शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

‘राजारामबापू’मुळेच नदी प्रदूषित

By admin | Updated: May 26, 2015 00:57 IST

रघुनाथदादांचा आरोप : प्रदूषण नियंत्रणची गांधारीची भूमिका

सांगली : राजारामबापू साखर कारखान्याचे मळीमिश्रित दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळेच नदीतील मासे मृत झाले आहेत. कारखान्यांचे दूषित पाणी सांगलीतील लाखो जनतेला प्यावे लागत आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गांधारीची भूमिका घेऊन जनतेच्या जिवाशी खेळत आहेत, असा आरोप शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी न घेताच को-जनरेशन आणि कारखान्याच्या विस्तारिकरणाचे काम सुरु केल्याबद्दल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाणी, वीज आणि बँक खाती सील का करू नयेत, अशी नोटीस दि. ४ फेब्रुवारी २०१५ रोजी पाठवूनही, प्रदूषण नियंत्रणच्या सांगलीतील अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतीच कारवाई केली नसल्याची टीकाही त्यांनी केली.ते पुढे म्हणाले की, साखर कारखान्यांचे मळीमिश्रित पाणी थेट कृष्णा नदीत सोडले जात आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी त्या कारखान्यांवर कोणतीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे सांगली आणि कृष्णा नदीकाठच्या गावांतील लाखो जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे. प्रदूषण नियंत्रण कोणत्या कारखान्यामुळे होत आहे, हेही प्रदूषण नियंत्रण अधिकारी जनतेला सांगू शकत नाहीत. एवढा राजकीय दबाव अधिकाऱ्यांवर असेल, तर ते जनतेची सेवा कशी करणार? सांगलीचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कऱ्हाड तालुक्यातील साखर कारखान्यांची नावे घेऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून आम्ही कोल्हापूर विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांकडून धक्कादायक माहिती मिळाली. राजारामबापू साखर कारखान्याकडून दूषित पाणी होत असतानाही तेथील प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना न घेताच कारखान्यामध्ये को-जनरेशन आणि क्षमता वाढविण्यासाठी विस्तारिकरणाचे काम सुरु असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीप्रसंगी आढळून आले आहे. याबद्दल विभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी राजारामबापू कारखान्यास दि. ४ फेब्रुवारी २०१५ रोजी नोटीस बजावून, प्रदूषण नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कारखाना बंद का करू नये, तसेच वीज, पाणी पुरवठा बंद का करू नये आणि तुमची बँक खाती सील का करू नयेत, असे ताशेरे ओढले आहेत, असेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीतील मुद्देराजारामबापू कारखान्याने को-जनरेशन आणि कारखाना विस्तारिकरणासाठी परवाना न घेताच काम सुरू केल्याबद्दल कारखाना बंद का करू नये.तुमच्या कारखान्याची वीज, पाणी बंद करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना का देऊ नयेप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांचे पालन करीत नसल्यामुळे बँक खाती सील का करू नयेत.