शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दरात घसरण झाल्याने गुळाचा गोडवा झाला कमी : आवकही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:15 IST

सांगली : सांगली मार्केट यार्डात गेल्या काही दिवसांपासून जोमात असलेली गुळाची आवक शनिवारी थंडावली. तीन हजार भेलींची आवक झाली असून, दरात तीनेश रुपयांची घसरण झाली.

ठळक मुद्देआवक वाढल्यानंतरही मिरचीच्या दरात तेजी; क्विंटलला चारशे रुपये दर हमीभावापेक्षा प्रति क्विंटलला २७५ रुपये शेतकºयांचे आर्थिक नुकसान

सांगली : सांगली मार्केट यार्डात गेल्या काही दिवसांपासून जोमात असलेली गुळाची आवक शनिवारी थंडावली. तीन हजार भेलींची आवक झाली असून, दरात तीनेश रुपयांची घसरण झाली. बाजारात मिरचीची आवक वाढली असली, तरी दरात सरासरी क्विंटलला चारशे रुपयांची तेजी आहे. हळदीची आवकही वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. नांदेड आणि जळगाव जिल्ह्यातील हळदही विक्रीसाठी दाखल झाली.

यार्डात शेतमालाच्या आवकेत चढ-उतार सुरुच आहेत. मागील काही दिवसांपासून सांगलीच्या बाजारात गुळाची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. दररोज सरासरी २७ ते ३० हजार भेली दाखल होत होत्या. परंतु आवक कमी होऊन २६ हजार भेली शनिवारी दाखल झाल्या होत्या. गुळाच्या दरातही क्विंटलला सरासरी तीनशे रुपयांची घसरण झाली. पांढरा गूळ ३५०० रुपये क्विंटल, तर तांबूस गूळ ३६०० ते ४१०० रुपये क्विंटल भाव होता. मक्याची आवकही २५ टक्क्यांनी थंडावली. दरात पंचवीस ते पन्नास रुपयांची वाढ झाली. साडेबाराशे ते एक हजार २७५ रुपये क्विंटलचा भाव राहिला.

हळदीच्या आवकेत वाढ झाली. दररोज दीडशे टन मालाची आवक विक्रीसाठी होत आहे. आंध्रप्रदेश, नांदेड आणि जळगावमधूनही माल येत आहे. राजापुरी हळदीला आठ हजार दोनशे ते अकरा हजार रुपये क्विंटल दर आहे. आंध्रप्रदेश, जळगाव आणि नांदेड येथील हळदीचा दर सात ते आठ हजार होता.मिरची दाखल झाली असून, दरातही तेजी आहे. पाचशे रुपयांची क्विंटलला वाढ झाली आहे. तेजा मिरची ९५०० ते दहा हजार क्विंटल, ब्याडगी १५ ते १८ हजार, तर ब्याडगी डॅमेज दहा ते बारा हजार रुपये क्विंटलचा भाव होता. मकर संक्रांतीपासून आवक वाढणार असल्याचे सांगलीतील व्यापाºयांनी सांगितले.मक्याला हमीभाव १४२५, खरेदी ११५० रुपयांनीचराज्य शासनाने मक्यासाठी हमीभाव प्रति क्विंटलला १४२५ रुपये ठरविला आहे. हमीभाव केंद्रावर मका खरेदीची मर्यादा असल्यामुळे शेतकºयांची व्यापाºयांकडून लूट केली जात आहे. सध्या मका केवळ प्रति क्विंटल ११५० रुपये दराने खरेदी केला जात आहे. हमीभावापेक्षा प्रति क्विंटलला २७५ रुपये शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. तरीही शेतकरी संघटना आणि राजकर्त्यांचेही याकडे लक्ष नसल्यामुळे व्यापाºयांकडून लूट होत आहे. शासन तरी याकडे लक्ष देणार का, असा सवाल शेतकºयांतून उपस्थित होत आहे.