शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

दुष्काळी उपाययोजनांवर आता प्रशासनाचा भर, चारा छावणीचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:40 IST

लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, आता मतमोजणीसाठी महिनाभराचा कालावधी असल्याने या कालावधित दुष्काळ उपाययोजनेवर भर देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांना चाऱ्याची सोय करण्यास प्रथमप्राधान्य देण्यात येणार आहे. दुष्काळी भागातून चारा छावणीचे प्रस्ताव आले, तर त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देदुष्काळी उपाययोजनांवर आता प्रशासनाचा भरसकारात्मक कार्यवाही करण्याचे नियोजन

सांगली : लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, आता मतमोजणीसाठी महिनाभराचा कालावधी असल्याने या कालावधित दुष्काळ उपाययोजनेवर भर देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांना चाऱ्याची सोय करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. दुष्काळी भागातून चारा छावणीचे प्रस्ताव आले, तर त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्ह्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम सध्या तरी आपल्या अजेंड्यावर दोन विषय असल्याचे आवर्जून सांगितले होते. त्यात निवडणूक व जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिनाभराच्या कालावधीनंतर मंगळवारी लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. आता २३ मे रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. या कालावधित प्रशासनातर्फे दुष्काळी उपाययोजनांना प्राधान्य दिले जाणार आहे.शासकीय आकडेवारीनुसार सध्या दोनशेहून अधिक ठिकाणी टॅँकरने पाणीपुरवठा चालू आहे, तर साडेआठशेहून अधिक वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील तीन पाणी योजनांची आवर्तने सुरू असल्याने या योजनांचा लाभ मिळणाऱ्या भागातील टंचाई आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली आहे. याउलट जत, आटपाडी, कवठेमहांकाळसह इतर तालुक्यातील पाणी न पोहोचलेल्या भागात मात्र, उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाई वाढतच आहे.

यावर उपाययोजना म्हणून पाण्याचे टॅँकर मंजूर करण्याचे अधिकार यापूर्वी थेट जिल्हाधिकाऱ्यांना होते. मात्र, आता प्रांताधिकारी, तहसील पातळीवरच टॅँकरना मंजुरी मिळत आहे. त्यामुळे कमी कालावधित टॅँकरची मागणी पूर्ण होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना आता दुष्काळी उपाययोजनांची माहिती अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली