शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

अभियंता... ज्याला जग बदलायचे आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:30 IST

अभियंता बनणे काही सोपे काम नाहीये, किमान ४ वर्षे, ८ सेमिस्टर, ४० विषय, ४०० प्रॅक्टिकल्स, ४००० असाइनमेंट, ४०,००० तास ...

अभियंता बनणे काही सोपे काम नाहीये, किमान ४ वर्षे, ८ सेमिस्टर, ४० विषय, ४०० प्रॅक्टिकल्स, ४००० असाइनमेंट, ४०,००० तास त्यासाठी द्यावे लागतात. हे करणे ज्याला जमले तो व्यक्ती म्हणजे अभियंता. अभियंता म्हणजे तो ज्याला जग बदलायचे आहे. अभियंता म्हणजे तो ज्याला नवीन वस्तू बनवायला आवडतात. अभियंता म्हणजे तो ज्याला दुसऱ्याचं जीवन सहज करायला आवडते. अभियंता म्हणजे तो ज्याला निरनिराळे शोध लावायला आवडतात. अभियंता म्हणजे तो ज्याला अशक्य म्हणजे काय ते माहीत नसते. अभियंता म्हणजे तो जो एक गोष्ट करायचे वेगवेगळे मार्ग शोधून काढतो.

आज १५ सप्टेंबर राेजी अभियंता दिन साजरा केला जातो. कारण आज भारताचे पहिले अभियंता भारतरत्न सर एम. व्ही. विश्वेश्वरय्या यांची जयंती असते. त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. सर विश्वेश्वरय्या हे भारतामधील सर्वांत मोठ्या धारणांपैकी एक असलेल्या कृष्ण सागर धरणाचे आर्किटेक्ट होते. तसेच ते सिंचन आणि पूर व्यवस्थापन तज्ज्ञ होते. त्यासोबतच ते म्हैसूर संस्थानचे दिवाण होते.

आज भारतात दर वर्षी १५ लाखांहून अधिक अभियंता तयार हाेतात. अमेरिका आणि चीन या देशातील अभियंत्यांच्या संख्येची तुलना केली तर त्याहूनही भारताची आकडेवारी अधिक आहे. सिलिकॉन व्हॅली मधील १६ टक्के स्टार्टअपचे मालक भारतीय अभियंते आहेत. पण इंजिनिअरिंगची एक बाजू पूर्णपणे काळोखात ठेवली जाते ती म्हणजे बेरोजगारी. एआ आकडेवारीनुसार ७५ टक्के अभियंते हे बेरोजगार आहेत. याला कामाची कमतरता, कौशल्याचा अभाव, अयोग्य शिक्षण व्यवस्था अशी बरीच कारणे आहेत.

आपल्या इथे गलेलठ्ठ पॅकेजच्या आमिषाने मुलांना जबरदस्तीने इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यावे लावतात. परिणामी, ईच्छा नसताना अनेकांना अभियंता बनावे लागते. एवढे करून पण नंतर नाेकरी मिळत नाही. त्यामुळे दुसऱ्या क्षेत्रात राेजगार शाेधावा लागतो यामुळेच आज बऱ्याच क्षेत्रामध्ये अभियंते काम करताना दिसतात.

पण ज्यांनी कोणीपण इंजिनिअरिंग केली असेल ना त्यांना एक गोष्ट तर नक्की जाणवली असेल की इंजिनिअरिंगमध्ये आपण काही शिकलो असेल किंवा नसेल पण इंजिनिअरिंगने आपल्याला आयुष्यं जगायला शिकवलं हे नक्की. आणि अभियंता म्हणून आम्ही आयुष्यात काहीही करू शकतो हा स्वाभिमान व आत्मविश्वास या ४ वर्षांमध्ये येतो. तो कुठेच भेटत नाही. सर्व अभियंत्यांना अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.