शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागा संकटात रोगाची शक्यता : व्यापाºयांकडून दरात घसरण; डाळिंब, द्राक्ष उत्पादकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 00:59 IST

सांगली/तासगाव : जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरींमुळे द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा, शाळू उत्पादक शेतकºयांचे बुधवारी चांगलेच धाबे दणाणले. बदलत्या हवामानामुळे द्राक्षबागायतदार पुन्हा संकटात सापडला आहे. वातावरणाचा बदल लक्षात घेऊन व्यापाºयांनीही द्राक्ष, डाळिंबाचे दर पाडल्याचा धक्कादायक प्रकारही चालू झाला आहे.जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र चार हजार हेक्टर असून, ५० टक्के डाळिंबाचा ...

ठळक मुद्दे हरभरा, गहू, ज्वारीचे नुकसान

सांगली/तासगाव : जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरींमुळे द्राक्ष, डाळिंब, गहू, हरभरा, शाळू उत्पादक शेतकºयांचे बुधवारी चांगलेच धाबे दणाणले. बदलत्या हवामानामुळे द्राक्षबागायतदार पुन्हा संकटात सापडला आहे. वातावरणाचा बदल लक्षात घेऊन व्यापाºयांनीही द्राक्ष, डाळिंबाचे दर पाडल्याचा धक्कादायक प्रकारही चालू झाला आहे.

जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र चार हजार हेक्टर असून, ५० टक्के डाळिंबाचा तोडा झाला असून, उर्वरित शेतातच आहेत. तसेच ५० हजार हेक्टरवर द्राक्षबागा आहेत. यामध्ये निर्यात द्राक्षाचे दीड हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातील ३० टक्के बागा खराब हवामानामुळे यापूर्वीच बाद झाल्या आहेत. ३५ टक्के द्राक्ष बागांची विक्री झालेली आहे, तर उर्वरित ३५ टक्के बागांवरील द्राक्षाची विक्री शिल्लक आहे. मार्चअखेर जिल्ह्यातील हंगाम लांबणार आहे. खराब हवामानामुळे फळ छाटण्या विलंबाने घेतल्या आहेत. ढगाळ हवामानामुळे द्राक्षांत भुरी व मण्याला तडा जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

यंदा विविध प्रकारच्या चांगल्या दर्जाच्या द्राक्षाच्या पेटीला सरासरी दर १६० ते १७५ रुपये दर मिळतो आहे. ढगाळ हवामानाचा गैरफायदा घेत या दरात लगेच कपात करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेतकºयांवर पुन्हा आर्थिक संकट कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत होता. बुधवारी सकाळपासूनच जिल्हाभर ढगाळ हवामान होते. काही ठिकाणी पावसाचा शिडकावा होत होता. खराब हवामानामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावला आहे.

यंदाच्या हंगामाची सुरुवात अवकाळीमुळे नुकसानीत झाली असतानाच, द्राक्ष काढणीच्या काळात ढगाळ वातावरण झाल्याने दलालांकडून द्राक्षाच्या दरात घसरण करण्यात येत आहे. त्याचा द्राक्ष उत्पादकांना फटका बसल्याचे दिसून येत आहे.

खराब हवामानामुळे फळ छाटण्या विलंबाने घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत काही दिवसांपासून जिल्ह्यातील हवामानात सातत्याने बदल होत होते. बुधवारी सकाळपासूनच हवामान पूर्णपणे ढगाळ होते. वातावरणात गारवा कायम होता; तर काही ठिकाणी पावसाचे बारीक थेंब पडत होते. या वातावरणामुळे द्राक्षांत भुरी व मण्याला तडा जाण्याची स्थिती निर्माण झालेली आहे.

जिल्ह्यात आणखी सात ते आठ दिवस खराब हवामान राहण्याची शक्यता आहे. खराब हवामानाचा फायदा घेत द्राक्ष दलालांकडून द्राक्षाच्या दरात चार किलोच्या पेटीमागे दहा ते वीस रुपयांची घसरण करण्यात आली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांची कोंडी झाली असून, ढगाळ हवामानामुळे द्राक्षबागायतदारांचे धाबे दणाणले आहेत.आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यातील काही भागात ज्वारी काढण्यास सुरुवात झाली आहे. ढगाळ हवामान आणि पावसाचे बारीक थेंब पडत असल्यामुळे ज्वारी काळी पडण्याची भीती आहे. हरभºयावर रोगांचा फैलाव वाढणार आहे. गहू पिकाचेही मोठे नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.पावसाच्या शिडकाव्याने द्राक्ष बागायतदार हबकले

नरवाड : नरवाड (ता. मिरज) येथे अवकाळी पावसाचा तुरळक शिडकावा झाल्याने द्राक्ष बागायतदार शेतकºयांचे धाबे दणाणले आहेत. द्राक्षबागायतीला पाऊस जरी घातक असला तरी, पान उत्पादकांना तारक ठरणार आहे. थंडीमुळे गारठलेल्या पानवेलींच्या वाढीसाठी पोषक आहे. ढगाळ हवामान आणि रिमझिम पाऊस यामुळे हरभरा पिकावर बोंडअळीचे प्रमाण वाढणार आहे. शाळू पिकेही पावसामुळे धोक्यात येणार आहेत. शाळवाची कणसे भरण्यास पावसाने अडथळा निर्माण होणार आहे.