शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

जिल्ह्याचा पूर्व भाग अजूनही तहानलेला

By admin | Updated: July 23, 2016 23:51 IST

टॅँकर सुरूच : दमदार पावसाची प्रतीक्षा

सांगली : मान्सूनने पहिल्या टप्प्यात सर्वांचीच धाकधुक वाढविली असताना, पंधरवड्यापासून होत असलेल्या पावसाने गेल्या तीन वर्षातील कसर भरून काढली आहे. जिल्ह्याच्या पूर्वभागात मात्र अजूनही टॅँकरनेच पाणीपुरवठा सुरू आहे. टॅँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या जत तालुक्यातील गावांची संख्या मोठी असून, यात घट होत असली तरी एकीकडे जिल्ह्याचा पश्चिम भाग दमदार पावसामुळे पुराच्या उंबरठ्यावर उभा असताना पूर्वभाग मात्र अजूनही तहानलेलाच आहे. जिल्ह्यातील १२५ हून अधिक गावे टॅँकरवरच अवलंबून आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांसह सामान्यजनही चिंतेत होते. मात्र, त्यानंतर पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली. गेल्या पंधरा दिवसात तर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगावच्या काही भागात केवळ वारे वाहत होते. जिल्ह्यातील पावसाची सरासरी लक्षात घेतली तर १५७.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात शनिवार २३ जुलैअखेर शिराळा तालुक्यात ७७६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचवेळी आटपाडी तालुक्यात १६०.३ मि.मी., जत तालुक्यात १५५.५ मि.मी. खानापूर तालुक्यात १८९.४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या टॅँकरची संख्या कमी होत असली तरी जिल्ह्याच्या एका भागात दमदार पाऊस आणि एका भागात टंचाईची स्थिती हे परस्परविरोधी चित्र पाहावयास मिळत आहे. १६ जुलैअखेर १२९ गावांमध्ये पाण्याचे टॅँकर सुरू होते. यात जत तालुक्यातील सर्वाधिक ५० गावांत टॅँकरने पाणी पुरवठा सुरू असून, ३९९ वाड्या-वस्त्यांवर टॅँकर सुरू आहे. विशेष म्हणजे अजून दहा ठिकाणी नव्याने टॅँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. यात जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा व शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या टॅँकर थांबले असले तरी जत, आटपाडी, तासगाव तालुक्यात अजूनही टॅँकर सुरूच आहेत. यात तासगाव तालुक्यात २७ गावात, आटपाडी तालुक्यात २० गावांत टॅँकर सुरू आहेत. आठवड्यापूर्वी झालेल्या दमदार पावसावेळी हे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळविण्याची मागणी होत होती. मात्र, सध्या पूर्वभागात कमी पाऊस झाला असला तरी, या भागाला परतीच्या मान्सूनचा आधार असतो. त्यामुळे त्यानंतरच पाणी देण्याबाबत कार्यवाही होऊ शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)योजनांनी दिला आधार ऐन पावसाळ्यातही टंचाई परिस्थिती कायम असताना मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, तासगाव व जत तालुक्यातील काही भागांना तसेच आटपाडी, कडेगाव भागालाही त्यावेळी सुरू असलेल्या पाणी योजनांचा चांगला आधार मिळाल्याचे दिसून आले. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनेमुळे टॅँकरची संख्या आटोक्यात राहण्यास मदत झाली.