शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

जिल्ह्याचा पूर्व भाग अजूनही तहानलेला

By admin | Updated: July 23, 2016 23:51 IST

टॅँकर सुरूच : दमदार पावसाची प्रतीक्षा

सांगली : मान्सूनने पहिल्या टप्प्यात सर्वांचीच धाकधुक वाढविली असताना, पंधरवड्यापासून होत असलेल्या पावसाने गेल्या तीन वर्षातील कसर भरून काढली आहे. जिल्ह्याच्या पूर्वभागात मात्र अजूनही टॅँकरनेच पाणीपुरवठा सुरू आहे. टॅँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या जत तालुक्यातील गावांची संख्या मोठी असून, यात घट होत असली तरी एकीकडे जिल्ह्याचा पश्चिम भाग दमदार पावसामुळे पुराच्या उंबरठ्यावर उभा असताना पूर्वभाग मात्र अजूनही तहानलेलाच आहे. जिल्ह्यातील १२५ हून अधिक गावे टॅँकरवरच अवलंबून आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांसह सामान्यजनही चिंतेत होते. मात्र, त्यानंतर पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली. गेल्या पंधरा दिवसात तर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगावच्या काही भागात केवळ वारे वाहत होते. जिल्ह्यातील पावसाची सरासरी लक्षात घेतली तर १५७.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात शनिवार २३ जुलैअखेर शिराळा तालुक्यात ७७६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचवेळी आटपाडी तालुक्यात १६०.३ मि.मी., जत तालुक्यात १५५.५ मि.मी. खानापूर तालुक्यात १८९.४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या टॅँकरची संख्या कमी होत असली तरी जिल्ह्याच्या एका भागात दमदार पाऊस आणि एका भागात टंचाईची स्थिती हे परस्परविरोधी चित्र पाहावयास मिळत आहे. १६ जुलैअखेर १२९ गावांमध्ये पाण्याचे टॅँकर सुरू होते. यात जत तालुक्यातील सर्वाधिक ५० गावांत टॅँकरने पाणी पुरवठा सुरू असून, ३९९ वाड्या-वस्त्यांवर टॅँकर सुरू आहे. विशेष म्हणजे अजून दहा ठिकाणी नव्याने टॅँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. यात जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा व शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या टॅँकर थांबले असले तरी जत, आटपाडी, तासगाव तालुक्यात अजूनही टॅँकर सुरूच आहेत. यात तासगाव तालुक्यात २७ गावात, आटपाडी तालुक्यात २० गावांत टॅँकर सुरू आहेत. आठवड्यापूर्वी झालेल्या दमदार पावसावेळी हे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळविण्याची मागणी होत होती. मात्र, सध्या पूर्वभागात कमी पाऊस झाला असला तरी, या भागाला परतीच्या मान्सूनचा आधार असतो. त्यामुळे त्यानंतरच पाणी देण्याबाबत कार्यवाही होऊ शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)योजनांनी दिला आधार ऐन पावसाळ्यातही टंचाई परिस्थिती कायम असताना मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, तासगाव व जत तालुक्यातील काही भागांना तसेच आटपाडी, कडेगाव भागालाही त्यावेळी सुरू असलेल्या पाणी योजनांचा चांगला आधार मिळाल्याचे दिसून आले. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनेमुळे टॅँकरची संख्या आटोक्यात राहण्यास मदत झाली.