शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

जतमधील आठ गावांना टॅँकरने पाणी

By admin | Updated: June 1, 2015 00:21 IST

दहा टँकर सुरू : शासनाकडून अत्यल्प पाणीपुरवठा; माणसी चाळीस लिटरची मागणी

जयवंत आदाटे -जत -तालुक्यातील ८ गावे व त्याखालील ६२ वाड्या-वस्त्यांवरील ३५ हजार १२० नागरिकांनी प्रतिदिवस दहा टॅँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. शासनाकडून होत असलेला पाणीपुरवठा अत्यल्प असून, २० लिटर पाण्यातून दैनंदिन गरज पूर्ण होत नाही. शासनाने या नियमात बदल करून माणसी चाळीस लिटरप्रमाणे पाणीपुरवठा करावा, अशी मागणी टॅँकर सुरू असलेल्या गावातील नागरिकांमधून होत आहे.दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी झपाट्याने खाली जात आहे. विहिरी, तलाव, नाले, विंधनविहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. प्रत्येकवर्षी २५ मे अखेरपर्यंत एक-दोन मोठे अवकाळी पाऊस होत होते. यावर्षी काही भागातच तुरळक प्रमाणात पाऊस झाला आहे. उर्वरित भागात पाऊस झाला नाही. मे महिन्यातील अवकाळी पाऊस व त्यानंतर वातावरणात बदल होऊन पश्चिमेकडून -पूर्वेकडे जोरदार गार वारे वाहत होते. याशिवाय उन्हाची तीव्रता कमी होऊन आकाशात सतत काळे ढग तयार होत होते. त्यामुळे पाणी टंचाईची तीव्रता कमी होती; परंतु यावर्षी मे महिना संपत आला असता तरी जत तालुक्यातील वातावरणात बदल झाला नाही. हवेतील उष्णता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस त्यात वाढ होऊ लागली आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिली तर, येथील पाणीटंचाईची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाला टॅँकरच्या संख्येत वाढ करावी लागणार आहे, अशी भीती येथे व्यक्त केली जात आहे.खोजानवाडी, उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, काराजनगी, उटगी, बिळूर ही आठ गावे आणि त्याखालील ६२ वाड्या-वस्त्यांवर दहा टॅँकरच्या २७ खेपा प्रशासनाने मंजूर केल्या आहेत. दहा टॅँकरपैकी चार टॅँकर शासकीय, तर सहा टॅँकर खासगी आहेत. खासगी टॅँकरची क्षमता बारा हजार लिटर, तर शासकीय टॅँकरची क्षमता दहा हजार लिटर इतकी आहे. नादुरुस्त टॅँकर, लांब अंतरावरील पाणी उद्भव ठिकाण, वीज दाबनियमन व गळके टॅँकर यामुळे मंजूर २७ पैकी २५ किंवा २६ खेपांचे पाणी नागरिकांना मिळत आहे. शासकीय नियम प्रतिमाणसी वीस लिटर इतका असला, तरी प्रत्यक्षात पंधरा ते अठरा लिटर पाणी नागरिकांना मिळत आहे. शासन निर्मलग्राम, स्वच्छता अभियान व हागणदारीमुक्त गाव या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करत आहे. प्रतिमाणसी वीस लिटर पाण्यातून दैनंदिन गरजा पूर्ण करून आम्ही शासकीय योजनांची कशी अंमलबजावणी करणार, असा प्रश्न अमृतवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विठ्ठल पवार यांनी उपस्थित केला आहे. मागील कित्येक वर्षांपासून टंचाई कालावधित वीज लिटर प्रतिमाणसी पाणी पुरवठा करावा, असा जुना शासकीय नियम आहे. या नियमात आता शासनाने बदल करावा किंवा लोकप्रतिनिधींनी त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे.मंजूर खेपांपेक्षा कमी पाणीखोजनवाडी, उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, काराजनगी, उटगी, बिळूर ही आठ गावे आणि त्याखालील ६२ वाड्या-वस्त्यांवर दहा टॅँकरच्या २७ खेपा प्रशासनाने मंजूर केल्या आहेत.नादुरुस्त टॅँकर, लांब अंतरावरील पाणी उद्भव ठिकाण, वीज दाबनियमन व गळके टॅँकर यामुळे मंजूर २७ पैकी २५ किंवा २६ खेपांचे पाणी नागरिकांना मिळत आहे.