शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पालकांना सजग करतेय ‘संवाद’ चळवळ-उपक्रमातून मुलांना प्रगल्भ बनविण्याचा प्रभावी उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 23:43 IST

ताणतणाव व इतर कारणांमुळे मुले व पालकांतील संवाद कमी होत आहे. होणाऱ्या संवादातही माया, प्रेम कमी, तर सूचना, अपेक्षांचा भडीमार अधिक असल्याने हा संवाद अधिक सकारात्मक होणे गरजेचे बनले आहे. यासाठीच पालकांना, मुलांना आणि शिक्षकांना सजग

ठळक मुद्देमुले, शिक्षकांचाही सहभाग। चर्चा, वाचनकट्टा

- शरद जाधव ।सांगली : ताणतणाव व इतर कारणांमुळे मुले व पालकांतील संवाद कमी होत आहे. होणाऱ्या संवादातही माया, प्रेम कमी, तर सूचना, अपेक्षांचा भडीमार अधिक असल्याने हा संवाद अधिक सकारात्मक होणे गरजेचे बनले आहे. यासाठीच पालकांना, मुलांना आणि शिक्षकांना सजग करणारा, त्यांना प्रश्नांची जाणीव करून देत अधिक प्रगल्भ बनविणारा उपक्रम सांगलीत रूजतोय, ‘संवाद’ चळवळ हे त्याचं नाव! प्रश्न अनेक, उत्तर मात्र एकच या ‘टॅगलाईन’खाली या उपक्रमाचे वर्षभर काम सुरू आहे. त्याला प्रतिसादही मोठा मिळत आहे.

मुलांची ज्ञान घेण्याची जिज्ञासा ताणून न धरता मुलांना हवे ते ज्ञान उपलब्ध करून देण्यासह इतर उद्देश मनाशी धरून येथील अर्चना मुळे यांनी ही चळवळ सुरू केली आहे. मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची कौशल्ये विकसित करणे, मुलांचा व समाजातील त्या-त्या क्षेत्रातील महान व्यक्तींचा सहवास घडवून आणणे, मुलांमधील विविध सुप्त सर्जनशिलतेची जाणीव करून देणे, यासाठी ‘संवाद’च्या माध्यमातून काम करण्यात येत आहे.

स्वत: मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या अर्चना मुळे यांना मुले, पालक आणि शिक्षकांतील नाते अधिक सुदृढ करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला व आता सांगलीसह मिरजेतील चाळीसहून अधिकजण या चळवळीत कार्यरत आहेत. ‘संवाद’च्या प्रत्येक उपक्रमाला मुले व पालकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

मुलांवरील ताण समजून घेणे, त्यांचे अभ्यासाचे तंत्र, शिकण्याची गती वाढण्यासाठी काय करता येईल, याची चर्चा या संवादात झाली. कौटुंबिक ताणतणावाचा मुलांवर होणारा परिणाम जाणून घेऊन त्यावर मात करण्याचे कौशल्य, मुलांच्या मानसिक, भावनिक आणि लैंगिक प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी व मुलांची चिडचीड, हट्टीपणा कमी करण्यासाठी पालकांची भूमिका यातून दर्शविण्यात आली.

‘संवाद’ साधून समुपदेशनाबरोबरच मुलांचा अभ्यास आणि पालक, हसरा रविवार, मुलांनी काढलेल्या चित्रांना प्रोत्साहन, उन्हाळी विज्ञान शिबिर, लहानपण देगा देवा, टी वुईथ अच्युत गोडबोले सर, प्रश्न आपले-उत्तरही आपलेच, पौगंडावस्था समजून घेताना, वाचन कट्टा, एका परिवाराची मुलाखत, तणावमुक्त दहावी असे अनेक उपक्रम वर्षभर राबविण्यात येत आहेत.या उपक्रमात मुळे यांना विजया हिरेमठ, श्वेता चितळे, मानसी गोखले, सुनंदा कदम, शाल्मली वझे, डॉ. माधवी ठाणेकर, प्रांजली माळी, अर्चना माळी यांच्यासह इतर सहकाऱ्यांची मदत होत आहे.

व्हॉटस्-अ‍ॅप ग्रुपव्दारे मार्गदर्शन‘संवाद’च्या समुपदेशन कार्यशाळेला उपस्थित पालकांचे व्हॉटस्-अ‍ॅपवर ग्रुप तयार करण्यात आले आहेत. पालकांना कोणताही प्रश्न निर्माण झाल्यास तो यावर विचारला जातो व ग्रुपवरील तज्ज्ञ त्याचे उत्तर देतात. मानसोपचारतज्ज्ञ त्याचे उत्तर देत पालकांच्या शंकेचे समाधान करतात.

वाचनकट्टा उपक्रमही प्रभावीप्रत्येक वयोगटाच्या मुलांसाठी व पालकांसाठी वाचन कट्टा उपक्रम राबविण्यात येत आहे. सांगली, मिरजेतील सात ठिकाणी दर रविवारी हा उपक्रम होतो. यात वाचनप्रेमी वाचनालयाची मोलाची मदत मिळत आहे. विद्यार्थ्यांची नकारात्मक, संकुचित मानसिकता बदलून त्यांच्यात ऊर्जा निर्माण करणारा उपक्रम प्रभावी ठरत आहे.

टॅग्स :social workerसमाजसेवकSangliसांगली