शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

"एन्काऊंटर करा.. माणसाचा नाही, मानसिकतेचा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 18:17 IST

literature SangliNews- "एन्काऊंटर करा, माणसाचा नाही मानसिकतेचा! माणूस वाचला पाहिजे, समतेचा मार्ग टिकवण्यासाठी" यासह अनेक बहारदार काव्यांनी प्रसिद्ध कवी, लेखक, दिग्दर्शक हृदयमानव अशोक यांची मैफील सांगलीत रंगली.

ठळक मुद्दे"एन्काऊंटर करा.. माणसाचा नाही, मानसिकतेचा... श्रावस्ती बुद्धीविहारात रंगली 'काव्यमैफिल हृदयमानवाची'

सांगली : "एन्काऊंटर करा, माणसाचा नाही मानसिकतेचा! माणूस वाचला पाहिजे, समतेचा मार्ग टिकवण्यासाठी" यासह अनेक बहारदार काव्यांनी प्रसिद्ध कवी, लेखक, दिग्दर्शक हृदयमानव अशोक यांची मैफील सांगलीत रंगली.संजयनगर येथील श्रावस्ती बुद्धविहाराच्यावतीने काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. कविता बुद्ध तत्त्वज्ञानाच्या, मानवतेच्या, बाबासाहेबांच्या विचारांच्या, समतेच्या आणि माणुसकीच्या. आदी विषयांवरील बहारदार आणि माणूस जोडणाऱ्या कवितांचं यावेंळी सादरीकरण करण्यात आलं.

'एन्काऊंटर करा' या कवितेने उस्थितांची मन जिंकली. मानवतेच्या वाटेवर चालताना आपला माणूस वाचवून मानसिकता संपवण्याचे आवाहन या कवितेतून करण्यात आले."कस्टडी खोला मायबाप होआपणच डांबून ठेवलेल्याप्रकांड पंडितांचीते आक्रन्दताहेत मुक्यानेबाहेर येण्यासाठी"यासारख्या कवितेतून महापुरुषांच्या विचारांना मुक्त करून सकल मानवजातीसाठी एकत्रित आलं पाहिजे असं सांगण्यात आलं."मधलं बोटदाखवलं पाहिजेघोळक्या घोळक्यानेढेकळातल ढेकळं न कळणाऱ्यांना"या कवितेतून शेतकरी आंदोलनाला समर्थन तर विरोध करणाऱ्यांवर ताशेरे त्यांनी ओढले."राजे,तुम्हाला कॉपी करू पाहणाऱ्यावाढलेल्या दाढ्या कुरवळल्या गेल्यातकाही दिवसांपूर्वी मोसमाततुमच्या मुद्राप्रस्थ गडकिल्ल्यांवर"या शिवरायांचं समरण करून वाहवत गेलेल्या पिढीला समज देणाऱ्या कवितेतून प्रबोधन करण्यात आले.'ग्लोबल आंबेडकर', 'माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे', 'ग्रंथालयात जायचं पुस्तकांना घ्यायचं', 'तुझ्यात फक्त दम पाहिजे', 'तू फक्त तू आहेस', 'पुतळे, दहशतवादाचे टेंडर', आदी मेंदूला जाग आणणाऱ्या कविता यावेळी सादर करण्यात आल्या. अभ्यासू रसिकांनी यास भरभरुन दाद दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नामदेव कस्तुरे होते. ते म्हणाले समाजाने कलाकारांना जोपासले पाहिजे. सर्वार्थाने त्यांंच्या पाठिशी राहिले पाहिजे. समाजपरिवर्तन शक्य होईल. हृदयमानव अशोक या तरुण कवीच्या कविता म्हणजे वर्तमान समाज सामस्यांवर घाव घालण्याची व त्यातून नवी वाट दाखविण्याची क्षमता असणाऱ्या कविता आहेत.यावेळी डॉ जगन कराडे, डॉ रविंद्र श्रावस्ती, सुधीर कोलप,  दयानंद कोलप, डॉ सोनिया कस्तुरे आदी उपस्थित होते. प्रा. अशोक भटकर यांनी सूत्रसंचलन केले. चंद्रकांत नागवंशी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला तर संजीव साबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन सोनुताई कांबळे , प्रा.अशोक भटकर,अरुण कांबळे, पवन वाघमारे ,दिपक कांबळे आदींनी केले.

टॅग्स :literatureसाहित्यSangliसांगली