शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
2
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
3
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
4
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
5
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
6
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
7
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
8
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
9
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
10
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
11
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
12
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
14
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
16
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
17
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
18
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
19
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
20
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार

जिल्ह्याचा पूर्व भाग अजूनही तहानलेला

By admin | Updated: July 23, 2016 23:51 IST

टॅँकर सुरूच : दमदार पावसाची प्रतीक्षा

सांगली : मान्सूनने पहिल्या टप्प्यात सर्वांचीच धाकधुक वाढविली असताना, पंधरवड्यापासून होत असलेल्या पावसाने गेल्या तीन वर्षातील कसर भरून काढली आहे. जिल्ह्याच्या पूर्वभागात मात्र अजूनही टॅँकरनेच पाणीपुरवठा सुरू आहे. टॅँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या जत तालुक्यातील गावांची संख्या मोठी असून, यात घट होत असली तरी एकीकडे जिल्ह्याचा पश्चिम भाग दमदार पावसामुळे पुराच्या उंबरठ्यावर उभा असताना पूर्वभाग मात्र अजूनही तहानलेलाच आहे. जिल्ह्यातील १२५ हून अधिक गावे टॅँकरवरच अवलंबून आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांसह सामान्यजनही चिंतेत होते. मात्र, त्यानंतर पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली. गेल्या पंधरा दिवसात तर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगावच्या काही भागात केवळ वारे वाहत होते. जिल्ह्यातील पावसाची सरासरी लक्षात घेतली तर १५७.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात शनिवार २३ जुलैअखेर शिराळा तालुक्यात ७७६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचवेळी आटपाडी तालुक्यात १६०.३ मि.मी., जत तालुक्यात १५५.५ मि.मी. खानापूर तालुक्यात १८९.४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या टॅँकरची संख्या कमी होत असली तरी जिल्ह्याच्या एका भागात दमदार पाऊस आणि एका भागात टंचाईची स्थिती हे परस्परविरोधी चित्र पाहावयास मिळत आहे. १६ जुलैअखेर १२९ गावांमध्ये पाण्याचे टॅँकर सुरू होते. यात जत तालुक्यातील सर्वाधिक ५० गावांत टॅँकरने पाणी पुरवठा सुरू असून, ३९९ वाड्या-वस्त्यांवर टॅँकर सुरू आहे. विशेष म्हणजे अजून दहा ठिकाणी नव्याने टॅँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. यात जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा व शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या टॅँकर थांबले असले तरी जत, आटपाडी, तासगाव तालुक्यात अजूनही टॅँकर सुरूच आहेत. यात तासगाव तालुक्यात २७ गावात, आटपाडी तालुक्यात २० गावांत टॅँकर सुरू आहेत. आठवड्यापूर्वी झालेल्या दमदार पावसावेळी हे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळविण्याची मागणी होत होती. मात्र, सध्या पूर्वभागात कमी पाऊस झाला असला तरी, या भागाला परतीच्या मान्सूनचा आधार असतो. त्यामुळे त्यानंतरच पाणी देण्याबाबत कार्यवाही होऊ शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)योजनांनी दिला आधार ऐन पावसाळ्यातही टंचाई परिस्थिती कायम असताना मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, तासगाव व जत तालुक्यातील काही भागांना तसेच आटपाडी, कडेगाव भागालाही त्यावेळी सुरू असलेल्या पाणी योजनांचा चांगला आधार मिळाल्याचे दिसून आले. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनेमुळे टॅँकरची संख्या आटोक्यात राहण्यास मदत झाली.