शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

पूरग्रस्त शेतकऱ्यांना वीजबिलाचा ‘शॉक’, मोटारी घरात, बिले दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 14:48 IST

महापुराने उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विजबिलाचा शॉक बसला आहे. समडोळी (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी जून महिन्यापासून पाण्याच्या मोटारी घरात ठेवल्या असताना अचानक महावितरण कंपनीने सहा महिन्यांची दोन हप्त्यातील सुमारे ८0 ते ९0 हजार रुपयांची बिले शेतकऱ्यांना धाडली आहेत. मोटारी घरात असताना वीजबिले दारात आल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला आहे.

ठळक मुद्देपूरग्रस्त शेतकऱ्यांना वीजबिलाचा ‘शॉक’, मोटारी घरात, बिले दारातसमडोळीतील शेतकऱ्यांमधून महावितरणबद्दल संताप

सांगली : महापुराने उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता विजबिलाचा शॉक बसला आहे. समडोळी (ता. मिरज) येथील शेतकऱ्यांनी जून महिन्यापासून पाण्याच्या मोटारी घरात ठेवल्या असताना अचानक महावितरण कंपनीने सहा महिन्यांची दोन हप्त्यातील सुमारे ८0 ते ९0 हजार रुपयांची बिले शेतकऱ्यांना धाडली आहेत. मोटारी घरात असताना वीजबिले दारात आल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला आहे.समडोळी येथील शेतकरी सूर्यकांत बाळासाहेब मगदुम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महापुराच्या काळात विजेच्या मिटरबाबत महावितरणनेच निर्णय घ्यायला हवा होता. शेतकऱ्यांनी सतर्कता बाळगत शेतीतील पाण्याच्या मोटारी घरात नेऊन सुरक्षित ठेवल्या. जूनपासून या मोटारी अद्यापही घरातच आहेत. दुसरीकडे महापुराच्या काळात दोन महिने व त्यानंतरही अवकाळी पावसामुळे दोन महिने शेतीची कामेच करता आली नाहीत.

वीजेचा वापरही केला गेला नाही. सहा महिने शेतकऱ्यांना शेतीपासून दूर रहावे लागले असताना अचानक आलेल्या या भरमसाठ बिलामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. महावितरणने बंद असलेल्या मीटरचे कसे रिडिंग घेतले आणि बिलाची कशी आकारणी केली, हा संशोधनाचा विषय आहे.समडोळी येथील सुभाष बापुसो खोत, सुधीर बापुसो खोत, रवींद्र पाटील आदी शेतकऱ्यांनाही अशी भरमसाठ बिले आली आहेत. अगोदरच वीजेच्या दराने हैराण असलेल्या शेतकऱ्यांचे वापराविना आलेल्या बिलामुळे कंबरडे मोडले आहे. महावितरण कंपनीने या विजबिलांबाबत तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही याविरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा मगदुम यांनी दिला आहे. 

टॅग्स :mahavitaranमहावितरणSangliसांगली