शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

ंदुष्काळी माळावर केशर, हापूस दरवळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:21 IST

गजानन पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क संख : केशर, हापूस आंबा म्हटले की कोकणची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, ...

गजानन पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसंख : केशर, हापूस आंबा म्हटले की कोकणची आठवण येते. सुधारित तंत्राचा वापर, योग्य व्यवस्थापन, कष्ट व जिद्द या जोरावर बनाळी (ता. जत) येथील काकासाहेब सावंत या शेतकऱ्याने फोंड्या माळरानावर दहा एकर क्षेत्रावर आंब्याची बाग उभी केली आहे.काकासाहेब सावंत यांनी पुणे येथील टेल्को कंपनीची नोकरी सोडून कृषी विभागाच्या सहकार्याने यशस्वी शेती करून दाखविली आहे. सेंद्रीय खतांचा वापर, पाण्याची काटकसर यामुळे निकृष्ट जमिनीतसुद्धा नंदनवन उभा करता येते, हा त्यांनी आदर्श घालून दिला आहे. दुष्काळी भागातील शेती विकासाचे आदर्श मॉडेल खडकाळ माळरानावर उभा राहिले आहे. विशेष म्हणजे या आंब्याच्या बागेतून त्यांनी २० लाख रुपये एवढे उत्पन्न मिळवले आहे.आपल्या दोन शिक्षक बंधूंच्या मदतीने पंधरा एकर माळरानावर फळबाग लागवडीचा प्रयोग सुरू केला. हा भाग कायमचाच दुष्काळी आहे. तरीही त्यांनी ७० फूट खोल विहीर खणली. त्या पाण्यावर दहा एकर आंबा, एक एकर चिक्कू, एक एकर डाळिंब, तीन एकर चिंच, दोन एकर सीताफळ अशा फळबागा उभ्या केल्या आहेत. बागा उभा केल्यानंतर पाचव्यावर्षी उत्पन्नाला सुरुवात झाली. मोहर आल्यानंतर फवारणी करून योग्य खतांची मात्रा दिली जाते.२०१२ ते १४ या तीन वर्षात भीषण दुष्काळ पडला होता. सहा कूपनलिका घेऊन त्यांनी पाणी मिळवण्यासाठी धडपड केली; पण अपेक्षित पाणी मिळालेच नाही. शेवटी टँकरने पाणी आणून बाग जगवली. फळबागेच्या मध्यभागी १, ५०, १५० फूट लांबीचे शेततलाव घेऊन पूर्ण फळबागेला ठिबक सिंचनने पाणी दिले. म्हैसाळचे पाणी बनाळीच्या शिवारात आल्यानंतर दोन किलोमीटरची पाईपलाईन करून शाश्वत पाण्याची सोय केली. कृषी विभागाच्या विविध योजनांचा योग्य लाभ त्यांनी घेतला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी कांताप्पा खोत, तालुका कृषी अधिकारी संभाजी सावंत, कृषी सहायक कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.आंबा फळबागेबरोबरच २०१७ ला शासनाचा अधिकृत परवाना घेऊन विविध फळझाडांची रोपवाटिका सुरू केली आहे. रोपवाटिकेला आदर्श व्यवस्थापनासाठी सांगली जिल्हा परिषदेचा ‘आर. आर. पाटील शेतिनिष्ठ पुरस्कार’, ‘अहिल्यादेवी होळकर कृषिभूषण पुरस्कार’, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ‘शिवार कृषिरत्न पुरस्कार’ असे पुरस्कार मिळाले आहेत.भविष्यात आदर्श रोपवाटिकेबरोबरच सर्व सोयींनीयुक्त अद्ययावत असे कृषी पर्यटन केंद्र व लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क करण्याचा मनोदय सावंत कुटुंबियांनी यावेळी व्यक्त केला आहे.वीस टन उत्पादनमोहर आल्यावर दर महिन्याला एक सूक्ष्म अन्नद्रव्य फवारणी केली. बाग उभा केल्यानंतर पाचव्यावर्षी उत्पन्नाला सुरुवात झाली. मोहर सुटल्यानंतर फवारणी करून योग्य खतांची मात्रा दिली जाते. गेल्यावर्षी प्रत्येक झाडाला १५ ते २० किलो फळे मिळाली. एकूण बागेतून २० टन उत्पादन झाले. कच्च्या आंब्याला जागेवर १२५ रुपये किलो दर मिळाला.