शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागांना ‘डाऊनी मिलिड्यू’चा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 23:29 IST

दादा खोत ।लोकमत न्यूज नेटवर्कसलगरे : मिरज पूर्व भागातील द्राक्षबागायतदारांपुढे ढगाळ हवामानामुळे ‘डाऊनी मिलिड्यू’ (दावण्या) या रोगाचा धोका पुन्हा निर्माण झाला आहे. किमान दोन ते तीन दिवस हवामान असेच ढगाळ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने, द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत.यावर्षी द्राक्ष फळछाटण्या सुरू होण्याच्या कालावधीमध्ये सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन्ही ...

दादा खोत ।लोकमत न्यूज नेटवर्कसलगरे : मिरज पूर्व भागातील द्राक्षबागायतदारांपुढे ढगाळ हवामानामुळे ‘डाऊनी मिलिड्यू’ (दावण्या) या रोगाचा धोका पुन्हा निर्माण झाला आहे. किमान दोन ते तीन दिवस हवामान असेच ढगाळ राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत असल्याने, द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत.यावर्षी द्राक्ष फळछाटण्या सुरू होण्याच्या कालावधीमध्ये सप्टेंबर व आॅक्टोबर या दोन्ही महिन्यात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे बहुतांश बागा पोंगा अवस्थेत दावण्याच्या तडाख्यात सापडल्या आहेत. आॅगस्ट छाटणीच्या बागांमध्येही फुलोºयात मोठ्या प्रमाणात गळ होऊन बागांना फटका बसला होता. या सर्व संकटांतून ज्या द्राक्षबागा वाचल्या, त्या आता पुन्हा संकटात सापडण्याची शक्यता आहे. राज्यात १८ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर या काळात हवामान ढगाळ राहणार आहे. पश्चिम महाराष्टÑासह सांगली जिल्ह्यात दोन दिवसात पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.जिल्ह्यात शनिवारपासून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे अगोदरच डाऊनी मिलिड्यूचा प्रादुर्भाव असणाºया द्राक्षबागांमध्ये हा रोग थैमान घालू लागला आहे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ४५ ते ७० टक्क्यांपर्यंत वाढल्याने दमट हवामानामध्ये डाऊनीचे बीजाणू मोठ्या प्रमाणात सक्रिय होत आहेत. त्यामुळे द्राक्षबागायतदारांना या रोगाच्या नियंत्रणासाठी महागड्या बुरशीनाशकांची फवारणी करावी लागत आहे.औषध फवारणी...फुलोºयातील बागांवर या ढगाळ हवामानामुळे अळीचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे सर्वच अवस्थेतील बागांना खराब हवामानाने घेरल्याचे चित्र आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक पुन्हा दिवस-रात्र औषध फवारणीत व्यस्त दिसत आहेत.पावसाचा शिडकावामिरज पूर्व भागातील सीमावर्ती सलगरे व चाबुकस्वारवाडी परिसरात रविवारी सकाळपासूनच ढगाळ हवामान तर होतेच, पण भर दुपारी बारा वाजता या भागात काही मिनिटे पावसाचा शिडकावा झाला. पण सुदैवाने मोठा पाऊस झाला नाही.बुरशीजन्य औषधांचा खर्च दुपटीने वाढलायावर्षी महिनाभर रेंगाळलेला परतीचा मान्सून व नंतर कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेत वाढलेली आर्द्रता व ढगाळ हवामान यामुळे बुरशीजन्य औषधांच्या फवारणीत वाढ करावी लागल्याने, एकरी द्राक्ष उत्पादनामधील औषधांचा खर्च वाढत आहे. याशिवाय द्राक्षांच्या दर्जावरही त्याचा परिणाम होत आहे. आॅगस्ट छाटणीच्या पक्व झालेल्या द्राक्षबागांनाही या अवकाळी पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे धोका निर्माण झाला आहे.ं

टॅग्स :agricultureशेती