शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
3
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
4
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
5
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
6
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
7
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
9
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
10
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
11
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
12
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
13
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
14
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
15
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
16
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
17
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
18
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
19
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
20
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार

शिक्षण खासगीकरणप्रश्नी शनिवारी एल्गार पालक, विद्यार्थ्यांचाही पाठिंबा : राज्य सरकारचे सामान्य घटकाच्या विरोधात धोरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:00 IST

सांगली : राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रात खासगीकरण करून कंपन्यांना स्वातंत्र्य दिले आहे. सरकारची ही भूमिका सर्वसामान्य घटकाच्या विरोधात असून गरिबांची शिक्षणाची दारे कायमची बंद

सांगली : राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रात खासगीकरण करून कंपन्यांना स्वातंत्र्य दिले आहे. सरकारची ही भूमिका सर्वसामान्य घटकाच्या विरोधात असून गरिबांची शिक्षणाची दारे कायमची बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. म्हणूनच सर्व शिक्षक, संस्था चालक, कर्मचारी, अंगणवाडी सेविका संघटनांनी राज्य शासनाच्या विरोधात शनिवार दि. २० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व संघटनांनी एकत्रित येऊन जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची स्थापना केली आहे. या व्यासपीठाचे निमंत्रक विजयसिंह गायकवाड, अध्यक्ष आर. एस. चोपडे, सचिव राजेंद्र नागरगोजे, राज्य शिक्षण संस्था संघटनेचे खजिनदार रावसाहेब पाटील, नितीन खाडिलकर, जिल्हा शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ सातपुते, शिक्षक परिषदेचे पुणे विभागाचे अध्यक्ष अर्जुन सावंत आदींनी बुधवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणाविरोधात भूमिका जाहीर केली.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारचे शैक्षणिक धोरण ठोस नसल्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचे फार मोठे नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा दहावेळा आदेश बदलला जात आहे. उच्च माध्यमिक शिक्षकांचा एकही प्रश्न सोडविला नाही. पटसंख्येच्या जाचक अटी घालून वाड्या-वस्त्यांवरील शाळा बंद करून तेथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान केले आहे. शिक्षकेतर सेवकांचा नवीन आकृतिबंध लागू करावा, सर्व विनाअनुदानित शाळांना व उच्च माध्यमिक विद्यालयांना वेतन व वेतनेतर अनुदान त्वरित मिळावे, यासह विविध प्रश्नांवर शिक्षक, संस्थाचालक संघटना मागील तीन वर्षापासून आंदोलने करीत आहेत.

तरीही राज्य सरकारने कोणतीही समस्या सोडविली नाही. शिक्षकांच्या समस्या सोडविणे लांबच, उलट शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शिक्षणाचे खासगीकरण करून कंपन्यांच्या हातात शिक्षण देण्याची भूमिका घेतली. यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे शिक्षणच बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे.

म्हणूनच शिक्षणाच्या प्रश्नावर शिक्षक, शिक्षण संस्था चालक, शिक्षकेतर संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी, अभियंता संघटना, मराठा क्रांती मोर्चा, अंगणवाडी सेविका व मदनीस संघटना यांनी राज्य सरकारच्या विरोधात दि. २० जानेवारी रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीतील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील पुतळ्यापासून मोर्चाची सुरुवात होणार आहे. मोर्चाला पालक विद्यार्थी संघटनांनीही मोर्चात सहभागी होणार आहेत.आंदोलकांच्या मागण्या...शिक्षणाचे व्यापारीकरण व कंपनीकरण करणारे शासन विधेयक त्वरित रद्द करावाड्या-वस्त्यांवरील दहा विद्यार्थी पटसंख्येच्या आतील शाळा बंद करू नका ,२००४ पासूनचे थकीत वेतनेतर अनुदान पूर्वीच्या नियमाप्रमाणेच ार्व शाळांना देण्यात यावेअर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करावे व त्यांचे पगार आॅनलाईन करावेतशिक्षक भरतीवरील बंदी त्वरित उठवावी आणि संस्था चालकांनाच भरती करण्याचे अधिकार मिळावेतकला, क्रीडा शिक्षकांच्या पूर्वीप्रमाणेच नियुक्त्या कराव्यात शाळेमध्ये लिपिक व सेवकांची पदे मान्य करावीत