शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

दरात घसरण झाल्याने गुळाचा गोडवा झाला कमी : आवकही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:15 IST

सांगली : सांगली मार्केट यार्डात गेल्या काही दिवसांपासून जोमात असलेली गुळाची आवक शनिवारी थंडावली. तीन हजार भेलींची आवक झाली असून, दरात तीनेश रुपयांची घसरण झाली.

ठळक मुद्देआवक वाढल्यानंतरही मिरचीच्या दरात तेजी; क्विंटलला चारशे रुपये दर हमीभावापेक्षा प्रति क्विंटलला २७५ रुपये शेतकºयांचे आर्थिक नुकसान

सांगली : सांगली मार्केट यार्डात गेल्या काही दिवसांपासून जोमात असलेली गुळाची आवक शनिवारी थंडावली. तीन हजार भेलींची आवक झाली असून, दरात तीनेश रुपयांची घसरण झाली. बाजारात मिरचीची आवक वाढली असली, तरी दरात सरासरी क्विंटलला चारशे रुपयांची तेजी आहे. हळदीची आवकही वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. नांदेड आणि जळगाव जिल्ह्यातील हळदही विक्रीसाठी दाखल झाली.

यार्डात शेतमालाच्या आवकेत चढ-उतार सुरुच आहेत. मागील काही दिवसांपासून सांगलीच्या बाजारात गुळाची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. दररोज सरासरी २७ ते ३० हजार भेली दाखल होत होत्या. परंतु आवक कमी होऊन २६ हजार भेली शनिवारी दाखल झाल्या होत्या. गुळाच्या दरातही क्विंटलला सरासरी तीनशे रुपयांची घसरण झाली. पांढरा गूळ ३५०० रुपये क्विंटल, तर तांबूस गूळ ३६०० ते ४१०० रुपये क्विंटल भाव होता. मक्याची आवकही २५ टक्क्यांनी थंडावली. दरात पंचवीस ते पन्नास रुपयांची वाढ झाली. साडेबाराशे ते एक हजार २७५ रुपये क्विंटलचा भाव राहिला.

हळदीच्या आवकेत वाढ झाली. दररोज दीडशे टन मालाची आवक विक्रीसाठी होत आहे. आंध्रप्रदेश, नांदेड आणि जळगावमधूनही माल येत आहे. राजापुरी हळदीला आठ हजार दोनशे ते अकरा हजार रुपये क्विंटल दर आहे. आंध्रप्रदेश, जळगाव आणि नांदेड येथील हळदीचा दर सात ते आठ हजार होता.मिरची दाखल झाली असून, दरातही तेजी आहे. पाचशे रुपयांची क्विंटलला वाढ झाली आहे. तेजा मिरची ९५०० ते दहा हजार क्विंटल, ब्याडगी १५ ते १८ हजार, तर ब्याडगी डॅमेज दहा ते बारा हजार रुपये क्विंटलचा भाव होता. मकर संक्रांतीपासून आवक वाढणार असल्याचे सांगलीतील व्यापाºयांनी सांगितले.मक्याला हमीभाव १४२५, खरेदी ११५० रुपयांनीचराज्य शासनाने मक्यासाठी हमीभाव प्रति क्विंटलला १४२५ रुपये ठरविला आहे. हमीभाव केंद्रावर मका खरेदीची मर्यादा असल्यामुळे शेतकºयांची व्यापाºयांकडून लूट केली जात आहे. सध्या मका केवळ प्रति क्विंटल ११५० रुपये दराने खरेदी केला जात आहे. हमीभावापेक्षा प्रति क्विंटलला २७५ रुपये शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. तरीही शेतकरी संघटना आणि राजकर्त्यांचेही याकडे लक्ष नसल्यामुळे व्यापाºयांकडून लूट होत आहे. शासन तरी याकडे लक्ष देणार का, असा सवाल शेतकºयांतून उपस्थित होत आहे.