शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

उद्योजकांमध्ये पालकमंत्र्यांबद्दल नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककुपवाड : सांगलीतील औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) विभागीय कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करण्याचा घाट घातल्याबद्दल सांगली जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. उद्योजकांनी पालकमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांनी सोलापूरला नव्याने स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करावे. येथील कार्यालय आहे तसेच ठेवावे. त्यांना सोलापूरला स्वतंत्र कार्यालय करण्यास आमचा पाठिंबाच आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्ककुपवाड : सांगलीतील औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) विभागीय कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करण्याचा घाट घातल्याबद्दल सांगली जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. उद्योजकांनी पालकमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्र्यांनी सोलापूरला नव्याने स्वतंत्र विभागीय कार्यालय सुरू करावे. येथील कार्यालय आहे तसेच ठेवावे. त्यांना सोलापूरला स्वतंत्र कार्यालय करण्यास आमचा पाठिंबाच आहे. पालकमंत्र्यांनी सांगलीतील कार्यालय स्थलांतरित करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थतीत करू नये. कार्यालय स्थलांतरित करण्याचा प्रयत्न झाल्यास उद्योजकांना बरोबर घेऊन जोरदार आंदोलन उभारण्याचा इशाराही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दिला.सांगली जिल्ह्यात वसंतदादांनी सहकारी, औद्योगिक वसाहतीबरोबरच एमआयडीसीचे औद्योगिक क्षेत्र रूजविले. त्यानंतर जिल्ह्यात आजतागायत तेरा औद्योगिक वसाहती निर्माण झाल्या आहेत. यामध्ये कुपवाड, मिरज, इस्लामपूर, विटा, कडेगाव, जत, शिराळा, पलूस, शाळगाव या एमआयडीसींचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच कवलापूर, सिध्देवाडी, अलकूड-मणेराजुरी या एमआयडीसीही प्रस्तावित आहेत, तर सोलापूर जिल्ह्यात सात औद्योगिक क्षेत्रे कार्यरत आहेत, तर पाच प्रस्तावित आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा हा सोलापूरपेक्षा अधिक आघाडीवर आहे. तसेच जिल्ह्यातून चार महामार्ग जाणार असल्यानेही उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एमआयडीसीचे विभागीय कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करणे किंवा कोल्हापूरला जोडण्याचा प्रकार अत्यंत चुकीचा होणार आहे, अशी प्रतिक्रिया जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. त्यांनी उद्योजकांच्या बरोबरीने कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील एमआयडीसीचे विभागीय कार्यालय पालकमंत्र्यांना स्थलांतरित करू न देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. जिल्ह्यातील उद्योजकांमधून या निर्णयाचे संतप्त पडसाद उमटले आहेत. हा निर्णय रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.विभागीय कार्यालयात : ही कामे होतात...सांगली जिल्ह्यात तेरा एमआयडीसी कार्यरत आहेत. या जिल्ह्यातील उद्योजकांची या विभागीय कार्यालयाअंतर्गत अत्यंत महत्त्वाची कामे होतात. त्यामध्ये प्लॉट वाटप, लीज डीड, प्लॉट ट्रान्सफर, करारपत्रे अशी महत्त्वाची कामे केली जातात. ही कामे उद्योजकांच्यादृष्टीने अत्यंत अडचणीची असतात. त्यामुळे कार्यालयाचे स्थलांतर झाल्यास किंवा हा जिल्हा अन्य जिल्ह्यास जोडल्यास उद्योजकांची गैरसोयच अधिक होणार आहे. उद्योजकांना उद्योग सोडून अन्य जिल्ह्यात हेलपाटे मारणे परवडणारे नाही, असे उद्योजकांनी सांगितले.मुंबईत उद्या बैठकसांगलीतील औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करण्यासंदर्भात मुंबईत मंत्रालयात बुधवारी १३ रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. ही बैठक पालक मंत्री सुभाष देशमुख यांनी उद्योग विभागाला दिलेल्या लेखी निवेदनावरून बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत सांगलीतील कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करण्याचा निर्णय होणार आहे किंवा सांगली जिल्हा हा कोल्हापूरला जोडण्यासंदर्भात निर्णय होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील औद्योगिक संघटनांमधून नाराजी पसरली आहे. हा निर्णय रद्द करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.विट्यातील उद्योजकांचा कार्यालय स्थलांतरास विरोधविटा : सांगली येथील उद्योग भवनमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले महाराष्टÑ औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) विभागीय कार्यालय सोलापूर येथे स्थलांतरण करण्यास जिल्ह्यातील उद्योजक व संघटनांनी विरोध केला असून, सांगलीचे कार्यालय सोलापूरच नव्हे, तर कोठेही स्थलांतर केल्यास एकत्रित तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती विटा यंत्रमाग संघाचे अध्यक्ष किरण तारळेकर यांनी दिली. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले असल्याचेही तारळेकर यांनी सांगितले. तारळेकर म्हणाले, विभागीय कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करण्याचा शासनस्तरावर विचार सुरू आहे. मात्र, असे केल्यास सांगली जिल्ह्यातील औद्योगिक वाढीवर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे हे कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करण्यास उद्योजक व औद्योगिक संघटनांनी तीव्र विरोध केला असून, शासनाने याबाबत दि. १३ रोजी मंत्रालयात होणाºया बैठकीत स्थलांतराचा निर्णय घेऊन नये, अन्यथा आम्हाला यापुढे आंदोलनासारखे हत्यार हाती घ्यावे लागेल.