शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा-शिराळ्यात राजकीय हवा नरम

By admin | Updated: January 21, 2016 00:25 IST

नेतेही गारठले : सत्ताधारी, विरोधी गट शांत

अशोक पाटील -- इस्लामपूर राज्यात सत्ता नसल्याने वाळवा-शिराळ्यातील आमदार जयंत पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे व मानसिंगराव नाईक, विधान परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख यांची हवा नरम आहे. दुसरीकडे राज्यात सत्ता असूनही मंत्रिपदाच्या कुंपणावर असलेले आमदार शिवाजीराव नाईक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदाभाऊ खोत यांना भाजपने ताटकळत ठेवल्याने, ऐन थंडीत या नेत्यांसह कार्यकर्तेही गारठले आहेत.जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील हे जयंत पाटील गटाचे आहेत. यापूर्वी कासेगावच्या देवराज पाटील यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली होती. आता कोणत्या तालुक्याला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कामेरीचे राष्ट्रवादीचे सदस्य रणजित पाटील उपाध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. माजी आमदार विलासराव शिंदे आष्टा पालिकेच्या राजकारणात व्यस्त आहेत. वाळवा तालुक्यात पेठनाक्यावरील नानासाहेब महाडिक गटाचे राजकारण महत्त्वाचे मानले जाते. परंतु अलीकडील काळात त्यांच्या गोटातही शांतता दिसत आहे. प्रत्येकवेळी त्यांची राजकीय भूमिका बदलत असल्याने कार्यकर्त्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी शिक्षण संस्था, सूतगिरणी आणि चौंडी येथील प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. मध्यंतरी धनगर समाजाच्या प्रश्नावर आवाज उठविण्यात आघाडीवर राहिलेले डांगे सध्या थंड आहेत.हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी वाळवा तालुक्यातील राजकारण बाजूला करून, उसाला चांगला दर देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आता धरणग्रस्तांच्या प्रश्नाला हात घातला आहे. वाळव्याचे सरपंच गौरव नायकवडी यांनीही या आंदोलनात मुसंडी मारली आहे.कामेरीचे जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील यांनी इतरत्र लक्ष न देता बँकेवरच लक्ष ठेवले आहे, तर त्यांचे चिरंजीव जयराज पाटील व्यवसाय सांभाळत राजकारणात बस्तान बसविण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. शिराळ्याचे माजी आमदार मानसिंगराव नाईक विश्वास साखर कारखान्याचा गळीत हंगाम आणि उसाला चांगला दर यात गुंतले आहेत. याव्यतिरिक्त विरोधी आमदार शिवाजीराव नाईक यांची ताकद संपविण्यासाठी शिवाजीराव देशमुख व सत्यजित देशमुख गटाच्या हातात हात देऊन ताकद वाढविण्याच्या तयारीत आहेत.निवडणुका नाहीत : म्हणून वातावरणही नाहीसातारा-सांगली जिल्ह्यातून स्थानिक स्वराज संस्थेमधून निवडून द्यायच्या आमदारपदाची निवडणूक सोडली, तर नजीकच्या काळात कोणत्याच लक्षवेधी निवडणुका नाहीत. त्यामुळे सध्या जयंत पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सभापती निवडीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानंतर ते नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी करतील, असे चित्र आहे. ते सध्या लग्नाचे मुहूर्त आणि दु:खद घटनेच्या ठिकाणी भेटी देण्यात व्यस्त आहेत.