शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा-शिराळ्यात राजकीय हवा नरम

By admin | Updated: January 21, 2016 00:25 IST

नेतेही गारठले : सत्ताधारी, विरोधी गट शांत

अशोक पाटील -- इस्लामपूर राज्यात सत्ता नसल्याने वाळवा-शिराळ्यातील आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे व मानसिंगराव नाईक, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांची हवा नरम आहे. दुसरीकडे राज्यात सत्ता असूनही मंत्रिपदाच्या कुंपणावर असलेले आमदार शिवाजीराव नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना भाजपने ताटकळत ठेवल्याने, ऐन थंडीत या नेत्यांसह कार्यकर्तेही गारठले आहेत.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील हे जयंत पाटील गटाचे आहेत. यापूर्वी कासेगावच्या देवराज पाटील यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. आता कोणत्या तालुक्याला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कामेरीचे राष्ट्रवादीचे सदस्य रणजित पाटील उपाध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. माजी आमदार विलासराव शिंदे आष्टा पालिकेच्या राजकारणात व्यस्त आहेत. वाळवा तालुक्यात पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक गटाचे राजकारण महत्त्वाचे मानले जाते. परंतु अलीकडील काळात त्यांच्या गोटातही शांतता दिसत आहे. प्रत्येकवेळी त्यांची राजकीय भूमिका बदलत असल्याने कार्यकर्त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी शिक्षण संस्था, सूतगिरणी आणि चौंडी येथील प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. मध्यंतरी धनगर समाजाच्या प्रश्नावर आवाज उठविण्यात आघाडीवर राहिलेले डांगे सध्या थंड आहेत.हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी वाळवा तालुक्यातील राजकारण बाजूला करून, उसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आता धरणग्रस्तांच्या प्रश्नाला हात घातला आहे. वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी यांनीही या आंदोलनात मुसंडी मारली आहे.कामेरीचे जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील यांनी इतरत्र लक्ष न देता बँकेवरच लक्ष ठेवले आहे, तर त्यांचे चिरंजीव जयराज पाटील व्यवसाय सांभाळत राजकारणात बस्तान बसविण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक विश्वास साखर कारखान्याचा गळीत हंगाम आणि उसाला चांगला दर यात गुंतले आहेत. याव्यतिरिक्त विरोधी आमदार शिवाजीराव नाईक यांची ताकद संपविण्यासाठी शिवाजीराव देशमुख व सत्यजित देशमुख गटाच्या हातात हात देऊन ताकद वाढविण्याच्या तयारीत आहेत.निवडणुका नाहीत : म्हणून वातावरणही नाहीसातारा-सांगली जिल्ह्यातून स्थानिक स्वराज संस्थेमधून निवडून द्यायच्या आमदारपदाची निवडणूक सोडली, तर नजीकच्या काळात कोणत्याच लक्षवेधी निवडणुका नाहीत. त्यामुळे सध्या जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापती निवडीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर ते नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी करतील, असे चित्र आहे. ते सध्या लग्नाचे मुहूर्त आणि दु:खद घटनेच्या ठिकाणी भेटी देण्यात व्यस्त आहेत.