेक्स्टाईल पार्क सुरू करण्यात आले. हा उद्योग मोठ्याप्रमाणात भरभराटीला आला. परंतु वस्त्रोद्योगाबाबत शासनाची धरसोडवृत्ती, मजुरांचा प्रश्न, वाढती मजुरी, वाढते वीजबिल आणि अशा परिस्थितीत बॅँक आॅफ इंडियाने थकित कर्जापोटी ठोकलेले टाळे या सर्व गोष्टींमुळे येथील उद्योजक मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडला. सुमारे १५०० मजूर बेकार झाले. उपासमारीची वेळ आली, साहजिकच अनेक लहान-मोठे उद्योग बंद पडले. लहान उद्योजकांवर संकट कोसळले. यातून मार्ग काढण्यासाठी उद्योजकांनी आणि बेकार मजुरांनी यावर आठवडा बाजार हे प्रभावी शस्त्र बाहेर काढले असून, त्यातून त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न आता हळूहळू सुटू लागला आहे. असे जरी असले तरी गेली अनेक दिवस येथील औद्योगिक वसाहतीच्या समस्या सुरू असून, याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. त्यामुळे ही वसाहत बहरण्याऐवजी हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर दिसून येते.यासाठी नवीन सरकार, स्थानिक नेतेमंडळींनी लक्ष घालणे अत्यंत गरजेचे आहे. दरम्यान, उद्योजक व बेकार मजुरांनी आपल्या उपजीविकेसाठी आता आठवडा बाजार सुरू केला असून, त्यातून त्यांची चांगली कमाई होऊन पोटापुरते मिळू लागले आहे. त्यामुळे उद्योजकांत उद्योग सुरू करण्यापेक्षा आठवडा बाजारांवरच अधिक लक्ष केंद्रित करीत असल्याचे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे.शहरातील वस्तू ग्रामीण भागात उपलब्धशहरात मॉल संस्कृती फोफावत असताना त्याच धर्तीवर परंतु वेगळ्या पध्दतीने आता आठवडा बाजार भरताना दिसतात. सर्व व्यवहार रोख असल्याने उद्योजकांनाही परवडते. रोज एक बाजार असा आठवडाभर बाजार चालतो. त्यामुळे बेकारीचा प्रश्न रहात नाही. कमी-अधिक प्रमाणात दररोज पैसे मिळत असतात. पूर्वी कडेगाव तालुक्यात केवळ कडेगाव येथे एकच आठवडा बाजार भरत असे. आता जवळजवळ गावोगावी बाजार सुरू झाले आहेत. कडेपूर, शाळगाव, नेर्ली, देवराष्ट्रे, खेराडे-वांगी, नेवरी, चिंचणी या गावातून आता बाजार भरू लागले आहेत. एक हजारपासून पाच हजारापर्यंत माल असला की बऱ्यापैकी पैसे मिळतात. त्यामुळे छोट्या व्यावसायिकांबरोबर आता शहरीकरणामुळे मोठे व्यावसायिकही आठवडा बाजारात उतरले आहेत. त्यामुळे शहरातील वस्तू आता ग्रामीण भागात मिळू लागल्या आहेत. साहजीकच शहराकडे बाजारासाठी जाणारे लोंढे आता कमी झाल्याचे दिसू लागले आहेत.