शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

गुरुजींच्या अकरा शाळा झाल्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:25 IST

सांगली : २००५ पर्यंत दहावीच्या मध्यम गुणवत्ताधारकांसाठी डीएडचा अभ्यासक्रम सर्वाधिक लोकप्रिय होता. यशाची शंभर टक्के खात्री आणि ...

सांगली : २००५ पर्यंत दहावीच्या मध्यम गुणवत्ताधारकांसाठी डीएडचा अभ्यासक्रम सर्वाधिक लोकप्रिय होता. यशाची शंभर टक्के खात्री आणि सरकारी नोकरीची २०० टक्के हमी यामुळे गल्लोगल्ली डीएड महाविद्यालये सुरु झाली, त्यातून गुरुजींचा अक्षरश: महापूर आला. नोकरभरतीवर मऱ्यादा आली, गुरुजींच्या नोकऱ्या कमी झाल्या तशी ही कृत्रिम सूज भराभर उतरत गेली. त्याचा परिणाम महाविद्यालये बंद होण्यावर झाला. आजमितीस जिल्ह्यातील २८ पैकी ११ महाविद्यालयात प्रवेश बंद आहेत. यापैकी दोन महाविद्यालयांनी मान्यता रद्द करुन घेतली आहे, तर उर्वरीतांनी मान्यता कायम ठेवत प्रवेश बंद केले आहेत. प्रवेशाअभावी ५९० जागा रिक्त आहेत. ही सर्व महाविद्यालये विनाअनुदानित आहेत.

महाविद्यालये बंद झाल्याने तेथील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही संपुष्टात आल्या. काही संस्थांनी या कर्मचाऱ्यांची आपल्या अन्य महाविद्यालयांत सोय केली, पण उर्वरीतांना अन्य रोजगाराशिवाय पऱ्याय राहिला नाही. २०१० च्या महाभरतीमध्ये बारा हजार जागा भरल्या गेल्या, त्यानंतर दहा वर्षे भरती झालीच नाही, त्यामुळेही डीएडकडील प्रवाह ओसरला. जिल्ह्यात आजमितीस सुमारे बारा हजार गुरुजी बेरोजगार आहेत. डीएड प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन सुरु आहे, मात्र पुरेसा प्रतिसाद नाही. नोकऱ्या धोक्यात असल्याने विद्यार्थी मिळविण्यासाठी शिक्षकांचा संघर्ष सुरु आहे.गेल्या वर्षीपेक्षा प्रवेशाची स्थिती चांगली आहे. प्रवेशासाठी शासनाने विशेष फेरी सुरु केली आहे. ऑनलाईन प्रक्रिया जानेवारीपर्यंत पूर्ण होईल. विद्यार्थी मिळत नसल्याने पंधरा विद्यार्थ्यांवरही वर्ग सुरु ठेवण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

- रमेश होसकोटी,

प्राचार्य, डाएट, सांगली१५ विद्यार्थ्यांवरही वर्ग सुुरु

अकरापैकी सात महाविद्यालये अनुदानित आहेत. त्यांची प्रवेश क्षमता ४० आहे. पण विद्यार्थी मिळत नसल्याने शासनानेच क्षमता कमी केली आहे. १५ विद्यार्थी मिळाले तरी महाविद्यालय सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. विनाअनुदानित महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांअभावी प्रवेश बंद केेलेत, पण मान्यता कायम ठेवली आहे.२०११ मध्ये डीएड केले, पण भरतीच नसल्याने बेरोजगारीचा सामना करत आहे. एका खासगी शाळेत तात्पुरते काम करत आहे. सध्याच्या शिक्षकभरतीत संधी मिळण्याची अपेक्षा आहे, अन्यथा वयोमऱ्यादा संपण्याची टांगती तलवार आहे.

- नितीन कोळेकर,

बेरोजगार तरुण

-------------