शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

आठशे क्विंटल तूर जत तालुक्यात पडून केंद्र १६ मेपासून बंद : व्यापाऱ्यांकडून कमी दराने खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:16 IST

शासनमान्य हमीभाव तूर खरेदी केंद्रावरील तूर खरेदीची मुदत संपल्याने १६ मेपासून केंद्र बंद करण्यात आले आहे. तूर खरेदीची शेतकºयांना हेक्टरी अट लावण्यात आल्याने कोंडी झाली होती.

गजानन पाटील ।संख : शासनमान्य हमीभाव तूर खरेदी केंद्रावरील तूर खरेदीची मुदत संपल्याने १६ मेपासून केंद्र बंद करण्यात आले आहे. तूर खरेदीची शेतकºयांना हेक्टरी अट लावण्यात आल्याने कोंडी झाली होती. काही शेतकºयांकडे तूर शिल्लक आहे. तालुक्यामध्ये शेतकºयांकडे अजूनही ८०० क्विंटल तूर खरेदीविना पडून आहे. कवडीमोल भावाने तूर विक्री करावी लागणार आहे. कृषी राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शेतकºयांना टाहो फोडावा लागत आहे.

जिल्ह्यातील पहिले हमीभाव केंद्र १ फेबु्रवारीला सुरू झाले. शासनाने ५ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यास सांगली कृषी उत्पन्न समितीतील तूर खरेदी केंद्रावर १२ हजार शेतकºयांनी नोंदणी केली. या शेतकºयांकडून १४ हजार ७७५ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. शासनाने खरेदी केलेल्या तुरीपैकी एक हजार शेतकºयांना ५ हजार ४५० रुपयांप्रमाणे बिले मिळाली आहेत. अजूनही दोनशे शेतकºयांची बिले मिळणे बाकी आहे.

यावर्षी तूर खरेदी करताना हेक्टरी अट लावण्यात आली होती. अटीनुसार हेक्टरी अडीच क्विंटलच तूर खरेदी करण्यात आली. एका शेतकºयाकडून जास्तीत जास्त २० क्विंटलच तूर खरेदी करण्यात आली. हेक्टरी अट लावण्यात आल्याने शेतकºयांची कोंडी झाली होती. खरीप हंगामात कडधान्य पीक म्हणून तूर पीक घेतले जाते. कमी खर्चात, पावसावर, कमी भांडवलात व माळरानावर तूर पीक येत असल्याने हे पीक घेण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. तालुक्यात गेल्यावर्षी ३४०० हेक्टर क्षेत्रावर तूर पीक घेण्यात आले. यावर्षी २ हजार १०० हेक्टर पीक घेतले होते.

अनुकूल हवामानामुळे पिकाची उगवण चांगली झाली आहे. पण दिवसभर ऊन, रात्रीची थंडी, पहाटे धुके यामुळे शेंगेवर हिरवी अळी या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात औषधांची फवारणी केली आहे. शेंगात दाणे भरण्याच्यावेळीच प्रतिकूल हवामानामुळे तूर उत्पादनात घट झाली आहे.

तसेच गेल्यावर्षी तूर खरेदी केंद्र लवकर बंद झाल्यामुळे तालुक्यात टोकन न घेतलेल्या शेतकºयांची अडीच हजार क्विंटल तूर खरेदीविना पडून राहिली. त्यामुळे तूर घेण्याकडे यावर्षी कल कमी झाला आहे. सध्या जत, संख बाजारात ३ हजार ४०० रुपये असा दर आहे. कवडीमोल भावाने विक्री होत आहे. याकडे शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.सरकार का सवलत देत नाही?तुरीची आधारभूत किमत क्विंटलला ५४५० रुपये आहे. कर्नाटक सरकार शेतकºयांना क्विंटलला ५०० रुपये अनुदान देते, तर राज्य शासन तुरीला काहीच अनुदान देत नाही. कर्नाटकात ५९५० रुपये क्विंटल दराने खरेदी करते. गावातील सेवा सोसायटीला खरेदी करण्याचे अधिकार दिलेले होते, तर मग आमचे शासन शेतकºयांना सवलत का देत नाही? हा सवाल उपस्थित केला जात आहे.हेक्टरी अडीच क्विंटलच्या अटीमुळे तूर शिल्लक राहिली आहे. कमी दराने विकण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. शासनाने अट काढून टाकावी. - कामाण्णा पाटील, शेतकरी