शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
2
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
3
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
4
महिलांना लग्नाच्या जाळ्यात ओढून उकळायचा पैसे; मंदिरात लग्न उरकायचा अन्...
5
७/११ बॉम्बस्फोटाच्या निकालाविराेधात सरकार सुप्रीम कोर्टात; गुरुवारी सुनावणी
6
भोंग्याबाबतचे नियम दुसऱ्यांदा मोडल्यास गुन्हा नोंदवा! राज्याच्या पोलिस महासंचालकांचे आदेश
7
नवे उपराष्ट्रपती निवडताना भाजपला नाही चिंता; ४२२ सदस्यांचे समर्थन; बहुमताने एकच उमेदवार
8
अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; शिक्षिकेला मिळाला जामीन
9
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा वादात; म्हणे ‘शासनच भिकारी’
10
दिल्लीत लँडिंग होताच विमानाला अचानक आग; सर्व प्रवासी व कर्मचारी सुखरूप
11
मतदार यादीवरून विरोधक आक्रमकच; पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कामकाज ठप्प
12
धनखड यांनी राजीनामा नेमका का दिला? संसदेबाहेर चर्चा
13
गडचिरोलीत विकासविरोधी कारवायांना विदेशातून फंडिंग! नक्षलींनी बंदुका सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन
14
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
15
कॅप्टनच्या 'सेंच्युरी'नंतर टीम इंडियाकडून क्रांतीचा 'सिक्सर'! टी-२० सह इंग्लंडला वनडेतही 'धोबीपछाड'
16
‘गँग्ज ऑफ उल्हासनगर’पुढे पोलिसांचे सपशेल लोटांगण; आरोपीची पीडित मुलीच्या घरासमोर मिरवणूक
17
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
18
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
19
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
20
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा

रहिवासी क्षेत्रात विहिरी धोकादायक

By admin | Updated: March 9, 2015 23:47 IST

विट्यातील प्रकार : पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष; नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया

दिलीप मोहिते -विटा -वाढत्या विटा शहरातील रहिवासी क्षेत्रात नागरी वस्तीतच धोकादायक व पडिक विहिरी असून यामुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. रहिवासी क्षेत्रातील विहिरी तातडीने बुजवण्यासाठी पालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी पालिका प्रशासनाने धोकादायक व पडिक विहिरी बुजवून टाकण्याबाबत नोटिसा काढूनही मालकांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. विटा शहरात रहिवासी क्षेत्राची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पूर्वी शहराबाहेर असलेल्या विहिरी आता रहिवासी क्षेत्रात आल्या आहेत. ज्या विहिरीवर शेतीत बागायती पिके घेतली जायची, ती शेती आता प्लॉट पाडून विक्री करण्यात आली आहे. त्यामुळे या अनेक विहिरी आता पडिक व विनावापराच्या झाल्याने त्या धोकादायक बनल्या आहेत. नागरी वस्तीत मध्यभागी असलेल्या या विहिरीच्या बाजूनेच रस्ते गेले आहेत. यातील अनेक विहिरी गेल्या अनेक वर्षांपासून पडिक आहेत. या विहिरींना संरक्षण कठडे किंवा तेथे विहीर असल्याचे निदर्शनास येण्यासारखे काहीही नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या दोन वर्षापूर्वी मायणी रस्त्यावरील एका विहिरीत तीन लहान शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांना धोकादायक ठरणाऱ्या रहिवासी क्षेत्रातील या विहिरी तातडीने बुजवून टाकाव्यात, अशी मागणी होत आहे.त्या पार्श्वभूमीवर विटा पालिका प्रशासनाने शहरातील गावभागासह उपनगरांतील रहिवासी क्षेत्रात असणाऱ्या काही धोकादायक व विनावापरातील विहिरींचा शोध घेऊन संबंधित मालकांना धोकादायक विहिरी बुजविण्याबाबत नोटिसाही काढल्या होत्या. मालकांना आठ ते पंधरा दिवसांची मुदतही देण्यात आली होती. परंतु, या नोटिसांना तब्बल एक ते दीड वर्ष उलटून गेले, संबंधित मालकांनी त्या नोटिसांना केराची टोपली दाखविल्याचे बोलले जाते. विटा नगरपालिकेने नोटीस दिल्याच्या मुदतीत विहीर मालकांकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यास अशा विहीर मालकांची यादी पोलिसांत देऊन कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते. तरीही विहीर मालकांनी ती ना बुजविली, ना पालिकेने पोलिसांत तक्रार केली. त्यामुळे पालिका प्रशासनाने शहरातील रहिवासी क्षेत्रात असलेल्या धोकादायक विहिरींचा पुन्हा एकदा सर्व्हे करून संबंधित मालकांना वापरात नसलेल्या पडक्या धोकादायक विहिरी तातडीने बुजवण्याबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.नागरिकांच्या जीविताशी खेळ...विटा शहरातील नागरी वस्तीत असलेल्या विहिरींमुळे लहान मुले व नागरिकांना मोठा धोका आहे. या विहिरींना कोणतेही संरक्षक कुंपण नाहीच, शिवाय या विहिरी रहदारीच्या रस्त्याच्या बाजूला असल्याने नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पडिक विहिरी बुजवण्यासाठी पालिका प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलणे गरजेचे आहे. परंतु, पालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरापूर्वी संबंधित विहीर मालकांना नोटिसा काढल्याचे सांगण्यात आले. पण त्या विहिरी आजही तशाच आहेत. याबाबत पालिकेने संबंधितांवर काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे अशा विहीर मालकांना पालिकाच पाठीशी घालून नागरिकांच्या जीविताशी खेळत असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष संजय भिंंगारदेवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.