शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

अवकाळी पावसाच्या दणक्याने डाळिंब फुटू लागल

By admin | Updated: November 21, 2014 00:28 IST

बागा धोक्यात : उत्पादकांना मोठा फटका; मशागतीचा खर्चही निघणे मुश्किले

दरीबडची : रिमझिम पाऊस, ढगाळ हवामान, वातावरणातील बदल यामुळे जत तालुक्यातील डाळिंब बागांवर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. पावसाच्या पाण्यामुळे बागेतील झाडांना फळे लागली आहेत, तर सध्या बागेचा हंगाम धरलेल्या, लहान फळ असलेल्या बागांवर चिक्की, बिब्या (तेल्या डाग) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. महागडी औषधे, रासायनिक खते, मशागतीचा लाखो रुपयांचा खर्च केला आहे. अवकाळी पावसामुळे डाळिंब बागायतदारांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ९ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. कमी पाण्यात, अनुकूल हवामान, खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे हे पीक असल्याने शेतकऱ्यांनी १00 टक्के फळबाग अनुदान योजनेतून ठिबक सिंचनच्या साहाय्याने उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. गणेश, केशर जातीच्या बागा आहेत. दरीबडची, काशिलिंगवाडी, सोन्याळ, जाडरबोबलाद, आसंगी, उमदी, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर येथील शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे डाळिंब उत्पादन केले आहे. इतर फळबागांपेक्षा कमी मशागतीच्या खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये उत्पादन येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या बागा फुलविल्या आहेत. आर्थिक फायदाही चांगला आहे. अनुकूल हवामानामुळे बागा चांगल्या बहरल्या आहेत. बिब्ब्या रोगाचा अपवाद वगळता दरीबडची येथील बागा चांगल्या आहेत. सध्या बागेतील फळे परिपक्व झालेली आहेत. पण या फळबागांना अवकाळी पावसाचा परिणाम होऊ लागला आहे. रिमझिम पावसामुळे बागांना पाणी जादा होते. पाण्यामुळे फळातील दाणे फुटतात, फळांचे कवच टणक असल्यामुळे फळ फुटते. तसेच उन्हामुळेही फळांचे कवच जास्त टणक बनलेले असते. त्यामुळे मध्यम, अपरिपक्व फळांचेही दाणे पाण्याने फुटून पडतात. त्याचा फोठा फटका बागांना बसू लागला आहे.फळबागायतदार शेतकरी फळे फुटू नयेत म्हणून फळावरील कवच पातळ होण्यासाठी बावीस्टिन, बायोझॅम या औषधांची फवारणी घेऊ लागला आहे. ढगाळ हवामान, रिमझिम पावसामुळे सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये फळधारणा झालेल्या बागांवर बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्याचे हवामान अनुकूल असल्यामुळे बिब्ब्या रोगाची लागण वेगाने होत आहे. पाने, फुले, फळावर रोग पडू लागला आहे. पावसामुळे औषधाची फवारणी घेता येत नाही. संपूर्ण बागेचा हंगामच वाया जाणार आहे. खते, महागडी औषधे, मशागतीचा खर्च, मोठा झाला आहे. लागवड खर्चसुध्दा निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. (वार्ताहर)अंतिम टप्प्यात असलेल्या बागांवर रिमझिम पावसाने फळे फुटू लागली आहेत. फळांना पाणी जास्त होत असल्याने फळांना तडा जातो. लहान असलेल्या बागांवर बिब्ब्या पडू लागला आहे. पावसाने डाळिंबाचे नुकसान झाले आहे. - आप्पासाहेब चिकाटीडाळिंब उत्पादक शेतकरीव्यापाऱ्यांनी दर पाडलानोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये केशरचा दर ८0 ते ८५ रुपये, तर गणेशचा ५0 ते ५५ रुपये होता. दिल्ली, बेंगलोर, विजयवाडा, चेन्नई, मदुराई, नागपूर याठिकाणी पावसाचे कारण दाखवून डाळिंबाचा दर कमी केला आहे. केशर प्रतिकिलो ७0 ते ७५, गणेश ४0 ते ४५ रुपये दराने घेतला जात आहे.