शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागा संकटात रोगाची शक्यता : व्यापाºयांकडून दरात घसरण; डाळिंब, द्राक्ष उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:59 IST

सांगली/तासगाव : जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरींमुळे द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा, शाळू उत्पादक शेतकºयांचे बुधवारी चांगलेच धाबे दणाणले. बदलत्या हवामानामुळे द्राक्षबागायतदार पुन्हा संकटात सापडला आहे. वातावरणाचा बदल लक्षात घेऊन व्यापाºयांनीही द्राक्ष, डाळिंबाचे दर पाडल्याचा धक्कादायक प्रकारही चालू झाला आहे.जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र चार हजार हेक्टर असून, ५० टक्के डाळिंबाचा ...

ठळक मुद्दे हरभरा, गहू, ज्वारीचे नुकसान

सांगली/तासगाव : जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरींमुळे द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा, शाळू उत्पादक शेतकºयांचे बुधवारी चांगलेच धाबे दणाणले. बदलत्या हवामानामुळे द्राक्षबागायतदार पुन्हा संकटात सापडला आहे. वातावरणाचा बदल लक्षात घेऊन व्यापाºयांनीही द्राक्ष, डाळिंबाचे दर पाडल्याचा धक्कादायक प्रकारही चालू झाला आहे.

जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र चार हजार हेक्टर असून, ५० टक्के डाळिंबाचा तोडा झाला असून, उर्वरित शेतातच आहेत. तसेच ५० हजार हेक्टरवर द्राक्षबागा आहेत. यामध्ये निर्यात द्राक्षाचे दीड हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील ३० टक्के बागा खराब हवामानामुळे यापूर्वीच बाद झाल्या आहेत. ३५ टक्के द्राक्ष बागांची विक्री झालेली आहे, तर उर्वरित ३५ टक्के बागांवरील द्राक्षाची विक्री शिल्लक आहे. मार्चअखेर जिल्ह्यातील हंगाम लांबणार आहे. खराब हवामानामुळे फळ छाटण्या विलंबाने घेतल्या आहेत. ढगाळ हवामानामुळे द्राक्षांत भुरी व मण्याला तडा जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

यंदा विविध प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या द्राक्षाच्या पेटीला सरासरी दर १६० ते १७५ रुपये दर मिळतो आहे. ढगाळ हवामानाचा गैरफायदा घेत या दरात लगेच कपात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेतकºयांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्हाभर ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत होता. खराब हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

यंदाच्या हंगामाची सुरुवात अवकाळीमुळे नुकसानीत झाली असतानाच, द्राक्ष काढणीच्या काळात ढगाळ वातावरण झाल्याने दलालांकडून द्राक्षाच्या दरात घसरण करण्यात येत आहे. त्याचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसल्याचे दिसून येत आहे.

खराब हवामानामुळे फळ छाटण्या विलंबाने घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत काही दिवसांपासून जिल्ह्यातील हवामानात सातत्याने बदल होत होते. बुधवारी सकाळपासूनच हवामान पूर्णपणे ढगाळ होते. वातावरणात गारवा कायम होता; तर काही ठिकाणी पावसाचे बारीक थेंब पडत होते. या वातावरणामुळे द्राक्षांत भुरी व मण्याला तडा जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

जिल्ह्यात आणखी सात ते आठ दिवस खराब हवामान राहण्याची शक्यता आहे. खराब हवामानाचा फायदा घेत द्राक्ष दलालांकडून द्राक्षाच्या दरात चार किलोच्या पेटीमागे दहा ते वीस रुपयांची घसरण करण्यात आली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांची कोंडी झाली असून, ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागायतदारांचे धाबे दणाणले आहेत.आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील काही भागात ज्वारी काढण्यास सुरुवात झाली आहे. ढगाळ हवामान आणि पावसाचे बारीक थेंब पडत असल्यामुळे ज्वारी काळी पडण्याची भीती आहे. हरभºयावर रोगांचा फैलाव वाढणार आहे. गहू पिकाचेही मोठे नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.पावसाच्या शिडकाव्याने द्राक्ष बागायतदार हबकले

नरवाड : नरवाड (ता. मिरज) येथे अवकाळी पावसाचा तुरळक शिडकावा झाल्याने द्राक्ष बागायतदार शेतकºयांचे धाबे दणाणले आहेत. द्राक्षबागायतीला पाऊस जरी घातक असला तरी, पान उत्पादकांना तारक ठरणार आहे. थंडीमुळे गारठलेल्या पानवेलींच्या वाढीसाठी पोषक आहे. ढगाळ हवामान आणि रिमझिम पाऊस यामुळे हरभरा पिकावर बोंडअळीचे प्रमाण वाढणार आहे. शाळू पिकेही पावसामुळे धोक्यात येणार आहेत. शाळवाची कणसे भरण्यास पावसाने अडथळा निर्माण होणार आहे.