शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
3
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
4
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
5
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
6
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
7
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
8
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
9
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
10
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
11
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
12
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
13
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
14
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
15
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
16
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
17
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
18
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
19
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
20
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा

मंत्र्यांच्या प्रतीक्षेत कर्मचाऱ्यांच्या उठा-बशा

By admin | Updated: February 9, 2015 23:56 IST

समाजकल्याण विभागातील प्रकार : तीन तास विलंबाने आढावा बैठकीला मुहूर्त

सांगली : सामाजिक न्याय भवनाची आजची सोमवारची सकाळ धावपळीत सुरू झाली... इतरवेळी निवांत येणारे अधिकारी, कर्मचारी आज खात्याचे राज्यमंत्री येणार म्हणून सकाळी आठ वाजताच हजर झाले... अकरा वाजता होणाऱ्या आढावा बैठकीची सर्व तयारी नऊ वाजताच झाली...इमारतीबाहेर प्रतीक्षा करीत असलेले अधिकारी, कर्मचारी कधी खुर्चीवर बसायचे, तर कधी लगेच मंत्री पोहोचतील म्हणून उठून उभे रहायचे. तब्बल तीन तासांहून अधिक काळ राज्यमंत्र्यांची प्रतीक्षा करीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उठा-बशा सुरू होत्या. दुपारी २ नंतर मंत्रीमहोदय आल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या दौऱ्यात आज पक्षीय कार्यक्रम घुसडले गेल्याने नियोजित दौरा विस्कळीत झाला. सामाजिक न्याय भवनातील अकरा वाजता होणारी बैठक तब्बल तीन तास उशिरा सुरू झाली. सकाळी आठ वाजल्यापासून सामाजिक न्याय भवनात हजर राहिलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ताटकळत उभे रहावे लागले. शासकीय दरबारी नागरिकांना नेहमी ताटकळत उभे रहावे लागते. आज अधिकारी व कर्मचाऱ्यांना मंत्र्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे रहावे लागले. दुपारी दोन वाजता येथील बैठकीस प्रारंभ झाला. यावेळी कांबळे म्हणाले की, सामाजिक न्याय विभागामार्फत पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन, अनुसूचित जाती व नवबौध्द कुटुंबांना शेतजमीन उपलब्ध करून देण्यासाठी शेतजमिनी खरेदीची तीन लाख रुपये असणारी मर्यादा सद्य परिस्थितीत अपुरी असल्याने शेतजमिनी उपलब्ध होणे कठीण होत आहे. यासाठी शासनाच्या जमीन खरेदी मर्यादेत वाढ करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल. सामाजिक न्याय विभाग मागासवर्गीयांच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. या विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजना प्रत्येक पात्र मागासवर्गीय व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, महापौर विवेक कांबळे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे, भाजप प्रदेशउपाध्यक्षा नीता केळकर आदी उपस्थित होते. सामाजिक न्याय भवनातील बहुउद्देशीय सभागृहाच्या नूतनीकरणाचे उद्घाटनही त्यांच्याहस्ते करण्यात आले. (प्रतिनिधी)जमीन खरेदी मर्यादेत वाढ करणारभूमिहीन, अनुसूचित जाती व नवबौध्द कुटुंबांना शेतजमीन उपलब्ध करून देण्यासाठी शेतजमिनी खरेदीची तीन लाख रुपये असणारी मर्यादा सद्य परिस्थितीत अपुरी असल्याने शेतजमिनी उपलब्ध होणे कठीण होत आहे. यासाठी शासनाच्या जमीन खरेदी मर्यादेत वाढ करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येईल, असे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सांगितले.शासनाच्या विविध योजना प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. यात दिरंगाई आढळल्यास कारवाई होईल.