शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

दुष्काळाला गांभीर्याने तोंड द्या!

By admin | Updated: November 6, 2015 23:37 IST

जयंत पाटील : इस्लामपुरात समन्वय-पुनर्विलोकन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना

इस्लामपूर : तालुक्यात निम्म्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे़ टंचाईची तीव्रता वाढत जाणार आहे़ शासनाने घोषित केलेल्या १३ गावांना विविध योजना मिळवून देण्याबरोबरच तालुक्यातील पिण्याचे व शेतीचे पाणी, चारा आदीचे योग्य नियोजन करावे लागेल़ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने कामाला लागावे, असे आवाहन माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी केले. लोकांना टंचाईची झळ बसू नये यासाठी अधिकाऱ्यांनी दर महिन्याला बैठक घेऊन कामाचा आढावा घ्यावा, अशी सूचना आमदार शिवाजीराव नाईक यांनी केली़ इस्लामपूर येथील तहसील कार्यालयामध्ये तालुका समन्वय व पुनर्विलोकन समितीची बैठक झाली, यावेळी ते बोलत होते. समितीचे सदस्य सभापती रवींद्र बर्डे, अभिजित पाटील, गौरव नायकवडी, वीर कुदळे, उत्तम वायदंडे, अंकुश पाटील, तुकाराम पाटील, सौ़ प्रियांका सावंत, सौ़ वर्षाराणी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीची बैठक झाली़ तहसीलदार सौ़ रूपाली सरनोबत यांनी स्वागत केले़ आ़ पाटील म्हणाले, तालुक्यातील २७ गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई उद्भवू शकते. त्यासाठी पिण्याच्या, शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे लागेल. पिण्याच्या पाण्याच्या अपुऱ्या योजना पूर्ण करण्यावर भर द्या. तालुक्यातील दुधारी, बावची, येडेमच्छिंद्र तलावातील गाळ काढावा लागेल़ याप्रसंगी रवींद्र बर्डे, अभिजित पाटील, गौरव नायकवडी यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या़ गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, महावितरणचे अभियंता उस्मान शेख, वाय़ एऩ पठाण, पाटबंधारेचे उपअभियंता राजेंद्र कांबळे, भूमी अधीक्षक श्रीमती सुवर्णा मसणे, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ़ ए़ एम़ सुतार, पशुवैद्यकीय अधिकारी शाम पाटील यांनी खात्याचा आढावा मांडला. मुख्याधिकारी दीपक झिंजाड, उपअभियंता रामचंद्र चव्हाण, बांधकाम उपअभियंता बी़ एल. हजारे आदी उपस्थित होते. आढावा बैठकीनंतर नायब तहसीलदार डॉ़ सौ़ शैलजा पाटील यांनी आभार मानले़ (वार्ताहर) अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी आ़ जयंत पाटील, आ़ शिवाजीराव नाईक यांनी दोघांमध्ये समन्वय राखत दोन तास विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा आढावा घेतला़ याप्रसंगी काही अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करण्यात आली़ आ. पाटील म्हणाले की, आमच्या काळात मटका बंद होता़ मात्र आता जोरात सुरू आहे़ पोलीस खात्याने कडक पावले उचलावीत़ दर तीन महिन्यांनी समन्वय समितीची बैठक घेऊन तालुक्यात झालेली कामे, कामातील अडचणींचा आढावा घेऊ.