शहरं
Join us  
Trending Stories
1
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
2
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
5
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
6
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
7
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
8
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
9
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
10
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
11
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
12
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
13
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
14
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
15
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार
16
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
17
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
18
जन्मभर विसरणार नाही असा धडा भारतास शिकवू; सिंधू जल करार स्थगितीमुळे पाकच्या धमक्या वाढल्या
19
'झुरळे गोपीनाथ' मंदिर ! ३०० वर्षांपूर्वीच्या मंदिरात झुरळांच्या रूपात गोपिकांचा वास
20
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा

‘कृष्णा’च्या राजकारणात कामगारांची होरपळ...

By admin | Updated: March 30, 2015 00:12 IST

संघर्ष जीवावर : अनेकांनी स्वत:हून सोडले काम

अशोक पाटील : इस्लामपूर  माजी सहकार मंत्री यशवंतराव मोहिते यांनी स्थापन केलेल्या कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर त्यांचेच बंधू जयवंतराव भोसले यांनी सलग ३० वर्षे कारभार करुन मोठ्या प्रमाणात कामगारांची भरती केली. त्यानंतर त्यांच्याविरोधात यशवंतराव मोहिते यांनी आवाज उठवून सत्ता उलथवून टाकली. कारखान्यावर भोसले-मोहिते घराण्याचीच हुकूमशाही होती. या घराण्याच्या राजकीय संघर्षात मात्र कामगारांची होरपळ झाली. कामगार कायद्याला या नेत्यांनी केराची टोपली दाखवली आहे.सध्या कारखान्यात २ हजार कामगारांची संख्या आहेत. त्यापैकी ७0 ते ७५ कामगार कायमस्वरुपी आहेत. त्यातील काही कामगार सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. प्रारंभीच्या काळात जयवंतराव भोसले यांनी मोठ्या प्रमाणात कामगारांची भरती करुन आपली राजकीय ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला. कारखाना सभासदांच्या ताकदीवर वैद्यकीय क्षेत्रात कृष्णा ट्रस्ट उभे केले. हेच कारण पुढे करुन त्यांचेच बंधू यशवंतराव मोहिते यांनी त्यांची सत्ता उलथवून टाकली. त्यानंतर अतिरिक्त कामागारांना काम नाही, या नावाखाली कमी करण्यात आले.यशवंतराव मोहिते यांच्या सत्तेच्या काळात मदन मोहिते आणि इंद्रजित मोहिते यांनी आपल्या मर्जीतील कामगारांची भरती केली. राजकीय संघर्षात जे कामगार असतील, अशांना या ना त्या कारणाच्या नोटिसा देऊन कमी करण्याचेही राजकारण मोठ्या प्रमाणात होऊ लागले. यातील बहुतांशी कामगारांनी कायद्याचा मार्ग अवलंबला आहे. मोहिते-भोसले यांचे मनोमीलन झाल्यानंतर या दोन्ही गटातील कामगारांच्यात मात्र सख्य नव्हते. त्यामुळेच अविनाश मोहिते यांची सत्ता आली. निवडणुकीत अविनाश मोहिते यांनी जाहीरनाम्याऐवजी वचननामा प्रसिध्द केला होता. यामध्येही राजकीय सूडभावनेने कोणत्याही कामगारांना कमी करणार नसल्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु मोहिते यांनीही त्यांच्या विरोधातील कामगारांना कमी केले.एकंदरीत कृष्णा कारखान्याच्या राजकारणात बहुतांशी कामगार देशोधडीला लागले आहेत. तर काही आजही न्यायालयाच्या आदेशाची वाट पहात आहेत. सत्ता बदलात काही कामगार कमी करण्याअगोदरच स्वत:च काम सोडून घरी बसणे पसंद करतात. हाही पायंडा कामगार वर्गात चांगलाच रुजला आहे. आगामी निवडणुकीत तिरंगी लढत होणार असून, यामध्ये किती कामगारांचा बळी जाणार, हे येणारा काळच ठरवेल.कृष्णा स्थापनेपासून मोहिते-भोसले यांच्या राजकीय संघर्षाचा फटका बहुतांशी कामगारांना बसला आहे. त्यातील काही कामगारांचे प्रश्न न्यायप्रविष्ट आहेत. कामगार दोषी असेल तर, त्याला कमी करणे योग्य ठरेल. परंतु राजकीय सूडभावनेने कामगारांवर अन्याय करण्याचा पायंडा चांगलाच रुजला आहे.- विलास देसाई, माजी जनरल सेक्रेटरी साखर कामगार संघटना.