शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

सत्ताधाऱ्यांनी रोजगार, शिक्षणाचे प्रश्न दडपले : मेधा पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 23:59 IST

अस्तित्वाचे प्रश्न दडपले जात आहेत, जगण्याशी जोडलेले शिक्षण, रोजगाराच्या अधिकाराचे प्रश्न दाबले जात आहेत, अशावेळी अस्तित्वाला धोक्यात आणणाºया सत्तेविरुध्द आणि जाती-धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे,

ठळक मुद्दे इस्लामपुरात संविधान सन्मान यात्राअस्तित्वाला धोक्यात आणणाºया सत्तेविरुध्द आणि जाती-धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे

इस्लामपूर : अस्तित्वाचे प्रश्न दडपले जात आहेत, जगण्याशी जोडलेले शिक्षण, रोजगाराच्या अधिकाराचे प्रश्न दाबले जात आहेत, अशावेळी अस्तित्वाला धोक्यात आणणाºया सत्तेविरुध्द आणि जाती-धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणाला आव्हान देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी येथे केले.

२८ राज्ये आणि ६३ दिवसांच्या दांडी ते दिल्लीदरम्यान निघालेल्या संविधान सन्मान यात्रेचे इस्लामपूर येथे सोमवारी सकाळी आगमन झाले. येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर झालेल्या संवाद सभेत त्या बोलत होत्या. माजी प्राचार्य विश्वास सायनाकर, कॉ. धनाजी गुरव, प्राचार्य डॉ. एच. टी. दिंडे, सुभाष पाटील, बी. जी. पाटील, रविकांत तुपकर, के. डी. शिंदे, कृष्णकांत, डॉ. रवींद्र व्होरा, सयाजी मोरे उपस्थित होते.मेधा पाटकर म्हणाल्या की, आपला सूर आशेचा, विश्वासाचा आहे. राज्यघटनेने दिलेले अधिकार व सुरक्षा मिळते आहे का, हे पाहिले पाहिजे. परंतु नेमके हेच अधिकार व सुरक्षा नाकारली जात आहे. भांडवलदार सत्ता गाजवत आहेत, त्यांचे हित जपले जात आहे.

सरकारने अतिशय संघर्षातून निर्माण झालेला भूसंपादन कायदा दडपून टाकला. केंद्रीय कायदा बाजूला ठेवून संसाधने लुटली जात आहेत. अंबानी-अदाणींना कोट्यवधी रुपये देऊन परदेशात ठेके मिळवून दिले जात आहेत; पण त्याविषयी कोण बोलणार? पर्यायी विकासासाठी सुरू असलेले खोटे अर्थकारण सर्वांनी मिळून हाणून पाडले पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेले आदर्श जपण्यासाठी एकत्र यावे. ते काम केवळ दलितांचे नव्हे, तर सर्व श्रमिकांचे आहे.

त्या म्हणाल्या की, संविधानाचा अधिकार मानवी अधिकार आहे. आपल्या लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांना महत्त्व दिले नाही तर, आपण जाब विचारला पाहिजे. सामान्यांचे प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जातात, तर आपणही सावध झाले पाहिजे. शेतकºयांना हमीभाव मिळविण्यासाठी लढावेच लागेल. स्वामिनाथन् आयोगाची अंमलबजावणी का केली जात नाही? विभाजनवादी राजकारण अमान्य करून आपणाला अन्यायाविरोधात बोललेच पाहिजे.

माजी प्राचार्य विश्वास सायनाकर यांनी विविध प्रदेशातून आलेल्या बहुभाषिक कार्यकर्त्यांना वाळवा तालुक्याचा इतिहास हिंदी भाषेतून सांगितला. दीपक कोठावळे यांनी प्रास्ताविक केले. विकास मगदूम यांनी आभार मानले. शरद कांबळे, सागर जाधव, उमेश कुरळपकर, आबा पाटील, सुयश पाटील, सचिन पवार यांनी संयोजन केले.भाजपची भाषणबाजीस्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर म्हणाले की, सध्या देशात फक्त भाषणबाजी सुरू आहे. संविधान यात्रेत सर्व कष्टकरी, शेतकरी सोबत राहतील. देशात सत्ताधाºयांच्या खुर्च्या धोक्यात आहेत, त्यामुळेच ते जाती-धर्मात भांडणे लावत आहेत.

टॅग्स :Medha Patkarमेधा पाटकरSangliसांगलीPoliticsराजकारण