शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

अवकाळी पावसाच्या दणक्याने डाळिंब फुटू लागल

By admin | Updated: November 21, 2014 00:28 IST

बागा धोक्यात : उत्पादकांना मोठा फटका; मशागतीचा खर्चही निघणे मुश्किले

दरीबडची : रिमझिम पाऊस, ढगाळ हवामान, वातावरणातील बदल यामुळे जत तालुक्यातील डाळिंब बागांवर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. पावसाच्या पाण्यामुळे बागेतील झाडांना फळे लागली आहेत, तर सध्या बागेचा हंगाम धरलेल्या, लहान फळ असलेल्या बागांवर चिक्की, बिब्या (तेल्या डाग) रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. महागडी औषधे, रासायनिक खते, मशागतीचा लाखो रुपयांचा खर्च केला आहे. अवकाळी पावसामुळे डाळिंब बागायतदारांना लाखो रुपयांचा फटका बसणार आहे. तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ९ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. कमी पाण्यात, अनुकूल हवामान, खडकाळ जमिनीवर येणारे फळबागेचे हे पीक असल्याने शेतकऱ्यांनी १00 टक्के फळबाग अनुदान योजनेतून ठिबक सिंचनच्या साहाय्याने उजाड माळरानावर बागा फुलविल्या आहेत. गणेश, केशर जातीच्या बागा आहेत. दरीबडची, काशिलिंगवाडी, सोन्याळ, जाडरबोबलाद, आसंगी, उमदी, जालिहाळ खुर्द, दरीकोणूर येथील शेतकऱ्यांनी चांगल्या दर्जाचे डाळिंब उत्पादन केले आहे. इतर फळबागांपेक्षा कमी मशागतीच्या खर्चामध्ये, कमी कष्टामध्ये उत्पादन येत असल्यामुळे शेतकऱ्यांनी या बागा फुलविल्या आहेत. आर्थिक फायदाही चांगला आहे. अनुकूल हवामानामुळे बागा चांगल्या बहरल्या आहेत. बिब्ब्या रोगाचा अपवाद वगळता दरीबडची येथील बागा चांगल्या आहेत. सध्या बागेतील फळे परिपक्व झालेली आहेत. पण या फळबागांना अवकाळी पावसाचा परिणाम होऊ लागला आहे. रिमझिम पावसामुळे बागांना पाणी जादा होते. पाण्यामुळे फळातील दाणे फुटतात, फळांचे कवच टणक असल्यामुळे फळ फुटते. तसेच उन्हामुळेही फळांचे कवच जास्त टणक बनलेले असते. त्यामुळे मध्यम, अपरिपक्व फळांचेही दाणे पाण्याने फुटून पडतात. त्याचा फोठा फटका बागांना बसू लागला आहे.फळबागायतदार शेतकरी फळे फुटू नयेत म्हणून फळावरील कवच पातळ होण्यासाठी बावीस्टिन, बायोझॅम या औषधांची फवारणी घेऊ लागला आहे. ढगाळ हवामान, रिमझिम पावसामुळे सप्टेंबर, आॅक्टोबरमध्ये फळधारणा झालेल्या बागांवर बिब्ब्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्याचे हवामान अनुकूल असल्यामुळे बिब्ब्या रोगाची लागण वेगाने होत आहे. पाने, फुले, फळावर रोग पडू लागला आहे. पावसामुळे औषधाची फवारणी घेता येत नाही. संपूर्ण बागेचा हंगामच वाया जाणार आहे. खते, महागडी औषधे, मशागतीचा खर्च, मोठा झाला आहे. लागवड खर्चसुध्दा निघणार नाही, अशी परिस्थिती आहे. (वार्ताहर)अंतिम टप्प्यात असलेल्या बागांवर रिमझिम पावसाने फळे फुटू लागली आहेत. फळांना पाणी जास्त होत असल्याने फळांना तडा जातो. लहान असलेल्या बागांवर बिब्ब्या पडू लागला आहे. पावसाने डाळिंबाचे नुकसान झाले आहे. - आप्पासाहेब चिकाटीडाळिंब उत्पादक शेतकरीव्यापाऱ्यांनी दर पाडलानोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये केशरचा दर ८0 ते ८५ रुपये, तर गणेशचा ५0 ते ५५ रुपये होता. दिल्ली, बेंगलोर, विजयवाडा, चेन्नई, मदुराई, नागपूर याठिकाणी पावसाचे कारण दाखवून डाळिंबाचा दर कमी केला आहे. केशर प्रतिकिलो ७0 ते ७५, गणेश ४0 ते ४५ रुपये दराने घेतला जात आहे.