शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

उपेक्षित समाजमने लिहिती झाल्याने उत्तम साहित्य निर्मिती

By admin | Updated: January 16, 2016 00:29 IST

गिरीश प्रभुणे : औदुंबरला साहित्य संमेलन उत्साहात

अंकलखोप : तळागाळातील समाजाला जीवनाची विदारकता व जीवनाची समृध्द लय पूर्वी कधी सापडली नाही. जन्मापासून जे पारध्यांनी भोगले, वंचित समाजाने भोगले, ते साहित्यात अद्यापही नीटपणे आले नाही. परंतु पारधी, कोल्हाटी समाजमने ज्यावेळी लिहिती झाली, त्यावेळी साहित्यसृष्टी खऱ्याअर्थाने समृध्द झाली आहे. त्यांच्या अनोख्या समाजजीवनाचे भावविश्व साहित्यातून दिसून येऊ लागल्यानेच साहित्यविश्वात हे साहित्य वेगळे ठरले आहे, असे प्रतिपादन संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक गिरीश प्रभुणे यांनी केले.औदुंबर येथील सदानंद साहित्य मंडळाच्या ७३ व्या साहित्य संमेलनात अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. तळागाळातील समाजाच्या साहित्यासंदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले, एखादी गोष्ट समजून घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये लपलेल्या भूमिका जाणून घेतल्या पाहिजे. भटके विमुक्त, दलित, कोल्हाटी समाज लिहू लागल्याने जीवनातील खऱ्या व्यथा-वेदनांचे चित्रण साहित्यात उमटू लागले. ज्याच्याकडून जगण्याचा सराव केला जातो, तोच देशाच्या वैभवात भर घालत असतो. डोंबारी, पारधी, कोल्हाटी समाजामध्ये दररोज रामायण घडत असते. त्याचा मराठी साहित्यात प्रवेश होऊ लागला आहे. वंचित समाजाचे मरण, जगणे हे साहित्यात उमटू लागले आहे आणि हेच जीवनानुभव भविष्यातील साहित्याची पंढरी होणार आहे. हा समाज इतर समाजाबरोबर वावरू लागला आहे, हीच साहित्याची खरी देण असल्याचेही त्यांनी सांगितले.साहित्य संमेलनप्रसंगी सदानंद सामंत, कवी सुधांशू, म. भा. भोसले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक सदानंद साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी केले. यावेळी केंद्र सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल भिलवडीचे मुख्याध्यापक डी. के. किणीकर यांचा गौरव करण्यात आला. सरपंच संजना यादव यांचाही गौरव करण्यात आला.यावेळी कवी सुधांशू व्यासपीठावर अण्णासाहेब डांगे, वसंत केशव पाटील, मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, कविसंमेलनाच्या अध्यक्षा प्रा. डॉ. सुनंदा शेळके, कवयित्री वैशाली पाटील, सरपंच संजना यादव, प्रा. द. तु. पाटील (बेळगाव), कवी सुभाष कवडे, वैजनाथ महाजन, उद्योगपती काकासाहेब चितळे, बाळासाहेब पवार, रवी पाटील, बापूसाहेब शिरगावकर, श्वेता बिरनाळे, उपसरपंच महेश चौगुले आदी उपस्थित होते. पुरुषोत्तम जोशी यांनी आभार मानले. (वार्ताहर)पुढील वर्षीपासून पुरस्कारपुढील वर्षीपासून साहित्यिक म. द. हातकणंगलेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उत्कृष्ट साहित्यकृतीला साहित्य पुरस्कार देण्याचे जाहीर करण्यात आले.प्रा. दिलीपकुमार मोहिते, यांच्या ‘डोहाळे जेवण’ या कथासंग्रहाचे, पी. डी. सागावकर यांच्या ‘कविता मनातल्या’ या कवितासंग्रहाचे व राजा रावळ यांच्या ‘राजलक्ष्मी’ या विशेषांकाचे प्रकाशन केले.