शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दरात घसरण झाल्याने गुळाचा गोडवा झाला कमी : आवकही घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2017 01:15 IST

सांगली : सांगली मार्केट यार्डात गेल्या काही दिवसांपासून जोमात असलेली गुळाची आवक शनिवारी थंडावली. तीन हजार भेलींची आवक झाली असून, दरात तीनेश रुपयांची घसरण झाली.

ठळक मुद्देआवक वाढल्यानंतरही मिरचीच्या दरात तेजी; क्विंटलला चारशे रुपये दर हमीभावापेक्षा प्रति क्विंटलला २७५ रुपये शेतकºयांचे आर्थिक नुकसान

सांगली : सांगली मार्केट यार्डात गेल्या काही दिवसांपासून जोमात असलेली गुळाची आवक शनिवारी थंडावली. तीन हजार भेलींची आवक झाली असून, दरात तीनेश रुपयांची घसरण झाली. बाजारात मिरचीची आवक वाढली असली, तरी दरात सरासरी क्विंटलला चारशे रुपयांची तेजी आहे. हळदीची आवकही वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. नांदेड आणि जळगाव जिल्ह्यातील हळदही विक्रीसाठी दाखल झाली.

यार्डात शेतमालाच्या आवकेत चढ-उतार सुरुच आहेत. मागील काही दिवसांपासून सांगलीच्या बाजारात गुळाची आवक मोठ्या प्रमाणात होत होती. दररोज सरासरी २७ ते ३० हजार भेली दाखल होत होत्या. परंतु आवक कमी होऊन २६ हजार भेली शनिवारी दाखल झाल्या होत्या. गुळाच्या दरातही क्विंटलला सरासरी तीनशे रुपयांची घसरण झाली. पांढरा गूळ ३५०० रुपये क्विंटल, तर तांबूस गूळ ३६०० ते ४१०० रुपये क्विंटल भाव होता. मक्याची आवकही २५ टक्क्यांनी थंडावली. दरात पंचवीस ते पन्नास रुपयांची वाढ झाली. साडेबाराशे ते एक हजार २७५ रुपये क्विंटलचा भाव राहिला.

हळदीच्या आवकेत वाढ झाली. दररोज दीडशे टन मालाची आवक विक्रीसाठी होत आहे. आंध्रप्रदेश, नांदेड आणि जळगावमधूनही माल येत आहे. राजापुरी हळदीला आठ हजार दोनशे ते अकरा हजार रुपये क्विंटल दर आहे. आंध्रप्रदेश, जळगाव आणि नांदेड येथील हळदीचा दर सात ते आठ हजार होता.मिरची दाखल झाली असून, दरातही तेजी आहे. पाचशे रुपयांची क्विंटलला वाढ झाली आहे. तेजा मिरची ९५०० ते दहा हजार क्विंटल, ब्याडगी १५ ते १८ हजार, तर ब्याडगी डॅमेज दहा ते बारा हजार रुपये क्विंटलचा भाव होता. मकर संक्रांतीपासून आवक वाढणार असल्याचे सांगलीतील व्यापाºयांनी सांगितले.मक्याला हमीभाव १४२५, खरेदी ११५० रुपयांनीचराज्य शासनाने मक्यासाठी हमीभाव प्रति क्विंटलला १४२५ रुपये ठरविला आहे. हमीभाव केंद्रावर मका खरेदीची मर्यादा असल्यामुळे शेतकºयांची व्यापाºयांकडून लूट केली जात आहे. सध्या मका केवळ प्रति क्विंटल ११५० रुपये दराने खरेदी केला जात आहे. हमीभावापेक्षा प्रति क्विंटलला २७५ रुपये शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. तरीही शेतकरी संघटना आणि राजकर्त्यांचेही याकडे लक्ष नसल्यामुळे व्यापाºयांकडून लूट होत आहे. शासन तरी याकडे लक्ष देणार का, असा सवाल शेतकºयांतून उपस्थित होत आहे.