शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

‘राजारामबापू’मुळेच नदी प्रदूषित

By admin | Updated: May 26, 2015 00:57 IST

रघुनाथदादांचा आरोप : प्रदूषण नियंत्रणची गांधारीची भूमिका

सांगली : राजारामबापू साखर कारखान्याचे मळीमिश्रित दूषित पाणी कृष्णा नदीत मिसळत असल्यामुळेच नदीतील मासे मृत झाले आहेत. कारखान्यांचे दूषित पाणी सांगलीतील लाखो जनतेला प्यावे लागत आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गांधारीची भूमिका घेऊन जनतेच्या जिवाशी खेळत आहेत, असा आरोप शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केला. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून परवानगी न घेताच को-जनरेशन आणि कारखान्याच्या विस्तारिकरणाचे काम सुरु केल्याबद्दल, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाणी, वीज आणि बँक खाती सील का करू नयेत, अशी नोटीस दि. ४ फेब्रुवारी २०१५ रोजी पाठवूनही, प्रदूषण नियंत्रणच्या सांगलीतील अधिकाऱ्यांनी त्यावर कोणतीच कारवाई केली नसल्याची टीकाही त्यांनी केली.ते पुढे म्हणाले की, साखर कारखान्यांचे मळीमिश्रित पाणी थेट कृष्णा नदीत सोडले जात आहे. तरीही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी त्या कारखान्यांवर कोणतीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे सांगली आणि कृष्णा नदीकाठच्या गावांतील लाखो जनतेला दूषित पाणी प्यावे लागत आहे. प्रदूषण नियंत्रण कोणत्या कारखान्यामुळे होत आहे, हेही प्रदूषण नियंत्रण अधिकारी जनतेला सांगू शकत नाहीत. एवढा राजकीय दबाव अधिकाऱ्यांवर असेल, तर ते जनतेची सेवा कशी करणार? सांगलीचे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी कऱ्हाड तालुक्यातील साखर कारखान्यांची नावे घेऊन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणून आम्ही कोल्हापूर विभागाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी तेथील अधिकाऱ्यांकडून धक्कादायक माहिती मिळाली. राजारामबापू साखर कारखान्याकडून दूषित पाणी होत असतानाही तेथील प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे, याबद्दल त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचा परवाना न घेताच कारखान्यामध्ये को-जनरेशन आणि क्षमता वाढविण्यासाठी विस्तारिकरणाचे काम सुरु असल्याचे चौकशी अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीप्रसंगी आढळून आले आहे. याबद्दल विभागीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांनी राजारामबापू कारखान्यास दि. ४ फेब्रुवारी २०१५ रोजी नोटीस बजावून, प्रदूषण नियंत्रण कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कारखाना बंद का करू नये, तसेच वीज, पाणी पुरवठा बंद का करू नये आणि तुमची बँक खाती सील का करू नयेत, असे ताशेरे ओढले आहेत, असेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोटिसीतील मुद्देराजारामबापू कारखान्याने को-जनरेशन आणि कारखाना विस्तारिकरणासाठी परवाना न घेताच काम सुरू केल्याबद्दल कारखाना बंद का करू नये.तुमच्या कारखान्याची वीज, पाणी बंद करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना का देऊ नयेप्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांचे पालन करीत नसल्यामुळे बँक खाती सील का करू नयेत.