शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी उपाययोजनांवर आता प्रशासनाचा भर, चारा छावणीचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 16:40 IST

लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, आता मतमोजणीसाठी महिनाभराचा कालावधी असल्याने या कालावधित दुष्काळ उपाययोजनेवर भर देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांना चाऱ्याची सोय करण्यास प्रथमप्राधान्य देण्यात येणार आहे. दुष्काळी भागातून चारा छावणीचे प्रस्ताव आले, तर त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ​​​​​​​

ठळक मुद्देदुष्काळी उपाययोजनांवर आता प्रशासनाचा भरसकारात्मक कार्यवाही करण्याचे नियोजन

सांगली : लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यामुळे प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी, आता मतमोजणीसाठी महिनाभराचा कालावधी असल्याने या कालावधित दुष्काळ उपाययोजनेवर भर देण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांना चाऱ्याची सोय करण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. दुष्काळी भागातून चारा छावणीचे प्रस्ताव आले, तर त्यावर सकारात्मक कार्यवाही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी जिल्ह्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम सध्या तरी आपल्या अजेंड्यावर दोन विषय असल्याचे आवर्जून सांगितले होते. त्यात निवडणूक व जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महिनाभराच्या कालावधीनंतर मंगळवारी लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली. आता २३ मे रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. या कालावधित प्रशासनातर्फे दुष्काळी उपाययोजनांना प्राधान्य दिले जाणार आहे.शासकीय आकडेवारीनुसार सध्या दोनशेहून अधिक ठिकाणी टॅँकरने पाणीपुरवठा चालू आहे, तर साडेआठशेहून अधिक वाड्या-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील तीन पाणी योजनांची आवर्तने सुरू असल्याने या योजनांचा लाभ मिळणाऱ्या भागातील टंचाई आटोक्यात आणण्यासाठी मदत झाली आहे. याउलट जत, आटपाडी, कवठेमहांकाळसह इतर तालुक्यातील पाणी न पोहोचलेल्या भागात मात्र, उन्हाची तीव्रता आणि पाणीटंचाई वाढतच आहे.

यावर उपाययोजना म्हणून पाण्याचे टॅँकर मंजूर करण्याचे अधिकार यापूर्वी थेट जिल्हाधिकाऱ्यांना होते. मात्र, आता प्रांताधिकारी, तहसील पातळीवरच टॅँकरना मंजुरी मिळत आहे. त्यामुळे कमी कालावधित टॅँकरची मागणी पूर्ण होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदारांना आता दुष्काळी उपाययोजनांची माहिती अद्ययावत करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीSangliसांगली