शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याचा पूर्व भाग अजूनही तहानलेला

By admin | Updated: July 23, 2016 23:51 IST

टॅँकर सुरूच : दमदार पावसाची प्रतीक्षा

सांगली : मान्सूनने पहिल्या टप्प्यात सर्वांचीच धाकधुक वाढविली असताना, पंधरवड्यापासून होत असलेल्या पावसाने गेल्या तीन वर्षातील कसर भरून काढली आहे. जिल्ह्याच्या पूर्वभागात मात्र अजूनही टॅँकरनेच पाणीपुरवठा सुरू आहे. टॅँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या जत तालुक्यातील गावांची संख्या मोठी असून, यात घट होत असली तरी एकीकडे जिल्ह्याचा पश्चिम भाग दमदार पावसामुळे पुराच्या उंबरठ्यावर उभा असताना पूर्वभाग मात्र अजूनही तहानलेलाच आहे. जिल्ह्यातील १२५ हून अधिक गावे टॅँकरवरच अवलंबून आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने डोळे वटारल्याने शेतकऱ्यांसह सामान्यजनही चिंतेत होते. मात्र, त्यानंतर पावसाने सर्वत्र दमदार हजेरी लावली. गेल्या पंधरा दिवसात तर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, त्याचवेळी जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, तासगावच्या काही भागात केवळ वारे वाहत होते. जिल्ह्यातील पावसाची सरासरी लक्षात घेतली तर १५७.७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. यात शनिवार २३ जुलैअखेर शिराळा तालुक्यात ७७६.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचवेळी आटपाडी तालुक्यात १६०.३ मि.मी., जत तालुक्यात १५५.५ मि.मी. खानापूर तालुक्यात १८९.४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या टॅँकरची संख्या कमी होत असली तरी जिल्ह्याच्या एका भागात दमदार पाऊस आणि एका भागात टंचाईची स्थिती हे परस्परविरोधी चित्र पाहावयास मिळत आहे. १६ जुलैअखेर १२९ गावांमध्ये पाण्याचे टॅँकर सुरू होते. यात जत तालुक्यातील सर्वाधिक ५० गावांत टॅँकरने पाणी पुरवठा सुरू असून, ३९९ वाड्या-वस्त्यांवर टॅँकर सुरू आहे. विशेष म्हणजे अजून दहा ठिकाणी नव्याने टॅँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. यात जिल्ह्यातील मिरज, पलूस, वाळवा व शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या टॅँकर थांबले असले तरी जत, आटपाडी, तासगाव तालुक्यात अजूनही टॅँकर सुरूच आहेत. यात तासगाव तालुक्यात २७ गावात, आटपाडी तालुक्यात २० गावांत टॅँकर सुरू आहेत. आठवड्यापूर्वी झालेल्या दमदार पावसावेळी हे वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागात वळविण्याची मागणी होत होती. मात्र, सध्या पूर्वभागात कमी पाऊस झाला असला तरी, या भागाला परतीच्या मान्सूनचा आधार असतो. त्यामुळे त्यानंतरच पाणी देण्याबाबत कार्यवाही होऊ शकते, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)योजनांनी दिला आधार ऐन पावसाळ्यातही टंचाई परिस्थिती कायम असताना मिरज पूर्वभाग, कवठेमहांकाळ, तासगाव व जत तालुक्यातील काही भागांना तसेच आटपाडी, कडेगाव भागालाही त्यावेळी सुरू असलेल्या पाणी योजनांचा चांगला आधार मिळाल्याचे दिसून आले. ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू योजनेमुळे टॅँकरची संख्या आटोक्यात राहण्यास मदत झाली.