शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

‘कृष्णा’च्या राजकारणात कामगारांची होरपळ...

By admin | Updated: March 30, 2015 00:12 IST

संघर्ष जीवावर : अनेकांनी स्वत:हून सोडले काम

अशोक पाटील : इस्लामपूर  माजी सहकार मंत्री यशवंतराव मोहिते यांनी स्थापन केलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर त्यांचेच बंधू जयवंतराव भोसले यांनी सलग ३० वर्षे कारभार करुन मोठ्या प्रमाणात कामगारांची भरती केली. त्यानंतर त्यांच्याविरोधात यशवंतराव मोहिते यांनी आवाज उठवून सत्ता उलथवून टाकली. कारखान्यावर भोसले-मोहिते घराण्याचीच हुकूमशाही होती. या घराण्याच्या राजकीय संघर्षात मात्र कामगारांची होरपळ झाली. कामगार कायद्याला या नेत्यांनी केराची टोपली दाखवली आहे.सध्या कारखान्यात २ हजार कामगारांची संख्या आहेत. त्यापैकी ७0 ते ७५ कामगार कायमस्वरुपी आहेत. त्यातील काही कामगार सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. प्रारंभीच्या काळात जयवंतराव भोसले यांनी मोठ्या प्रमाणात कामगारांची भरती करुन आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. कारखाना सभासदांच्या ताकदीवर वैद्यकीय क्षेत्रात कृष्णा ट्रस्ट उभे केले. हेच कारण पुढे करुन त्यांचेच बंधू यशवंतराव मोहिते यांनी त्यांची सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर अतिरिक्त कामागारांना काम नाही, या नावाखाली कमी करण्यात आले.यशवंतराव मोहिते यांच्या सत्तेच्या काळात मदन मोहिते आणि इंद्रजित मोहिते यांनी आपल्या मर्जीतील कामगारांची भरती केली. राजकीय संघर्षात जे कामगार असतील, अशांना या ना त्या कारणाच्या नोटिसा देऊन कमी करण्याचेही राजकारण मोठ्या प्रमाणात होऊ लागले. यातील बहुतांशी कामगारांनी कायद्याचा मार्ग अवलंबला आहे. मोहिते-भोसले यांचे मनोमीलन झाल्यानंतर या दोन्ही गटातील कामगारांच्यात मात्र सख्य नव्हते. त्यामुळेच अविनाश मोहिते यांची सत्ता आली. निवडणुकीत अविनाश मोहिते यांनी जाहीरनाम्याऐवजी वचननामा प्रसिध्द केला होता. यामध्येही राजकीय सूडभावनेने कोणत्याही कामगारांना कमी करणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु मोहिते यांनीही त्यांच्या विरोधातील कामगारांना कमी केले.एकंदरीत कृष्णा कारखान्याच्या राजकारणात बहुतांशी कामगार देशोधडीला लागले आहेत. तर काही आजही न्यायालयाच्या आदेशाची वाट पहात आहेत. सत्ता बदलात काही कामगार कमी करण्याअगोदरच स्वत:च काम सोडून घरी बसणे पसंद करतात. हाही पायंडा कामगार वर्गात चांगलाच रुजला आहे. आगामी निवडणुकीत तिरंगी लढत होणार असून, यामध्ये किती कामगारांचा बळी जाणार, हे येणारा काळच ठरवेल.कृष्णा स्थापनेपासून मोहिते-भोसले यांच्या राजकीय संघर्षाचा फटका बहुतांशी कामगारांना बसला आहे. त्यातील काही कामगारांचे प्रश्न न्यायप्रविष्ट आहेत. कामगार दोषी असेल तर, त्याला कमी करणे योग्य ठरेल. परंतु राजकीय सूडभावनेने कामगारांवर अन्याय करण्याचा पायंडा चांगलाच रुजला आहे.- विलास देसाई, माजी जनरल सेक्रेटरी साखर कामगार संघटना.